शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

गणवेशधारी कर्मचारी चहा टपरीवर

By admin | Updated: September 24, 2016 02:37 IST

जिल्हा परिषदेने अधिकारी, कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू केला. सोमवार आणि शुक्रवारी हे अधिकारी, कर्मचारी गणवेषात येऊ लागले.

जिल्हा परिषद : कार्यालयीन वेळेत चकल्लस, तासन्तास असते उपस्थिती, कामे करतात तरी केव्हा ?यवतमाळ : जिल्हा परिषदेने अधिकारी, कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू केला. सोमवार आणि शुक्रवारी हे अधिकारी, कर्मचारी गणवेषात येऊ लागले. परिणामी चहा टपरीवरही आता गणवेषधारी कर्मचारी चकल्लस करताना दिसून येत आहे.जिल्हा परिषदेने महत्प्रयासाने अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू केला. काही कर्मचाऱ्यांनी या ड्रेस कोडला विरोधही केला. त्यांच्यापुढे नमते घेत अखेर प्रशासनाने ड्रेस कोडची सक्ती नसून अधिकारी, कर्मचाऱ्यांना गणवेष ऐच्छिक केला. एकाच गणवेषात असल्यास शिस्त दिसून पडते, म्हणून प्रशासनाने सुरूवातीला ड्रेस कोड सक्तीचा करण्याबाबत पावले उचलली होती. आता हा गणवेष ऐच्छिक आहे. मात्र त्यातून शिस्त दिसून येत असल्याने बहुतांश अधिकारी, कर्मचारी आता गणवेषात कार्यालयात येऊ लागले आहे.जिल्हा परिषदेत सोमवार आणि शुक्रवारी गणवेषातील अधिकारी, कर्मचारी दिसून येतात. यामुळे जिल्हा परिषदेत येणाऱ्या सामान्य नागरिकाला त्यांची शिस्तप्रियता कळून येते. प्रशासनाच्या या निर्णयाचे त्यांना कुतूहलही वाटते. मात्र तेच कर्मचारी ज्यावेळी कार्यालयीन वेळात रस्त्यांवरील चहा टपरीवर दिसून येतात, त्यावेळी सामान्य नागरिकांचा तिळपापड होतो. पूर्वी कर्मचारी गणवेषात नसल्याने चहा टपरीवर असलेले नागरिक कोण आहेत, हे ओळखू येत नव्हते. मात्र आता ते चक्क गणवेषातच टपरीवर चहा पिताना दिसत असल्याने त्यांच्या शिस्तीचा दिंढोरा पिटला जात आहे.गणवेषधारी कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील चहा टपरीवर बघून नागरिकांना संताप येत आहे. विशेष म्हणजे कार्यालयीन वेळात ते तेथे दिसत असल्याने त्यांचा संताप रास्तही ठरत आहे. दुपारी २.३0 वाजताच्या मध्यान्ह काळात ते टपरीवर आढळल्यास कुणालाच आश्चर्य वाटत नाही. मात्र कार्यालयीन वेळात ते चहा पिताना दिसत असल्याने हे कर्मचारी नेमके काम कधी करतात, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. (शहर प्रतिनिधी)अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरजगणवेषातील कर्मचारी चहा टपरीवर दिसत असल्याने ड्रेस कोडच्या शिस्तीचेच वाभाडे निघत आहे. त्यातून ‘शिस्तप्रिय’ कर्मचाऱ्यांचे ओंगळवाणे दर्शन नागरिकांना घडत आहे. एकप्रकारे जिल्हा परिषद आणि प्रशासनाचे वाभाडे काढणारी ही शिस्तप्रियता ठरत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळात नजिकच्या चहा टपऱ्यांवर चक्कर मारून याची खातरजमा करावी, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.