शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

नादुरूस्त उभी वाहने धोकादायक

By admin | Updated: October 8, 2015 02:19 IST

शहरातून नांदेपेराकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरूस्त वाहने उभी आहेत.

अपघाताला निमंत्रण : वाहतूक पोलीस, आरटीओंचे जाणीवपूर्वक दुर्लक्षवणी : शहरातून नांदेपेराकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरूस्त वाहने उभी आहेत. ही वाहने अपघाताला निमंत्रण देत असून याकडे वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष देऊन वाहने हटविण्याची मागणी होत आहे.साई मंदिर चौकाजवळ असलेल्या एका गॅरेजजवळ गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दोन नादुरूस्त वाहने उभी आहे. या वाहनांचा वापर होत नसल्यामुळे ते जागेवरच जीर्ण होत आहे. या वाहनांचे नेमके मालक कोण, हेसुद्धा नागरिकांना माहिती नाही. मात्र ही वाहने अपघाताला निमंत्रण देत असल्याने नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. याच मार्गावर रेल्वे क्रॉसिंगकडे जाताना एका ड्रायव्हींग स्कूलचे नादुरूस्त वाहनही रस्त्याच्या कडेला उभे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी ही वाहने दृष्टीसही पडत नाही. रस्त्याच्या अगदी लगतच ही नादुरूस्त वाहने उभी असल्याने कधी मोठा अनर्थ घडेल, याचा भरवसा उरला नाही. नागरिकांना ही नादुरूस्त वाहने दररोज दिसतात. मात्र वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे या वाहनांकडे कसे लक्ष जात नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ही वाहने अगदी रस्त्याच्या कडेलाच उभी असल्याने अर्धा रस्ताच त्यांनी व्यापून टाकला आहे. परिणामी उर्वरित रस्त्यावरून वाहन चालकांना आपले वाहन समोर काढावे लागते. एखाद्यावेळी समोरून मोठे चारचाकी वाहन समोरासमोर आले की, तेथून मार्ग काढणे कठीण जाते. त्याचबरोबर या उभ्या नादुरुस्ती वाहनांवर दुसरे वाहने आदळू शकतात. या वाहनांवर मात्र आता चोरट्यांची नरज गेली आहे. एका वाहनाचे मागील बाजूचे टायरच गायब झाले आहे. काही सुटे भागसुद्धा चोरीला गेले आहे. या वाहनांचे मालक कोण आहेत, याचासुद्धा कुणाला थांगपत्ता नाही. मात्र ही वाहने जेथे उभी आहेत, त्या परिसरातील नागरिकांना अडचणीची ठरत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)