शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नादुरूस्त उभी वाहने धोकादायक

By admin | Updated: October 8, 2015 02:19 IST

शहरातून नांदेपेराकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरूस्त वाहने उभी आहेत.

अपघाताला निमंत्रण : वाहतूक पोलीस, आरटीओंचे जाणीवपूर्वक दुर्लक्षवणी : शहरातून नांदेपेराकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून नादुरूस्त वाहने उभी आहेत. ही वाहने अपघाताला निमंत्रण देत असून याकडे वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष देऊन वाहने हटविण्याची मागणी होत आहे.साई मंदिर चौकाजवळ असलेल्या एका गॅरेजजवळ गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दोन नादुरूस्त वाहने उभी आहे. या वाहनांचा वापर होत नसल्यामुळे ते जागेवरच जीर्ण होत आहे. या वाहनांचे नेमके मालक कोण, हेसुद्धा नागरिकांना माहिती नाही. मात्र ही वाहने अपघाताला निमंत्रण देत असल्याने नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. याच मार्गावर रेल्वे क्रॉसिंगकडे जाताना एका ड्रायव्हींग स्कूलचे नादुरूस्त वाहनही रस्त्याच्या कडेला उभे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी ही वाहने दृष्टीसही पडत नाही. रस्त्याच्या अगदी लगतच ही नादुरूस्त वाहने उभी असल्याने कधी मोठा अनर्थ घडेल, याचा भरवसा उरला नाही. नागरिकांना ही नादुरूस्त वाहने दररोज दिसतात. मात्र वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे या वाहनांकडे कसे लक्ष जात नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ही वाहने अगदी रस्त्याच्या कडेलाच उभी असल्याने अर्धा रस्ताच त्यांनी व्यापून टाकला आहे. परिणामी उर्वरित रस्त्यावरून वाहन चालकांना आपले वाहन समोर काढावे लागते. एखाद्यावेळी समोरून मोठे चारचाकी वाहन समोरासमोर आले की, तेथून मार्ग काढणे कठीण जाते. त्याचबरोबर या उभ्या नादुरुस्ती वाहनांवर दुसरे वाहने आदळू शकतात. या वाहनांवर मात्र आता चोरट्यांची नरज गेली आहे. एका वाहनाचे मागील बाजूचे टायरच गायब झाले आहे. काही सुटे भागसुद्धा चोरीला गेले आहे. या वाहनांचे मालक कोण आहेत, याचासुद्धा कुणाला थांगपत्ता नाही. मात्र ही वाहने जेथे उभी आहेत, त्या परिसरातील नागरिकांना अडचणीची ठरत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)