शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दीड हजार हेक्टरवरील मिरचीवर अज्ञात रोग

By admin | Updated: January 5, 2016 02:52 IST

वणी उपविभागातील सुमारे दीड हजार हेक्टरवरील मिरची पिकावर अज्ञात रोगाने हल्ला केला असून विविध औषधांच्या फवारण्या

देवेंद्र पोल्हे ल्ल मारेगाववणी उपविभागातील सुमारे दीड हजार हेक्टरवरील मिरची पिकावर अज्ञात रोगाने हल्ला केला असून विविध औषधांच्या फवारण्या करूनही रोग आटोक्यात आला नाही. यामुळे मिरची उत्पादक शेतकरी पुरता हादरला आहे. या रोगाच्या संशोधनासाठी बुधवारी दिल्लीचे कृषितज्ज्ञांचे पथक येणार आहे. वणी उपविभागात कापसाने दगा दिल्यानंतर बहुतांश शेतकरी मिरची लागवडीकडे वळले आहे. मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड होत आहे. वणी उपविभागात यावर्षी जवळपास दीड हजार हेक्टरवर लागवड झाली. मिरचीच्या लागवडीला एकरी सव्वा ते दीड लाख खर्च येतो. मात्र उत्पन्नही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने शेतकरी या पिकाकडे वळले होते. परंतु यावर्षी मिरचीवर अज्ञात रोगाने जोरदार हल्ला चढविला आहे. चुरड्या सारखा हा रोग असून झाडाची पाने गुंडाळून गेली आहे. त्यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे. या अज्ञात रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाय योजले. परंतु परिणाम झाला नाही. वणी उपविभागासोबतच लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मिरचीही अशीच अवस्था आहे. नेमका कोणता रोग मिरचीवर आला याची माहिती व्हावी म्हणून मारेगावचे शेतकरी डॉ.भास्कर महाकुलकर, श्रीनिवास पालमपाटील यांनी भारतीय अनुसंधान कृषी संशोधन संस्था दिल्लीशी संपर्क साधला. मिरचीचे झाड आणि बियाणेही संशोधनासाठी पाठविले. आता वणी विभागातील मिरचीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी कृषी संशोधन संस्थेचे दिल्ली, पुणे आणि नागपूर येथील पथक ६ व ७ जानेवारीला वणी उपविभागात येणार आहे. तसचे शेतकऱ्यांनी शेतात लावलेल्या मिरचीचे बियाणे बोगस असल्याची तक्रार होत आहे. अनेक कंपन्यांनी सीड प्लॉटच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून मिरची खरेदी केली आणि त्यापासून बियाणे बनविले त्यामुळेच शेतकऱ्यांना अज्ञात रोग आल्याचे शेतकरी सांगत आहे. आंध्राचे अण्णाही धास्तावले४यवतमाळ जिल्ह्यात आंध्र प्रदेशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीची शेती करतात. मक्त्याने शेती घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पादनही घेत आहे. परंतु यावर्षी या मिरचीवरही अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने आंध्र प्रदेशातील अण्णाही चांगलेच धास्तावले आहे.