शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

बेरोजगार प्रकल्पग्रस्तांना वय उलटूनही नोकरी नाही

By admin | Updated: June 23, 2017 01:51 IST

जगण्याचे एकमेव साधन अरुणावतीच्या बुडीत क्षेत्रात गेल्यानंतर प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीची अपेक्षा होती.

अरुणावती प्रकल्प : मजुरीवर करावा लागतो उदरनिर्वाहलोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : जगण्याचे एकमेव साधन अरुणावतीच्या बुडीत क्षेत्रात गेल्यानंतर प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुणांना शासकीय नोकरीची अपेक्षा होती. परंतु आता नोकरीचे वय उलटून गेले तरी अनेकांना नोकरीच मिळाली नाही. भूमिहीन झालेल्या बेरोजगार तरुणांना मजुरीवर उदरनिर्वाह करावा लागतो.दिग्रस तालुक्यातील सावंगा बु. येथे अरुणावती नदीवर प्रकल्प उभारण्यात आला. जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र ८९४ चौरस किलोमीटर आहे. १९८० साली कामाला सुरुवात झालेल्या या प्रकल्पाची घळ १९९४ मध्ये भरण्यात आली. १९९५ पासून सिंचन सुरू झाले. या प्रकल्पात ११ गावे बुडित क्षेद्धात गेली. येथील शेतकरी भूमिहीन झाले. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील व्यक्तीला ज्येष्ठता यादीनुसार वर्ग ३ व ४ मध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले. नोकरी मिळणार या आशेवर अनेकांनी प्रकल्पाला विनाअट जमिनी दिल्या. परंतु अनेक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुण एजबार झाले आहे. त्यामुळे शासकीय नोकरीची आशाही मावळली आहे. शेती धरणात गेली. रोजगाराचा कोणताही आधार नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची मुले भूमिहीन होवून रोजमजुरी करताना दिसत आहे. सुरुवातीला या बेरोजगारांना मोठमोठाली आश्वासने देण्यात आली. अनेकांना नोकरीचे स्वप्न दाखविण्यात आले. परंतु अरुणावती प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शासकीय नोकरीपासून वंचितच राहिले. नोकरीसाठी शासनाचे दार ठोठावून ही मंडळी आता थकली आहे. आपल्यावरील अन्याय दूर करावा, शासनाला जाग यावी यासाठी प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगार तरुण एकत्र येण्याच्या तयारीत आहे. प्रशासनाकडून टोलवाटोलवीप्रकल्पग्रस्त तरुणांनी नोकरीच्या आशेने आतापर्यंत अनेक कार्यालयांचे उंबरठे झिजविले. परंतु प्रत्येक ठिकाणी टोलवाटोलवी करण्यात आली. अनेकांनी तर नोकरीसाठी अर्ज करणेही आता बंद केले आहे. नोकरी मिळत नसेल तर आम्ही जगावे कसे, असे तरुण म्हणत आहे.