शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
3
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
4
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
5
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
6
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
7
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
8
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
9
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
10
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
11
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
12
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
13
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
14
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
15
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
16
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
17
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
18
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
19
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
20
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला

गावोगावच्या सरपंचांनी समजून घ्याव्या योजना

By admin | Updated: October 31, 2015 00:24 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत अनेकांच्या हाताला हक्काचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

सचिंद्र प्रताप सिंह : जलयुक्त शिवार योजनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या तालुकास्तरावर बैठकायवतमाळ : रोजगार हमी योजनेंतर्गत अनेकांच्या हाताला हक्काचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे गावपातळीवर नरेगाची कामे घेऊन ती पूर्ण करण्याकडे ग्रामस्तरीय यंत्रणेचा पुढाकार असला पाहिजे. रोहयोत सरपंचांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील सरपंचांनी रोहयोसह जलयुक्त शिवार समजून घेतले पाहिजे, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. नरेगा व जलयुक्त शिवारला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह तालुकास्तरीय बैठका घेत आहे. दारव्हा व नेर या दोन तालुक्यांचा ग्रामस्तरासह तालुका यंत्रणेचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, रोहयोचे उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, तहसीलदार राऊत यांच्यासह तालुकास्तरीय सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयोंतर्गत सुरू असलेल्या गावनिहाय कामांचा आढावा घेतला. नरेगांअर्गत घेतलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. गावातील नागरिकांची कामाची मागणी आल्यास त्यांना तातडीने काम उपलब्ध करून देण्यासाठी पुरेशी कामे सेल्फवर ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. नरेगातून सिंचन विहिरींची कामे सहज घेतली जाऊ शकतात. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे विहिरींच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. विहिरींसह शौचालयाच्या बांधकामाची कामे घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. नरेगा अंतर्गत कामे करणारे महसूल, पंचायत समिती, वन विभाग, सिंचन विभाग, पाणीपुरवठा, बांधकाम विभागांचा स्वतंत्र आढावाही त्यांनी घेतला. येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात ठिकठिकाणी नरेगाच्या कामांना प्रारंभ होऊन जिल्हा का कामांमध्ये सर्वाधिक चांगली प्रगती करणारा जिल्हा म्हणून ओळखला जाईल, इतके चांगले काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)काम न करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढानरेगा अंतर्गत विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणावर कंत्राटी अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहे. या कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून चांगले काम होणे अपेक्षित आहे. परंतु अनेक जण त्यांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करीत नसल्याचे बैठकीत निदर्शनास आले. ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम समाधानकारक नसतील तशांच्या नियुक्त्या तत्काळ रद्द करण्याचे निर्देश बैठकीत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.