शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
5
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
8
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
9
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
10
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
11
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
12
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
14
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
15
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
16
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
17
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
18
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
19
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
20
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या नेतृत्वात सावकारग्रस्तांची धडक

By admin | Updated: May 24, 2017 00:27 IST

सावकारग्रस्त शेतकरी मंगळवारी मुंबईच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडकले.

जिल्हा उपनिबंधक कार्यालय : शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या, वेगवान सुनावणीचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सावकारग्रस्त शेतकरी मंगळवारी मुंबईच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडकले. त्यांनी समस्यांचा पाढा वाचून जिल्हा उपनिबंधकांना फास्ट ट्रॅक कोर्टच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या तक्रारींची सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. २००२ पासून जिल्ह्यात अवैध सावकारीच्या १९२ तक्रारी पुढे आल्या. कायद्यातील त्रुटींमुळे निम्मी प्रकरणे खारीज झाली. ४९ प्रकरणांची अद्याप सुनावणी सुरू आहे. यात २० प्रकरणांत अवैध सावकारी सिद्ध झाली. त्यामुळे तक्रारकर्त्या शेतकऱ्यांची स्थावर मालमत्ता परत करण्याची कारवाई सुरू आहे. मात्र कायद्यातील पळवाटांचा लाभ घेत काही सावकारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तथापि अनेक प्रकरणात तक्रार दिल्यानंतरही फौजदारी कारवाई झाली नाही. यामुळे सावकार बिनबोभाटपणे गावात फिरत आहेत, असे आमदार विद्या चव्हाण यांनी डीडीआर गौतम वर्धन यांच्या निदर्शनास आणून दिले. तक्रारकर्त्या शेतकऱ्यांविरूद्ध दमदाटी करून खोटे गुन्हे दाखल केले जातात. काही प्रकरणात सुनावणीअंती शेतकऱ्याला शेतीचा ताबा देण्याचे आदेश झाले. मात्र पोेलीस संरक्षण न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना शेताचा ताबाच मिळाला नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी आमदार चव्हाण यांना दिली. अकोलाबाजारमध्ये एकाच सावकाराने १५० एकर जमीन हडपली. त्याच्या घरी धाड टाकून दस्तावेज जप्त करण्यात आले. मात्र त्याला अटक झाली नाही, अशी कैफीयत सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने मांडली. मावळणी येथे एका सावकाराविरूद्ध ३० तक्रारी असून त्याने २०० एकर जमिनीची हेराफेर करून ती परस्पर विकली. जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणात स्वत: पाऊल उचलून तत्काळ निकाल द्यावा. कोर्टात अ‍ॅफेडेव्हीट दाखल करावे, असे निर्देश चव्हाण यांनी दिले. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टच्या धर्तीवर सुनावणी घेण्याची सूचना दिली. यावेळी जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, अर्चना माळवी, सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे घनशाम दरणे, मनीषा काटे यांच्यासह विविध तालुक्यातून आलेले शेतकरी उपस्थित होते. ३१ मे रोजी विशेष बैठक सावकारग्रस्त शेतकऱ्यांची कैफीयत जाणून त्यांची प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासाठी येत्या ३० मे रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सावकारग्रस्त शेतकरी, जिल्हा उपनिबंधक, विधान परिषदेच्या आमदार, सहाय्यक निबंधक आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.