शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १७ टक्केच शेती क्षेत्र सिंचनाखाली

By admin | Updated: May 8, 2017 00:17 IST

जिल्ह्यात केवळ १७ टक्केच शेती आत्तापर्यंत सिंचनाखाली आली. उर्वरित ८३ टक्के जमीन अद्याप कोरडवाहू असल्याने

प्रकल्प पांढरे हत्ती : शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न धुऱ्यावरच कोमेजले लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात केवळ १७ टक्केच शेती आत्तापर्यंत सिंचनाखाली आली. उर्वरित ८३ टक्के जमीन अद्याप कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न अपूर्णच आहे. शेतकरी आत्महत्येमुळे जिल्ह्याची सर्व दूर ओळख झाली. त्याला आळा घालण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना आणल्या. धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम आखला. शेततळे, जलयुक्त शिवार योजना आणली. तरीही केवळ १७ टक्केच शेती ओली झाली. सिंचनाची सुविधा नसल्याने कोरडवाहू शेतीवरच शेतकऱ्यांची गुजराण सुरू आहे. त्यांचे दुबार पिकाचे स्वप्न कोमेजले आहे. यामुळे निराशेच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात एक मोठा, पाच मध्यम, तर ६२ लघु प्रकल्प आहेत. मात्र हे सर्व प्रकल्प पांढरे हत्ती ठरत आहे. त्यांच्याव्दारे नाममात्र शेती सिंचनाखाली आली. प्रकल्प पूर्ण करताना मात्र शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न दाखविण्यात आले. हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचा भास निर्माण केला गेला. प्रत्यक्षात शेतातील विहिरी आणि बोअरव्दारेच सर्वाधिक शेती ओलिताखाली आली. जिल्ह्यात जवळपास एक लाख विहिरींव्दारे सिंचन केले जाते. या विहिरी आणि बोअरवेलच्या भरवशावर शेतकरी कसे तरी तग धरून आहेत. तथापि खरिपात केवळ १५ टक्केच शेती या पाण्याने ओली होते. ८५ टक्के शेतीत कोरडवाहू पीक घेण्याशिवाय गत्यंतर नसते. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. कापूस, सोयाबीन, तूर कोरडवाहूच जिल्ह्यात नऊ लाख १० हजार हेक्टवर खरिपाची पेरणी होणार आहे. यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन व तुरीचे पीक घेतले जाणार आहे. मात्र यातील केवळ १० ते १२ टक्के अर्थात एक ते सव्वा लाख हेक्टर शेतीलाच शेतकरी पाणी देऊ शकतात. उर्वरित क्षेत्रात कोरडवाहू पीक घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यातही शेतकरी काळ्या आईची इमानइतबारे सेवा करून भरघोस पीक घेतात. मात्र योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होती. यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शेती ओलिताखाली आणण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नाही. त्यादृष्टीने जिल्ह्यातील प्रकल्पातून सिंचनासाठी पूर्ण ताकदीने पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे.