शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

जिल्ह्यातील १७ टक्केच शेती क्षेत्र सिंचनाखाली

By admin | Updated: May 8, 2017 00:17 IST

जिल्ह्यात केवळ १७ टक्केच शेती आत्तापर्यंत सिंचनाखाली आली. उर्वरित ८३ टक्के जमीन अद्याप कोरडवाहू असल्याने

प्रकल्प पांढरे हत्ती : शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न धुऱ्यावरच कोमेजले लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात केवळ १७ टक्केच शेती आत्तापर्यंत सिंचनाखाली आली. उर्वरित ८३ टक्के जमीन अद्याप कोरडवाहू असल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न अपूर्णच आहे. शेतकरी आत्महत्येमुळे जिल्ह्याची सर्व दूर ओळख झाली. त्याला आळा घालण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना आणल्या. धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम आखला. शेततळे, जलयुक्त शिवार योजना आणली. तरीही केवळ १७ टक्केच शेती ओली झाली. सिंचनाची सुविधा नसल्याने कोरडवाहू शेतीवरच शेतकऱ्यांची गुजराण सुरू आहे. त्यांचे दुबार पिकाचे स्वप्न कोमेजले आहे. यामुळे निराशेच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात एक मोठा, पाच मध्यम, तर ६२ लघु प्रकल्प आहेत. मात्र हे सर्व प्रकल्प पांढरे हत्ती ठरत आहे. त्यांच्याव्दारे नाममात्र शेती सिंचनाखाली आली. प्रकल्प पूर्ण करताना मात्र शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न दाखविण्यात आले. हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याचा भास निर्माण केला गेला. प्रत्यक्षात शेतातील विहिरी आणि बोअरव्दारेच सर्वाधिक शेती ओलिताखाली आली. जिल्ह्यात जवळपास एक लाख विहिरींव्दारे सिंचन केले जाते. या विहिरी आणि बोअरवेलच्या भरवशावर शेतकरी कसे तरी तग धरून आहेत. तथापि खरिपात केवळ १५ टक्केच शेती या पाण्याने ओली होते. ८५ टक्के शेतीत कोरडवाहू पीक घेण्याशिवाय गत्यंतर नसते. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. कापूस, सोयाबीन, तूर कोरडवाहूच जिल्ह्यात नऊ लाख १० हजार हेक्टवर खरिपाची पेरणी होणार आहे. यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन व तुरीचे पीक घेतले जाणार आहे. मात्र यातील केवळ १० ते १२ टक्के अर्थात एक ते सव्वा लाख हेक्टर शेतीलाच शेतकरी पाणी देऊ शकतात. उर्वरित क्षेत्रात कोरडवाहू पीक घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यातही शेतकरी काळ्या आईची इमानइतबारे सेवा करून भरघोस पीक घेतात. मात्र योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होती. यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शेती ओलिताखाली आणण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नाही. त्यादृष्टीने जिल्ह्यातील प्रकल्पातून सिंचनासाठी पूर्ण ताकदीने पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे.