शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमार्गावर बेशिस्त वाहतूक

By admin | Updated: March 15, 2015 00:26 IST

शहराच्या विस्तारासोबत वाहनांच्या वाढत्या संख्येने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. शहरातील वाहतुकीला कोणतीच शिस्त नसून वाटेल तेथे वाहने उभी केली जातात.

उमरखेड : शहराच्या विस्तारासोबत वाहनांच्या वाढत्या संख्येने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. शहरातील वाहतुकीला कोणतीच शिस्त नसून वाटेल तेथे वाहने उभी केली जातात. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असून अपघाताच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. झपाट्याने वाढणाऱ्या उमरखेड शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शालेय विद्यार्थ्यांजवळही वाहने आली आहे. परंतु त्या तुलनेत सुरक्षित वाहन चालविण्याचे आणि नियमांचे पालन करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. सध्या उमरखेड शहरातील वाहतूक अतिशय जोखमीची ठरते. नागपूर-बोरी-तुळजापूर हा मुख्य मार्ग शहरातून जातो. हा एकच मार्ग असल्याने या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. त्यात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि दोनही बाजूला दुकाने असल्याने ग्राहकांच्या वाहनांची पार्किंग असते. यामुळे एकच गोंधळ उडतो. अनेकदा वाहतुकीची कोंडी होण्याचा प्रसंग उद्भवतो. शहरातील संजय गांधी चौक, महागाव चौक, नांदेड रोड, ढाणकी रोड, पुसद रोड याठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा ठिय्या असतो. अतिशय बेशिस्त वाहने रस्त्यावर उभी असतात. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतो. गायत्री चौकात अवैध प्रवासी वाहतूक रहदारीला अडथळा ठरत आहे. मात्र पोलीस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. वसुलीच्या माध्यमातून अवैध वाहतूक करणाऱ्यांना खुली सूट दिल्याचे बोलले जात आहे. उल्लेखनीय म्हणजे महिला व विद्यार्थ्यांना या अस्ताव्यस्त वाहतुकीचा फटका सहन करावा लागतो. पोलिसांना विचारणा केले तर हे आमचे काम नाही असे सांगून ते मोकळे होतात. शहरात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली असली तरी त्याठिकाणी न दिसता शहराबाहेर ट्रकचालकांकडून वसुली करताना दिसून येतात. या सर्व बाबींमुळे उमरखेड शहरातील वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे.उमरखेड शहर भाजपाचे अध्यक्ष नितीन भुतडा यांनी याबाबत रोष व्यक्त करून वाहतूक पोलिसांबाबत प्रश्न उपस्थित केला. शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गासाठी बायपास द्यावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली परंतु उपयोग झाल नाही. राज्य मार्गालगत अतिक्रमण वाढले असून तेही काढले जात नाही. (शहर प्रतिनिधी)पुसद, महागाव, ढाणकी आणि नांदेड या मार्गावरील वाढते अतिक्रमण काढण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. मात्र शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्या आणि इतर व्यावसायिकांवर लवकरच कारवाई केली जाईल. तसेच महसूल, बांधकाम, पोलीस आणि नगरपरिषद संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबविणार आहे.- प्रवीण मानकर, मुख्याधिकारी, नगरपरिषदशहरात अवैध वाहतूक करणाऱ्या व रस्त्यामध्ये वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे शहरातील सर्व मुख्य चौकात पोलीस शिपाई नियुक्त करण्यात आले आहे. लवकरच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बाबींबाबत कारवाई केली जाईल.- शिवाजी बचाटे, ठाणेदार, उमरखेड