शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

मारेगाव तालुक्यात अनधिकृत वीज कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

मारेगाव तालुक्यात लाखाच्यावर घरगुती वीज जोडणी असून तीन हजार कृषी पंपाच्या वीज जोडण्या आहेत. या दोन्ही  वीज जोडणीची देयके थकलेली आहेत. लॉकडाऊनच्या काळात वीज बिल माफ होण्याच्या आशेने अनेक ग्राहकांनी देयकाचा भरणा केला नाही. नंतर एकाच वेळेस ग्राहकांना मोठ्या रकमेचे देयके प्राप्त झाल्याने मजूरदार व सर्वसामान्य ग्राहक या देयकाचा भरणा करू शकली नाही. त्यामुळे वीज वितरणने थकीत ग्राहकांची वीज खंडित केली. परंतु विजेच्या प्रकाशात राहायची सवय पडलेल्या या ग्राहकांनी आकोडे टाकून वीज जोडणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : वीज कंपनीकडून वारेमाप येणारी वीज देयके आणि लॉकडाऊनमध्ये वीज बिल माफीच्या आशेने थकलेली देयके, यामुळे अनेक वीज ग्राहकांकडे थकबाकी वाढली. सूचना देऊनही ग्राहक बिलाचा भरणा करीत नसल्याने वितरण कंपनीने अनेकांचा वीज पुरवठा खंडित केला. परिणामी विजेच्या प्रकाशात राहायची सवय पडलेल्या नागरिकांनी आता आकोडे टाकून वीज जोडण्या सुरू केल्याचे चित्र तालुक्यात आहे. तसेच कृषी पंपाच्या जोडण्याही अनधिकृत असल्याची माहिती समोर येत आहे.मारेगाव तालुक्यात लाखाच्यावर घरगुती वीज जोडणी असून तीन हजार कृषी पंपाच्या वीज जोडण्या आहेत. या दोन्ही  वीज जोडणीची देयके थकलेली आहेत. लॉकडाऊनच्या काळात वीज बिल माफ होण्याच्या आशेने अनेक ग्राहकांनी देयकाचा भरणा केला नाही. नंतर एकाच वेळेस ग्राहकांना मोठ्या रकमेचे देयके प्राप्त झाल्याने मजूरदार व सर्वसामान्य ग्राहक या देयकाचा भरणा करू शकली नाही. त्यामुळे वीज वितरणने थकीत ग्राहकांची वीज खंडित केली. परंतु विजेच्या प्रकाशात राहायची सवय पडलेल्या या ग्राहकांनी आकोडे टाकून वीज जोडणी केली. आज ग्रामीण भागात आकोडे टाकून वीज चोरी होत असल्याचे प्रमाण खूप वाढले आहे. काही वर्षांपूर्वी रात्री आकोडे टाकून वीज चोरी व्हायची. आता तर दिवस-रात्र अनधिकृत आकोडे टाकून वीज चोरी होत आहे. वीज वितरणचे कर्मचारी चिरीमिरी घेऊन या प्रकाराकडे डोळेझाक करीत आहे. याचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे, तर दुसरीकडे कृषी पंपाच्या वीज जोडण्यातही मोठा घोळ आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कृषी पंपाच्या जोडण्या आहेत. परंतु जोडण्या केल्या तेव्हापासून  या शेतकऱ्यांना देयकेच पाठविली गेली नाहीत. विशेष म्हणजे बऱ्याच कृषी पंप जोडणीची कार्यालयात नोंदच नाही. अनेक कृषी पंप ग्राहकांची नावे कार्यालयातून गायब आहेत. तालुक्यात विजेची मोठ्या प्रमाणात चोरी सुरू असताना महावितरण कंपनीकडून साधी चौकशीही होताना दिसत नाही. गेल्या अनेक वर्षात चोरीच्या कार्यवाहीचा आकडा नगण्य आहे. अनेकांचे मीटर बंद आहे. त्यामुळे वीज चोरी करणाने बिनधास्त झाले आहेत. 

१०५ गावांसाठी केवळ दोनच लाईनमन - तालुक्यात १०५ गावे आहेत. या १०५ गावासाठी केवळ दोन लाईनमन आहे. तर एका हेल्परकडे १५ ते २० गावाचा भार आहे. त्यामुळे वीज बिघाड व थकीत वसुली ही दोन कामेच ही मंडळी करीत असतात. आकोडे टाकून होणाऱ्या वीज चोरीची हेल्परला पूर्ण कल्पना असून चिरीमिरी घेऊन हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातील प्रकाशाला आकोड्याचा आधार मिळाल्याचे चित्र आहे. 

 

टॅग्स :electricityवीज