शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
3
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
4
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
5
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
6
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
7
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
8
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
9
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
10
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
11
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
12
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
13
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
14
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
15
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
16
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
17
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
18
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
19
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
20
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?

भर शहरात अनधिकृत कचरा डेपो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 21:31 IST

स्वच्छ भारत मिशनमध्ये रँकिंग मिळाल्याच्या वल्गना नगरपरिषदेकडून करण्यात आल्या. प्रत्यक्षात शहरातील स्थिती अतिशय बिकट आहे. आर्णी मार्गावर असलेल्या नगरपरिषदेच्या खुल्या जागेत अनधिकृत कचरा डोपो थाटला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पावसाचे पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे साथरोगाचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देयवतमाळ पालिकेचा कारभार । घंटागाड्या रिचविण्यासाठी जागाच नाही, आर्णी मार्गावर दुर्गंधी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वच्छ भारत मिशनमध्ये रँकिंग मिळाल्याच्या वल्गना नगरपरिषदेकडून करण्यात आल्या. प्रत्यक्षात शहरातील स्थिती अतिशय बिकट आहे. आर्णी मार्गावर असलेल्या नगरपरिषदेच्या खुल्या जागेत अनधिकृत कचरा डोपो थाटला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पावसाचे पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे साथरोगाचा धोका निर्माण झाला आहे.नगरपरिषद आरोग्य विभाग प्रत्येक पावसाळ््यात अभ्यंकर कन्या शाळेसमोर असलेल्या खुल्या जागेत कचरा साठवत आहे. यामुळे त्रस्त नागरिक तक्रारी करतात. त्यानंतर पालिकेकडून थातूरमातूर व्यवस्था केली जाते. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. एकीकडे स्वच्छ शहरासाठी कचरा विलगीकरणाची संकल्पना राबविली जात असल्याचे सांगण्यात येते. स्वच्छता कंत्राटदारासोबत करार केल्यानंतर त्यामध्ये कचरा विलगीकरण आणि दैनंदिन कचºयाची रोज विल्हेवाट लावण्याचे नमूद केले आहे. त्यानंतरही करारातील अटींचे पालन होताना दिसत नाही. जागा मिळेल तिथे कचरा टाकला जात आहे. नागरिकांचा दबाव वाढल्यानंतर तो उचलण्यात येईल असे सांगितले जाते. प्रत्यक्ष जितका कचरा तेथे टाकतात, त्याच्या पाच ते दहा टक्के कचरा उचलला जातो. या ढिगाºयामध्ये पावसाचे पाणी मुरल्याने उग्र दर्प येत आहे. दत्त चौकात जाणाºया मार्गावर अक्षरश: नाक बंद करूनच जावे लागते. माशा व डासांची उत्पत्ती नगरपरिषदेकडून केली जात आहे. यामुळेच शहरात डेंग्यू व हिवतापाचे रुग्ण आढळतात. कचरा विलगीकरण तर दूरच तांत्रिक निर्देशाचेही पालन केले जात नाही. तीन प्रभागातील कचरा एकाच ठिकाणी दररोज साठविला जात आहे. आरोग्य विभागाने याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मागील पाच वर्षापासून ही समस्या सतावत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. यावर अद्यापपर्यंत कायमस्वरूपी तोडगा काढला नाही. उलट महिन्याकाठी स्वच्छतेची लाखो रूपयांची देयके काढली जात आहे. नगरपरिषदेच्या एकूूण खर्चापैकी मोठी रक्कम घनकचरा व्यवस्थापनावर खर्च होते. त्यानंतरही परिस्थिती सुधारलेली नाही. आरोग्य विभागाकडून साथरोग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आली नाही.नगरसेवक आंदोलन करण्याच्या तयारीतशहरातील विविध प्रभागातून गोळा केलेला कचरा टाकण्यासाठी नगरपरिषदेकडे जागाच नाही. त्यामुळे रात्री अथवा पहाटे जागा मिळेल तिथे कचरा टाकला जात आहे. पावसाळ्यात घरात कचरा ठेवणेही शक्य होत नाही. त्यामुळे नगरसेवकांवर दबाव वाढत आहे. प्रशासनाला वारंवार निवदेन देऊनही तोडगा काढला जात नाही. यामुळे नगरसेवक उग्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

टॅग्स :dumpingकचरा