शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

७० हजार मुले माता-पित्यांना पोसण्यास असमर्थ

By admin | Updated: February 22, 2016 02:40 IST

शिक्षित समाजात मानवी संवेदना हरवत चालल्या आहेत. मुलांना आपले माता पिता जड वाटायला लागले आहेत.

‘श्रावणबाळ’साठी बाँड : शिक्षित समाजातील मनसुन्न करणारी घटनायवतमाळ : शिक्षित समाजात मानवी संवेदना हरवत चालल्या आहेत. मुलांना आपले माता पिता जड वाटायला लागले आहेत. या मुलांनी आपल्या जन्मदात्यांना पोसण्यास असमर्थ असल्याचा बाँड शासनाकडे सादर केला आहे. या दुर्दैवी घटनेने मानव समाजाला विचार करण्यास भाग पाडले आहे. असे एक दोन नव्हेतर जिल्ह्यात ७० हजार आधुनिक श्रावणबाळ आहेत. सत्ययुगातील श्रावणबाळाने आपल्या माता पित्यांची इच्छा पूर्ण करता यावी म्हणून खांद्यावर कावड धरली. तिर्थयात्रा घडवून आणली. याच श्रावणबाळाप्रमाणे मुलांनी वृद्ध माता पितांच्या आयुष्याची काठी व्हावे म्हणून राज्य शासनाने श्रावणबाळ योजना सुरू केली. परंतु समाजात स्वार्थ इतका वाढला आहे, की धडधाकट मुलेही आपल्या माता पित्यांचा सांभाळ करायला तयार नाहीत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मुलांनी एकाकी सोडल्याने निराधार पालकांनी शासनाचे दार ठोठावले आहे. या मुलांनी आपल्या पालकांना पोसणे अशक्य असल्याचे लिहिले आहे. यामधून समाजाची ढासाळलेली नीतिमत्ता दिसून येते. मुलांना लहानाचे मोठे करण्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्या, त्याचे हेच फळ काय, असे म्हणण्याची वेळ या माता पित्यांवर आली आहे. आपले दु:ख कुणाला सांगावे आणि कुणापुढे रडावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. असे आहेत निराधार माता पिताजिल्ह्यात श्रावणबाळ योजनेमध्ये ७३ हजार ६२७ निराधार माता पित्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील ७० हजार माता पित्यांच्या मुलांनी आपण असमर्थ असल्याचे शपथपत्र शासन दरबारी सादर केले आहे. यवतमाळ तालुक्यात ५०४०, शहरी भागात २१६८ निराधार माता पिता आहेत. केवळ योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या माता-पित्यांना पोसण्यास असमर्थ असल्याचे लिहून देणारे आधुनिक श्रावणबाळ सध्या चर्चेचा विषय झाला आहे. (शहर वार्ताहर)