शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

७० हजार मुले माता-पित्यांना पोसण्यास असमर्थ

By admin | Updated: February 22, 2016 02:40 IST

शिक्षित समाजात मानवी संवेदना हरवत चालल्या आहेत. मुलांना आपले माता पिता जड वाटायला लागले आहेत.

‘श्रावणबाळ’साठी बाँड : शिक्षित समाजातील मनसुन्न करणारी घटनायवतमाळ : शिक्षित समाजात मानवी संवेदना हरवत चालल्या आहेत. मुलांना आपले माता पिता जड वाटायला लागले आहेत. या मुलांनी आपल्या जन्मदात्यांना पोसण्यास असमर्थ असल्याचा बाँड शासनाकडे सादर केला आहे. या दुर्दैवी घटनेने मानव समाजाला विचार करण्यास भाग पाडले आहे. असे एक दोन नव्हेतर जिल्ह्यात ७० हजार आधुनिक श्रावणबाळ आहेत. सत्ययुगातील श्रावणबाळाने आपल्या माता पित्यांची इच्छा पूर्ण करता यावी म्हणून खांद्यावर कावड धरली. तिर्थयात्रा घडवून आणली. याच श्रावणबाळाप्रमाणे मुलांनी वृद्ध माता पितांच्या आयुष्याची काठी व्हावे म्हणून राज्य शासनाने श्रावणबाळ योजना सुरू केली. परंतु समाजात स्वार्थ इतका वाढला आहे, की धडधाकट मुलेही आपल्या माता पित्यांचा सांभाळ करायला तयार नाहीत. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मुलांनी एकाकी सोडल्याने निराधार पालकांनी शासनाचे दार ठोठावले आहे. या मुलांनी आपल्या पालकांना पोसणे अशक्य असल्याचे लिहिले आहे. यामधून समाजाची ढासाळलेली नीतिमत्ता दिसून येते. मुलांना लहानाचे मोठे करण्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्या, त्याचे हेच फळ काय, असे म्हणण्याची वेळ या माता पित्यांवर आली आहे. आपले दु:ख कुणाला सांगावे आणि कुणापुढे रडावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. असे आहेत निराधार माता पिताजिल्ह्यात श्रावणबाळ योजनेमध्ये ७३ हजार ६२७ निराधार माता पित्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील ७० हजार माता पित्यांच्या मुलांनी आपण असमर्थ असल्याचे शपथपत्र शासन दरबारी सादर केले आहे. यवतमाळ तालुक्यात ५०४०, शहरी भागात २१६८ निराधार माता पिता आहेत. केवळ योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या माता-पित्यांना पोसण्यास असमर्थ असल्याचे लिहून देणारे आधुनिक श्रावणबाळ सध्या चर्चेचा विषय झाला आहे. (शहर वार्ताहर)