शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

उमरसरा परिसर दीड वर्षांपासून तहानलेला

By admin | Updated: January 18, 2017 00:12 IST

शहरातील उमरसरा परिसरातील यशोधरानगरात तब्बल दीड वर्षापासून नळाला पाणीच नाही.

नळच नाही : प्राधिकरण म्हणते लवकरच नियमित पाणी यवतमाळ : शहरातील उमरसरा परिसरातील यशोधरानगरात तब्बल दीड वर्षापासून नळाला पाणीच नाही. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल सुरू आहेत. आता २६ जानेवारीपर्यंत या परिसरातील नळांना पाणी येईल, असे आश्वासन जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आले आहे. उमरसरा परिसरातील निखिल नगर, यशोधरानगरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. सुरुवातीला अतिशय फोर्सने या ठिकाणी नळाला पाणी येत असल्याने अनेकांनी या परिसरात घरे बांधली. परंतु नंतर कमी दाबाने आणि गेल्या दीड वर्षापासून नळाला पाणी येणेच बंद झाले. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्राधिकरणाकडून दुर्लक्ष करण्यात आले. उल्लेखनिय म्हणजे पाणी जरी प्राधिकरणाकडून मिळत नसले तरी नळाचे बील नियमित येत आहे आणि नागरिक ते भरतही आहेत. तरीदेखील प्राधिकरणाकडून आवश्यक ते पाऊले उचलली गेली नाही. मध्यतंरी दोन-तीन अभियंता बदलून गेले. नव्याने आलेल्या अभियंत्याला पुन्हा सर्व काही सांगावे लागले. आता नागरिकांच्या संयमाचा बांध फुटल्याने त्यांनी प्राधिकरणावर रोष व्यक्त केल्याने प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या आहेत. उन्हाळा तर सोडाच पावसाळा व हिवाळ्यातही या परिसरात नळाला पाणी नाही. उल्लेखनिय म्हणजे या परिसरात बोअरवेलला पाणी लागत नाही. त्यामुळे विहिरी व हातपंपही नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. जीवन प्राधिकरणासोबतच आता नगर परिषदने तरी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांमधून होत आहे. (प्रतिनिधी)