शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

उमरसरा परिसर दीड वर्षांपासून तहानलेला

By admin | Updated: January 18, 2017 00:12 IST

शहरातील उमरसरा परिसरातील यशोधरानगरात तब्बल दीड वर्षापासून नळाला पाणीच नाही.

नळच नाही : प्राधिकरण म्हणते लवकरच नियमित पाणी यवतमाळ : शहरातील उमरसरा परिसरातील यशोधरानगरात तब्बल दीड वर्षापासून नळाला पाणीच नाही. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल सुरू आहेत. आता २६ जानेवारीपर्यंत या परिसरातील नळांना पाणी येईल, असे आश्वासन जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आले आहे. उमरसरा परिसरातील निखिल नगर, यशोधरानगरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. सुरुवातीला अतिशय फोर्सने या ठिकाणी नळाला पाणी येत असल्याने अनेकांनी या परिसरात घरे बांधली. परंतु नंतर कमी दाबाने आणि गेल्या दीड वर्षापासून नळाला पाणी येणेच बंद झाले. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्राधिकरणाकडून दुर्लक्ष करण्यात आले. उल्लेखनिय म्हणजे पाणी जरी प्राधिकरणाकडून मिळत नसले तरी नळाचे बील नियमित येत आहे आणि नागरिक ते भरतही आहेत. तरीदेखील प्राधिकरणाकडून आवश्यक ते पाऊले उचलली गेली नाही. मध्यतंरी दोन-तीन अभियंता बदलून गेले. नव्याने आलेल्या अभियंत्याला पुन्हा सर्व काही सांगावे लागले. आता नागरिकांच्या संयमाचा बांध फुटल्याने त्यांनी प्राधिकरणावर रोष व्यक्त केल्याने प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या आहेत. उन्हाळा तर सोडाच पावसाळा व हिवाळ्यातही या परिसरात नळाला पाणी नाही. उल्लेखनिय म्हणजे या परिसरात बोअरवेलला पाणी लागत नाही. त्यामुळे विहिरी व हातपंपही नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. जीवन प्राधिकरणासोबतच आता नगर परिषदने तरी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांमधून होत आहे. (प्रतिनिधी)