शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडचा रबी हंगाम भारनियमनात अडकणार

By admin | Updated: November 4, 2016 02:09 IST

परतीच्या पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांची आशा रबी हंगामावर आहे.

सिंचनात अडथळा : मुबलक पाणी, मात्र वीज अनियमितउमरखेड : परतीच्या पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांची आशा रबी हंगामावर आहे. मुबलक पावसामुळे नदीनाले आणि विहिरींमध्ये तुडूंब पाणी आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु भारनियमनाचा कोलदांडा कायम असल्याने रबी हंगामही साधण्याची शक्यता नाही. सध्या हरभऱ्याची पेरणी केली जात असताना भारनियमनामुळे ओलीत करणे उमरखेड तालुक्यात अशक्य झाले आहे. गत काही वर्षांपासून उमरखेड तालुक्यातील शेतकरी सातत्याने दुष्काळाचा सामना करीत आहे. यावर्षी सुरुवातीला मुबलक पावसाने पीक परिस्थिती उत्तम होती. परंतु त्यानंतर पडलेला खंड आणि परतीच्या पावसाने सोयाबीन पुरते उद्ध्वस्त झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले होते. त्यानंतरही हाती आलेला सोयाबीन बाजारात कमी दरात विकावा लागला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. अशीच अवस्था कपाशीची आहे. कपाशीवर सध्या लाल्याने आक्रमण केले आहे. त्यामुळे कपाशीचे पीकही हातचे जाण्याची स्थिती आहे. सोयाबीन काढणी झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा पेरण्याचे नियोजन केले आहे. शेत पेरणीसाठी सज्ज केले परंतु भारनियमनामुळे ओलित करणे शक्य होत नाही. सहा ते सात तासांचे भारनियमन होत असून रात्री-अपरात्री वीज पुरवठा होतो. तसेच कमी दाबाचा वीज पुरवठाही कायम असतो. याचा फटका रबीला बसत आहे.उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील जेवली परिसरातील शेतकरी तर भारनियमनाने त्रस्त झाले आहे. पैनगंगेसह इतर जलस्रोतांवर मोटारपंप लावून शेतकऱ्यांनी रबीची तयारी केली. डोळ्याने मुबलक पाणी दिसत असतानाही ओलित करणे मात्र अशक्य होत आहे. वीज वितरण कंपनीने कृषी पंपांना योग्य वेळात योग्य दाबाने वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. परंतु अद्यापही बंदी भागात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. (शहर प्रतिनिधी)