शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उमरखेडचा रबी हंगाम भारनियमनात अडकणार

By admin | Updated: November 4, 2016 02:09 IST

परतीच्या पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांची आशा रबी हंगामावर आहे.

सिंचनात अडथळा : मुबलक पाणी, मात्र वीज अनियमितउमरखेड : परतीच्या पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांची आशा रबी हंगामावर आहे. मुबलक पावसामुळे नदीनाले आणि विहिरींमध्ये तुडूंब पाणी आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु भारनियमनाचा कोलदांडा कायम असल्याने रबी हंगामही साधण्याची शक्यता नाही. सध्या हरभऱ्याची पेरणी केली जात असताना भारनियमनामुळे ओलीत करणे उमरखेड तालुक्यात अशक्य झाले आहे. गत काही वर्षांपासून उमरखेड तालुक्यातील शेतकरी सातत्याने दुष्काळाचा सामना करीत आहे. यावर्षी सुरुवातीला मुबलक पावसाने पीक परिस्थिती उत्तम होती. परंतु त्यानंतर पडलेला खंड आणि परतीच्या पावसाने सोयाबीन पुरते उद्ध्वस्त झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले होते. त्यानंतरही हाती आलेला सोयाबीन बाजारात कमी दरात विकावा लागला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. अशीच अवस्था कपाशीची आहे. कपाशीवर सध्या लाल्याने आक्रमण केले आहे. त्यामुळे कपाशीचे पीकही हातचे जाण्याची स्थिती आहे. सोयाबीन काढणी झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामात हरभरा पेरण्याचे नियोजन केले आहे. शेत पेरणीसाठी सज्ज केले परंतु भारनियमनामुळे ओलित करणे शक्य होत नाही. सहा ते सात तासांचे भारनियमन होत असून रात्री-अपरात्री वीज पुरवठा होतो. तसेच कमी दाबाचा वीज पुरवठाही कायम असतो. याचा फटका रबीला बसत आहे.उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील जेवली परिसरातील शेतकरी तर भारनियमनाने त्रस्त झाले आहे. पैनगंगेसह इतर जलस्रोतांवर मोटारपंप लावून शेतकऱ्यांनी रबीची तयारी केली. डोळ्याने मुबलक पाणी दिसत असतानाही ओलित करणे मात्र अशक्य होत आहे. वीज वितरण कंपनीने कृषी पंपांना योग्य वेळात योग्य दाबाने वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. परंतु अद्यापही बंदी भागात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. (शहर प्रतिनिधी)