शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड तालुक्यात कडब्याचे भाव भिडले गगनाला

By admin | Updated: July 10, 2014 23:55 IST

हक्काचे नक्षत्र कोरडे गेल्यामुळे परिसरात अवर्षणप्रवण स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या फटक्यातून सावरण्यापूर्वीच यंदाही पावसाने शेतकऱ्यांशी क्रूर डाव खेळल्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र

उमरखेड : हक्काचे नक्षत्र कोरडे गेल्यामुळे परिसरात अवर्षणप्रवण स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या फटक्यातून सावरण्यापूर्वीच यंदाही पावसाने शेतकऱ्यांशी क्रूर डाव खेळल्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र पूरते अवसान गळाले आहे. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर वळणावर असून कडब्याच्या पेंडीचे भावही गगनाला भिडले आहेत. पावसाने दडी मारल्यामुळे सिंचन तलाव, नदी-नाले संपूर्णत: कोरडे ठण्ण पडले आहेत. पेरणीची आशा गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता पशुधन कसे वाचवावे, हा प्रश्न पडला आहे. ओला चाऱ्याबरोबरच सुक्या चाऱ्याचीही तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गोठ्यात असलेले पशुधन वाचविण्यासाठी शेतकरी जीवाचा आटापिटा करीत आहे. मृग आणि आर्द्रा नक्षत्रातील पावसाच्या दडीमुळे जमिनीवर गवतसुद्धा उगवले नाही. ओला चारा नष्ट झाला आहे. सुक्या चाऱ्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना कडब्याची एक पेंडी २० रुपयाला विकत घ्यावी लागत आहे. सन २०१२ मध्ये ९ जुलैपर्यंत १७६ मि.मी. पाऊस कोसळला होता. मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे २० वर्षाचे रेकॉर्ड तुटून परिसरात ९ जुलैपर्यंत तब्बल ६५२ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. सन २०१२ व सन २०१३ च्या तुलनेत यंदा परिसरात अत्यल्प पाऊस पडला आहे. यंदा ९ जुलैपर्यंत केवळ २९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परिसरातील पाण्याचे सर्व स्रोत आटले आहे. जुलै महिन्यातही अनेक गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. संपूर्ण तालुक्यातच कोरडा दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली असून ग्रामीण भागातील अर्थकारण मात्र बिघडले आहे. आता तालुक्याची संपूर्ण भिस्त इसापूर धरणातून विसर्ग होणाऱ्या पाण्यावरच अवलंबून आहे. (प्रतिनिधी)