शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उमरखेडकरांनो, भीती बाळगू नका

By admin | Updated: September 21, 2016 01:57 IST

गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणानंतर शहरातील तणाव पूर्णत: निवळला असून दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहे.

अखिलेशकुमार सिंह : जातीय सलोख्यासाठी पोलिसांचे पुन्हा प्रयत्नअविनाश खंदारे उमरखेड गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणानंतर शहरातील तणाव पूर्णत: निवळला असून दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहे. दोषी व्यक्तीवर कारवाई केली जाईल. परंतु या प्रकरणात कोणत्याही निर्दोष व्यक्तीला नाहक त्रास दिला जाणार नाही. त्यामुळे उमरखेड शहरातील नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गणेश विसर्जनाच्या दिवशी उमरखेड शहरात मिरवणुकीवर दगडफेक झाली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. यात पोलीस अधिकारी-कर्मचारी व नागरिक जखमी झाले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. त्यामुळेच स्थिती नियंत्रणात आली असे अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले. आतापर्यंत या प्रकरणात ४२ जणांना अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास घेत आहे. मिरवणुकीदरम्यान झालेल्या दोन गटांच्या वादात कोण दोषी आहे याचा शोध घेणे सुरू आहे. कुणावरच हेतुपुरस्सर अन्याय केला जाणार नाही, जे दोषी असतील त्यांच्यावर मात्र कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.मी स्वत: गेल्या तीन दिवसांपासून उमरखेड शहरात तळ ठोकून आहो. शहरात पायी फेरफटका मारुन सलोखा निर्माण करण्यासाठी बैठका घेत आहो. नागरिकांशी संवाद साधत आहो. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कुठलीही भीतीची भावना राहू नये यासाठी शहरातील आठवडीबाजार, तारपुरा वार्ड, उमरखेड बसस्थानक, पुसद रोड, महागाव रोड, नांदेड रोड, नाग चौक या भागात फेरफटका मारला. नागरिकांना शांततेचा आवाहन करीत आहो. गणेश विसर्जन मिरवणूक व मिरवणूक मार्गाची पाहणी केली आहे. आता शहर पूर्वपदावर आले असून शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिसांची करड नजर असल्याचे अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले. उमरखेड शहरात रात्री मोठ्या प्रमाणात नाकाबंदी केली जात आहे. शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू आहे. रात्रीला संपूर्ण शहरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी रात्री १० वाजतानंतर विनाकारण बाहेर निघू नये, कुणी यावेळी संशयित वाटला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. उमरखेड शहरातून अनेक जण बाहेरगावी गेले आहे. त्यांनी शहरात परतावे, जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.