शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडकरांनो, भीती बाळगू नका

By admin | Updated: September 21, 2016 01:57 IST

गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणानंतर शहरातील तणाव पूर्णत: निवळला असून दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहे.

अखिलेशकुमार सिंह : जातीय सलोख्यासाठी पोलिसांचे पुन्हा प्रयत्नअविनाश खंदारे उमरखेड गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणानंतर शहरातील तणाव पूर्णत: निवळला असून दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहे. दोषी व्यक्तीवर कारवाई केली जाईल. परंतु या प्रकरणात कोणत्याही निर्दोष व्यक्तीला नाहक त्रास दिला जाणार नाही. त्यामुळे उमरखेड शहरातील नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गणेश विसर्जनाच्या दिवशी उमरखेड शहरात मिरवणुकीवर दगडफेक झाली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. यात पोलीस अधिकारी-कर्मचारी व नागरिक जखमी झाले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. त्यामुळेच स्थिती नियंत्रणात आली असे अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले. आतापर्यंत या प्रकरणात ४२ जणांना अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास घेत आहे. मिरवणुकीदरम्यान झालेल्या दोन गटांच्या वादात कोण दोषी आहे याचा शोध घेणे सुरू आहे. कुणावरच हेतुपुरस्सर अन्याय केला जाणार नाही, जे दोषी असतील त्यांच्यावर मात्र कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.मी स्वत: गेल्या तीन दिवसांपासून उमरखेड शहरात तळ ठोकून आहो. शहरात पायी फेरफटका मारुन सलोखा निर्माण करण्यासाठी बैठका घेत आहो. नागरिकांशी संवाद साधत आहो. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कुठलीही भीतीची भावना राहू नये यासाठी शहरातील आठवडीबाजार, तारपुरा वार्ड, उमरखेड बसस्थानक, पुसद रोड, महागाव रोड, नांदेड रोड, नाग चौक या भागात फेरफटका मारला. नागरिकांना शांततेचा आवाहन करीत आहो. गणेश विसर्जन मिरवणूक व मिरवणूक मार्गाची पाहणी केली आहे. आता शहर पूर्वपदावर आले असून शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिसांची करड नजर असल्याचे अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले. उमरखेड शहरात रात्री मोठ्या प्रमाणात नाकाबंदी केली जात आहे. शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू आहे. रात्रीला संपूर्ण शहरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी रात्री १० वाजतानंतर विनाकारण बाहेर निघू नये, कुणी यावेळी संशयित वाटला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. उमरखेड शहरातून अनेक जण बाहेरगावी गेले आहे. त्यांनी शहरात परतावे, जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.