शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

उमरखेडकरांनो, भीती बाळगू नका

By admin | Updated: September 21, 2016 01:57 IST

गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणानंतर शहरातील तणाव पूर्णत: निवळला असून दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहे.

अखिलेशकुमार सिंह : जातीय सलोख्यासाठी पोलिसांचे पुन्हा प्रयत्नअविनाश खंदारे उमरखेड गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणानंतर शहरातील तणाव पूर्णत: निवळला असून दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहे. दोषी व्यक्तीवर कारवाई केली जाईल. परंतु या प्रकरणात कोणत्याही निर्दोष व्यक्तीला नाहक त्रास दिला जाणार नाही. त्यामुळे उमरखेड शहरातील नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गणेश विसर्जनाच्या दिवशी उमरखेड शहरात मिरवणुकीवर दगडफेक झाली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. यात पोलीस अधिकारी-कर्मचारी व नागरिक जखमी झाले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. त्यामुळेच स्थिती नियंत्रणात आली असे अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले. आतापर्यंत या प्रकरणात ४२ जणांना अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास घेत आहे. मिरवणुकीदरम्यान झालेल्या दोन गटांच्या वादात कोण दोषी आहे याचा शोध घेणे सुरू आहे. कुणावरच हेतुपुरस्सर अन्याय केला जाणार नाही, जे दोषी असतील त्यांच्यावर मात्र कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.मी स्वत: गेल्या तीन दिवसांपासून उमरखेड शहरात तळ ठोकून आहो. शहरात पायी फेरफटका मारुन सलोखा निर्माण करण्यासाठी बैठका घेत आहो. नागरिकांशी संवाद साधत आहो. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कुठलीही भीतीची भावना राहू नये यासाठी शहरातील आठवडीबाजार, तारपुरा वार्ड, उमरखेड बसस्थानक, पुसद रोड, महागाव रोड, नांदेड रोड, नाग चौक या भागात फेरफटका मारला. नागरिकांना शांततेचा आवाहन करीत आहो. गणेश विसर्जन मिरवणूक व मिरवणूक मार्गाची पाहणी केली आहे. आता शहर पूर्वपदावर आले असून शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिसांची करड नजर असल्याचे अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले. उमरखेड शहरात रात्री मोठ्या प्रमाणात नाकाबंदी केली जात आहे. शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू आहे. रात्रीला संपूर्ण शहरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी रात्री १० वाजतानंतर विनाकारण बाहेर निघू नये, कुणी यावेळी संशयित वाटला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. उमरखेड शहरातून अनेक जण बाहेरगावी गेले आहे. त्यांनी शहरात परतावे, जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.