शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

उमरखेडकरांनो, भीती बाळगू नका

By admin | Updated: September 21, 2016 01:57 IST

गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणानंतर शहरातील तणाव पूर्णत: निवळला असून दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहे.

अखिलेशकुमार सिंह : जातीय सलोख्यासाठी पोलिसांचे पुन्हा प्रयत्नअविनाश खंदारे उमरखेड गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणानंतर शहरातील तणाव पूर्णत: निवळला असून दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहे. दोषी व्यक्तीवर कारवाई केली जाईल. परंतु या प्रकरणात कोणत्याही निर्दोष व्यक्तीला नाहक त्रास दिला जाणार नाही. त्यामुळे उमरखेड शहरातील नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गणेश विसर्जनाच्या दिवशी उमरखेड शहरात मिरवणुकीवर दगडफेक झाली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. यात पोलीस अधिकारी-कर्मचारी व नागरिक जखमी झाले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. त्यामुळेच स्थिती नियंत्रणात आली असे अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले. आतापर्यंत या प्रकरणात ४२ जणांना अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास घेत आहे. मिरवणुकीदरम्यान झालेल्या दोन गटांच्या वादात कोण दोषी आहे याचा शोध घेणे सुरू आहे. कुणावरच हेतुपुरस्सर अन्याय केला जाणार नाही, जे दोषी असतील त्यांच्यावर मात्र कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.मी स्वत: गेल्या तीन दिवसांपासून उमरखेड शहरात तळ ठोकून आहो. शहरात पायी फेरफटका मारुन सलोखा निर्माण करण्यासाठी बैठका घेत आहो. नागरिकांशी संवाद साधत आहो. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कुठलीही भीतीची भावना राहू नये यासाठी शहरातील आठवडीबाजार, तारपुरा वार्ड, उमरखेड बसस्थानक, पुसद रोड, महागाव रोड, नांदेड रोड, नाग चौक या भागात फेरफटका मारला. नागरिकांना शांततेचा आवाहन करीत आहो. गणेश विसर्जन मिरवणूक व मिरवणूक मार्गाची पाहणी केली आहे. आता शहर पूर्वपदावर आले असून शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिसांची करड नजर असल्याचे अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले. उमरखेड शहरात रात्री मोठ्या प्रमाणात नाकाबंदी केली जात आहे. शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू आहे. रात्रीला संपूर्ण शहरात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी रात्री १० वाजतानंतर विनाकारण बाहेर निघू नये, कुणी यावेळी संशयित वाटला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. उमरखेड शहरातून अनेक जण बाहेरगावी गेले आहे. त्यांनी शहरात परतावे, जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.