शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मक्ता-बटाईने शेती कसणाऱ्यांना मिळाला न्याय

By admin | Updated: April 11, 2017 00:04 IST

मक्ता-बटाईने शेती करून काळ््या आईत राबणाऱ्या खऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत मोबदला मिळत नव्हता.

संजय राठोड यांचा पुढाकार : ‘लोकमत’ने दोन वर्षांपूर्वी मांडली व्यथासुरेंद्र राऊत यवतमाळ मक्ता-बटाईने शेती करून काळ््या आईत राबणाऱ्या खऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत मोबदला मिळत नव्हता. अपार कष्ट उपसूनही उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या मदतीचे पैसे मूळ शेतकऱ्यांच्या खात्यात जात होते. यासंदर्भात दोन वर्षापूर्वी ‘लोकमत’ने मक्ता-बटाईदार शेतकऱ्यांची व्यथा मांडली. अखेर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी या संदर्भातील विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारीत करून घेतले. या निर्णयाने राज्यातील खऱ्या शेतकऱ्यांना आता न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यात अनेक भूमिहिन दुसऱ्याची शेती मक्ता-बटाईने घेऊन कसतात. वर्षभर स्वत:चीच जमीन म्हणून त्यात घाम गाळतात. राज्यात अशा शेतकऱ्यांची संख्या २० लाखांवर आहे. एकट्या विदर्भातच सहा लाखांवर असे भूमिहिन शेतकरी आहेत. ग्रामीण भागातील शेतजमीनीचा सात-बारा असणारा वर्ग मोठ्या प्रमाणात शहरात स्थायिक झाला आहे. बहुतांश शेती ही शासकीय नोकरदार, कंत्राटदार, व्यापारी, व्यावसायिक यांच्या मालकीची आहे. त्यामुळे या वर्गाची शेती अलिखीत व्यवहारातून मक्ता-बटाईने करणाऱ्या भूमिहिन शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. या भूमिहिन शेतकऱ्याला कायद्याच्या कक्षेत कुठलेही संरक्षण नव्हते. पीक कर्जमाफी असो, नैसर्गिक आपत्तीची मदत असो, त्याचा फायदा थेट सात-बाराधारक व्यक्तीलाच मिळत होता. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी या समस्येला वाचा फोडण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतीच्या भाडेपट्टीचा व्यवहार कायद्याच्या कक्षेत आणणारे विधेयक मंजूर करून घेतले. यामुळे आता मक्ता-बटाईच्या शेतात घाम गाळणाऱ्या भूमिहिन शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे. १०० रुपयांच्या नोंदणीकृत प्रतिज्ञापत्रावर भाडे करार करता येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया नि:शुल्क असून, त्यात शासनाचा हस्तक्षेप राहणार नाही. यामुळे जमीन भाडेपट्टीने अथवा बटाईने देणाऱ्या जमीन मूळ मालकालाही कायदेशीर हक्क प्राप्त झाला आहे. जमिनीवर कुळ लावण्याची भीती पूर्णत: नष्ट झाली आहे, तर भाड्याने जमीन कसणाऱ्या भूमिहिन शेतकऱ्यालाही शासनाच्या शेतीविषयक योजनांचा लाभ यापुढे मिळणार आहे.मोठ्या प्रमाणात पडित असलेली जमीनही वहितीखाली येऊन जमीन मालक व शेती कसणाऱ्याला संरक्षण मिळणार.शेती भाड्याने घेऊन ती कसणारा जमीन बळकावेल याची भीती जमीन मालकाला राहणार नाही. मक्ता-बटाईने शेती कसणाऱ्या शेतकऱ्याला भाडे करार दाखवून पीक कर्ज मिळणार. नापिकी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीचा मोबदला मक्ता-बटाईने शेती कसणाऱ्याला मिळणार. गावगाड्यात तोंडी होणारा व्यवहार आता कराराच्या स्वरूपात अधिकृत केला जाणार. जमिनीच्या मालकीचा दावा दाखल केल्यास भाडेपट्टीने शेती कसणाऱ्यावर थेट गुन्हा दाखल होणार.