शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उजाला योजना नव्या स्वरुपात

By admin | Updated: February 3, 2017 02:12 IST

केंद्र सरकार आणि महावितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उर्जा बचतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उजाला’

दुसरा टप्पा : केवळ ६५ रुपयात ९ वॅटचे दिवेयवतमाळ : केंद्र सरकार आणि महावितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उर्जा बचतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘उजाला’ योजनेचा दुसरा टप्पा येत्या दोन-तीन दिवसात यवतमाळ शहरात राबविण्यात येत आहे. उल्लेखनिय म्हणजे एका बिलावर प्रत्येकी ६५ रुपयांप्रमाणे नऊ वॅटचे दहा दिवे मिळू शकतील. पहिल्या टप्प्यात सात वॅटच्या दिव्याची किंमत शंभर रुपये होती. त्यामुळे आता ही योजना अधिक ग्राहकाभिमुख करण्यात आली आहे.महावितरणच्या मुख्य कार्यालयासह शहरातील इतर ठिकाणी दिलेल्या पॉइंटवरून या दिव्यांची विक्री सुरू करण्यात येईल. राज्यात सध्या मुंबई, पणे, अहमदनगर व ठाणे येथे तर विदर्भात सध्या अकोला व अमरावतीला हा दुसरा टप्पा सुरू आहे. त्यानंतर आता यवतमाळचा समावेश करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांमध्येही टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या ‘एनर्जी इफीशीयन्सी सर्व्हिस लिमिटेड’ कंपनीमार्फत ही योजना देशपातळीवर राबविली जात आहे. नागरिकांना एका विद्युत बिलावर ९ वॅटचे जास्तीज जास्त दहा बल्ब मिळू शकेल. विद्युत बिल नसल्यास आधार कार्ड अथवा दुसरे अधिकृत आयडी प्रुफही चालू शकेल. या योजनेमुळे उर्जा बचतीसह ग्राहकांच्या वी बिलात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत आर्थिक बचत होणार आहे. शहरातील हजारो वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ यापूर्वी घेतला आहे. यापूर्वी सात वॅटचा बल्ब १०० रुपयाला होता. यामध्ये आता मोठा बदल करण्यात आला असून केवळ ६५ रुपयाला नऊ वॅटचा बल्ब मिळेल. दरम्यान बाजारात अशाचप्रकारचे चायनीज कंपन्यांचे दिवे असल्याने ग्राहकांनी ‘इएसएल’ मार्क बघूनच दिवे खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)