शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड तालुक्याचे सिंचनाचे स्वप्न अपूर्णच

By admin | Updated: May 15, 2015 02:21 IST

पुसद तालुक्यातील इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उमरखेड तालुक्यासाठी अभिशाप ठरत आहे.

उमरखेड : पुसद तालुक्यातील इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प उमरखेड तालुक्यासाठी अभिशाप ठरत आहे. सिंचनाचे स्वप्न पूर्ण झालेच नाही. उलट पावसाळ्यात अतिरिक्त पाणी सोडल्याने पूर तर उन्हाळ्यात पैनगंगा कोरडी ठण्ण अशी स्थिती असते. हा प्रकल्प उमरखेड तालुक्यासाठी अभिशाप ठरत आहे.विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची इसापूर येथे निर्मिती करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीचे स्वप्न पाहत पुसद तालुक्यातील इसापूर येथे पैनगंगा नदीवर प्रकल्प उभारण्याचे ठरविले. १९६४ मध्ये या प्रकल्पाला उर्ध्व पैनगंगा असे नाव देण्यात आले. सुरुवातीला या प्रकल्पाचे पाणी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोलीसह विदर्भातील अनेक तालुक्यांना उपलब्ध होणार होते. उमरखेड तालुक्यातून १७८ किलोमीटरचा उजवा कालवा जाणार होता. तर मराठवाड्यात ८५ किलोमीटरचा डावा कालवा होता. मात्र उजवा कालवा मराठवाड्यात पळविण्यात आला आणि डावा कालवा विदर्भाच्या नशीबी आला. त्यामुळे मराठवाड्यात मुबलक पाणी आले. १९८१ मध्ये इसापूर धरण पूर्णत्वास आले. कालव्याच्या निर्मितीस सुरुवात झाली. तब्बल १२ वर्षानंतर सिंचनास सुरुवात झाली. गेल्या २६ वर्षांच्या कालखंडात उमरखेड तालुक्याला आवश्यक पाणी मिळाले नाही. कालव्याचे काम अपूर्ण आहे. क्षमतेच्या अवघे ३० टक्के सिंचन या परिसरात होत आहे. शासन दरबारी कुणीही मागणी लावून धरत नसल्याने सिंचनाचे स्वप्न अपूर्ण आहे. पावसाळ्यात अतिरिक्त पाणी झाले की, नदीपात्रात सोडले जाते. पैनगंगेला कृत्रिम पूर येऊन ४२ गावांना फटका बसतो. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली येते. याऊलट उन्हाळ्यात पैनगंगेचे पात्र कोरडे पडते. धरणाचे पाणी पात्रात सोडले जात नाही. नदी तिरावरील नळ योजनेच्या विहिरी कोरड्या पडतात. पाणीटंचाईची झळ बसते. दरवर्र्षी हा प्रकार सुरू आहे. प्रकल्पाचा फायदा तर होत नाही. उलट पूर आणि पाणीटंचाईची झळ मात्र सोसावी लागते. (शहर प्रतिनिधी)