शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चाराटंचाईवर प्रशासनाचा यु-टर्न

By admin | Updated: December 6, 2014 02:02 IST

जिल्ह्यात सध्या एक लाख ३१ हजार मेट्रिक टन चाऱ्याचा तुटवडा असल्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनानेच जाहिर केल्यानंतर ....

यवतमाळ : जिल्ह्यात सध्या एक लाख ३१ हजार मेट्रिक टन चाऱ्याचा तुटवडा असल्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनानेच जाहिर केल्यानंतर आता मात्र चाराटंचाई यावर्षी जाणवणार नसल्याचा दावा करीत यु-टर्न घेतला आहे. विशेष असे, काँग्रेस, राष्ट्रवादी व इतरही संघटनांनी जिल्ह्यात चारा डेपो उघडण्यात यावे, अशी मागणी विविध ठिकाणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पशुधनास दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची आवश्यकता भासत असते. यावर्षी खरीपात झालेली पेरणी तसेच वैरण विकास योजनेतून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारा उत्पादन होणार असल्याने चारा टंचाई जाणवणार नसल्याचे चित्र आहे. विविध माध्यमातून यावर्षी १७.६२ लाख मे.टन चारा जिल्ह्यात उत्पादित होणार असून त्यापैकी ४.४७ मे.टन चाऱ्याची सद्यस्थितीत उपलब्धता आहे. जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय मिळून एकून ७ लाख ७८ हजार इतके पशुधन आहे. या पशुधनास दरदिवशी ४१४३ मे.टन या प्रमाणे वषार्ला १५.१३ लाख मे.टन चाऱ्याची आवश्यकता भासणार आहे. त्यात यवतमाळ तालुक्यातील पशुधनास १.१९ लाख मेट्रिक टन, बाभूळगाव तालुक्यातील पशुधनास ५७ हजार, कळंब ८४ हजार, राळेगाव ७१ हजार, घाटंजी एक लक्ष, पांढरकवडा ९९ हजार, वणी १.१४ लक्ष, मारेगाव ७१ हजार, झरी ६८ हजार, नेर ८८ हजार, आर्णी १.०७ लक्ष, दारव्हा १.१२ लक्ष, दिग्रस ८० लक्ष, पुसद १.५३ लक्ष, महागाव ५५ लक्ष, उमरखेड १.३६ मेट्रीक टन चाऱ्याचा समावेश आहे. कृषी विभागाच्या खरीप हंगामातील पिक पेरणीच्या अहवालानुसार सोयाबीन, तीळ, तूर, मूग, उडीद, भात, बाजरी, ज्वारी, कापूस, ऊस इत्यादी खरीप पिकाच्या पेरणीनुसार १०.६७ लाख मेट्रीक टन चाऱ्याचे उत्पादन होणार आहे. तसेच वनक्षेत्र व पडित क्षेत्रावर ४.४७ लाख मेट्रिक टन चारा उत्पादीत होणे अपेक्षित आहे. पशुसंवर्धन व कृषी विभागाच्यावतीने वैरण विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात वाटप केलेल्या वैरण बियाणांच्या माध्यमातून २.२१ लाख मेट्रिक टन चारा उत्पादन होणार आहे. अशा प्रकार सर्व माध्यमातून जिल्ह्यात १७.६२ लाख मेट्रिक टन चारा उत्पादीत होतील. सद्यस्थितीत वनक्षेत्र व पडित क्षेत्रावरील ४.४७ लाख मेट्रिक टन चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे. जिल्ह्यात पर्जन्यमान समाधानकारक झाल्याने खरीपासोबतच रब्बी पिकांच्या पेरणीपासून सुध्दा अपेक्षित चाऱ्याचे उत्पादन होणार आहे. त्यामुळे या वर्षभरात जिल्ह्यात चारा टंचाई भासणार नाही, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी सांगितले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या या दाव्यावर विश्वास ठेवल्यास पशुपालकांचा नक्कीच दिलासा मिळणार असल्याचे यातून दिसते. (प्रतिनिधी)