शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

ट्रेलर अपघातात दुचाकीस्वार दोघे ठार

By admin | Updated: February 5, 2015 23:16 IST

लोखंडी अवजड पत्रांच्या चादरी वाहून नेत असलेल्या ट्रेलरची साखळी तुटली आणि त्याचवेळी तेथून जाणाऱ्या दुचाकीवर पत्रे आदळल्याने त्याखाली चिरडल्या जाऊन दोन जण जागीच ठार झाले.

आर्णी : लोखंडी अवजड पत्रांच्या चादरी वाहून नेत असलेल्या ट्रेलरची साखळी तुटली आणि त्याचवेळी तेथून जाणाऱ्या दुचाकीवर पत्रे आदळल्याने त्याखाली चिरडल्या जाऊन दोन जण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की, दोघांचेही हातपाय धडापासून वेगळे झाले होते. हा अपघात आर्णी-माहूर मार्गावरील कोसदनी घाटात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडला. बाळाभाऊ श्रीराम कडू (५५) रा. सायखेडा आणि अनिल बालाजी चौधरी (३२) रा. लिंगी असे ठार झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहे. बाळाभाऊ आपल्या जावयाचा लहान भाऊ अनिल सोबत गुरुवारी महागाव येथे मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून दुचाकी क्र.एम.एच.२९-एएच-६११८ ने गावी परतत होते. दरम्यान कोसदनी घाटात समोरुन लोखंडी पत्रे भरुन असलेला ट्रेलर (सीजी-०४-जेसी-९३२५) येत होता. काही कळायच्या आत या लोखंडी अवजड पत्र्यांना बांधलेली साखळी तुटली आणि एक एक पत्रा घाटातील चढउतारामुळे घसरु लागला. त्याच वेळी बाळाभाऊ दुचाकीने जात होते. अवघड पत्रे या दोघांच्या अंगावर कोसळल्याने दोघांचेही हातपाय कापल्या गेले. अक्षरश: धडापासून वेगळे पडले. अपघात झाल्याची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे विखुरलेले अवयव पाहून प्रत्येकजण हळहळत होता. या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. मृत दोघेही शेतकरी असून अनिलच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा तर बाळाभाऊच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. आर्णी पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. (शहर प्रतिनिधी)