शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

खाण परिसरात दोन वाघांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:44 IST

तालुक्याच्या पूर्व भागातील वेकोलिच्या खाण परिसरात दोन वाघांचा संचार होत असल्याने मागील दोन महिन्यापासून नागरिक दहशतीखाली वावरत आहे. वाघाच्या भितीने श्ेताकऱ्यांना कामासाठी मजुर मिळणे अवघड झाले असून शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात एकटेदुकटे जाण्यास भीती वाटत आहे.

ठळक मुद्देनागरिक भयभीत : शेतकऱ्यांना मजूर मिळण्याची अडचण

विनोद ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्याच्या पूर्व भागातील वेकोलिच्या खाण परिसरात दोन वाघांचा संचार होत असल्याने मागील दोन महिन्यापासून नागरिक दहशतीखाली वावरत आहे. वाघाच्या भितीने श्ेताकऱ्यांना कामासाठी मजुर मिळणे अवघड झाले असून शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात एकटेदुकटे जाण्यास भीती वाटत आहे.तालुक्याच्या पूर्व भागात वेकोलिच्या पाच ते सहा खुल्या कोळसा खाणी आहेत. खाणीच्या मानवनिर्मीत दºया व मातीच्या ढिगाऱ्याचे डोंगर झाले आहे. या डोंगरावर झुडूपे वाढल्याने जंगल सदृश्य परिसर बनला आहे. लागूनच केसुर्ली व शेवाळांचे जंगलही आहे. त्यामुळे येथे दोन वाघांनी आपले बस्तान मांडले आहे. मागील दोन महिन्यापासून अनेकांना या वाघांनी दर्शन दिले आहेत. काही दिवसांपूर्वी शिरपूर परिसरात हा वाघ लोकांनी पाहिला. महिनाभरापूर्वीच सुंदरनगरच्या शाळेजवळ भरदिवसा हा वाघ येऊन गेला. आता दोन दिवसांपूर्वी कोलारपिंपरी खाण परिसरात अनेकांनी या पट्टेदार वाघाला पाहिले. या वाघांनी आतापर्यंत माणसांवर हल्ला केला नसला तरी अनेक जनावरांना फस्त केले आहे.मागील आठवड्यातच केसुर्ली जंगलात दोन गायींना वाघाने ठार मारले. १५ दिवसांपूर्वी उकणी परिसरात एक गोऱ्हा वाघाने मारला, तर अनेक जनावरांवर हल्ले करून जखमी केले आहे. गुराख्यांनीही अनेकदा वाघ बघितले आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर येथील वनविभागाने केसुर्ली व निलजई परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले. या कॅमेऱ्यातही हे दोन्ही वाघ टिपले गेले, अशी माहिती वनविभागाचे अधिकारी पटवारी यांनी दिली. मात्र वरिष्ठ पातळीवरून या वाघांना पकडण्याचे कोणतेही आदेश न आल्याने वाघांना पकडता येत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक, गुराखी, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी वनविभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतात फुटून असलेला कापूस वेचण्यासाठी मजूर धजावत नसल्याने शेतकºयांमध्ये चिंता पसरली आहे.वेकोलि कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीवेकोलिमध्ये तीन पाळ्यांमध्ये काम सुरू असते. त्यामुळे कर्मचारी व कामगारांना रात्रपाळीतही कामावर जावे लागते. परंतु वाघाच्या संचारामुळे वेकोलि कामगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. कामगारांनी रात्रीच्यावेळी एकटे-दुकटे येण्याचे टाळावे, अशा सूचना वेकोलि प्रशासनाने कामगारांना देण्याची गरज असल्याचे येथील उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Tigerवाघ