शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

खाण परिसरात दोन वाघांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:44 IST

तालुक्याच्या पूर्व भागातील वेकोलिच्या खाण परिसरात दोन वाघांचा संचार होत असल्याने मागील दोन महिन्यापासून नागरिक दहशतीखाली वावरत आहे. वाघाच्या भितीने श्ेताकऱ्यांना कामासाठी मजुर मिळणे अवघड झाले असून शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात एकटेदुकटे जाण्यास भीती वाटत आहे.

ठळक मुद्देनागरिक भयभीत : शेतकऱ्यांना मजूर मिळण्याची अडचण

विनोद ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्याच्या पूर्व भागातील वेकोलिच्या खाण परिसरात दोन वाघांचा संचार होत असल्याने मागील दोन महिन्यापासून नागरिक दहशतीखाली वावरत आहे. वाघाच्या भितीने श्ेताकऱ्यांना कामासाठी मजुर मिळणे अवघड झाले असून शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात एकटेदुकटे जाण्यास भीती वाटत आहे.तालुक्याच्या पूर्व भागात वेकोलिच्या पाच ते सहा खुल्या कोळसा खाणी आहेत. खाणीच्या मानवनिर्मीत दºया व मातीच्या ढिगाऱ्याचे डोंगर झाले आहे. या डोंगरावर झुडूपे वाढल्याने जंगल सदृश्य परिसर बनला आहे. लागूनच केसुर्ली व शेवाळांचे जंगलही आहे. त्यामुळे येथे दोन वाघांनी आपले बस्तान मांडले आहे. मागील दोन महिन्यापासून अनेकांना या वाघांनी दर्शन दिले आहेत. काही दिवसांपूर्वी शिरपूर परिसरात हा वाघ लोकांनी पाहिला. महिनाभरापूर्वीच सुंदरनगरच्या शाळेजवळ भरदिवसा हा वाघ येऊन गेला. आता दोन दिवसांपूर्वी कोलारपिंपरी खाण परिसरात अनेकांनी या पट्टेदार वाघाला पाहिले. या वाघांनी आतापर्यंत माणसांवर हल्ला केला नसला तरी अनेक जनावरांना फस्त केले आहे.मागील आठवड्यातच केसुर्ली जंगलात दोन गायींना वाघाने ठार मारले. १५ दिवसांपूर्वी उकणी परिसरात एक गोऱ्हा वाघाने मारला, तर अनेक जनावरांवर हल्ले करून जखमी केले आहे. गुराख्यांनीही अनेकदा वाघ बघितले आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर येथील वनविभागाने केसुर्ली व निलजई परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले. या कॅमेऱ्यातही हे दोन्ही वाघ टिपले गेले, अशी माहिती वनविभागाचे अधिकारी पटवारी यांनी दिली. मात्र वरिष्ठ पातळीवरून या वाघांना पकडण्याचे कोणतेही आदेश न आल्याने वाघांना पकडता येत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक, गुराखी, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना वनविभागाने दिल्या आहेत. तसेच ठिकठिकाणी वनविभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतात फुटून असलेला कापूस वेचण्यासाठी मजूर धजावत नसल्याने शेतकºयांमध्ये चिंता पसरली आहे.वेकोलि कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीवेकोलिमध्ये तीन पाळ्यांमध्ये काम सुरू असते. त्यामुळे कर्मचारी व कामगारांना रात्रपाळीतही कामावर जावे लागते. परंतु वाघाच्या संचारामुळे वेकोलि कामगारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. कामगारांनी रात्रीच्यावेळी एकटे-दुकटे येण्याचे टाळावे, अशा सूचना वेकोलि प्रशासनाने कामगारांना देण्याची गरज असल्याचे येथील उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Tigerवाघ