शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

एसबीआयचे दोन एटीएम दीड वर्षांपासून बंदच

By admin | Updated: September 7, 2016 01:42 IST

शहरातील भारतीय स्टेट बँकेचे दोन एटीएम गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याचे सांगितले जात आहे.

ग्राहक त्रस्त : मशीन बसविल्या पण सुरूच झाल्या नाही दारव्हा : शहरातील भारतीय स्टेट बँकेचे दोन एटीएम गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य बाजारपेठ आणि अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेले एक एटीएम बंद असल्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.बँकेने ग्राहकांच्या सुविधेसाठी दोन ठिकाणी दुकाने भाड्याने घेवून त्यामध्ये मशीन बसविल्या. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्यानंतरही हे एटीएम सुरू होवू शकले नाही. परंतु दुकानाचे भाडे मात्र सुरू आहे. भारतीय स्टेट बँकेने तहसील कार्यालयासमोरील वाचनालयाच्या बाजूला आणि गोळीबार चौकातील खासगी दुकाने भाड्याने घेवून त्या ठिकाणी एटीएम मशीन बसविल्या. तहसील कार्यालयासमोर दिवसभर तालुक्यातील लोकांची मोठी गर्दी असते आणि गोळीबार चौकात तर शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे ही दोनही ठिकाणे अत्यंत वर्दळीची आहे.ही महत्त्वाची ठिकाणे पाहता इथे एटीएम असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगली सुविधा मिळू शकते आणि बँकेच्या व्यवहाराला चांगला प्रतिसादसुद्धा मिळू शकतो. परंतु एटीएम मशीन तर बसविण्यात आला पण सुरू मात्र झाल्या नाही. या संदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मशीन बंद असल्याचे मान्य करीत मशीनमध्ये कॅश टाकणाऱ्या कंपनीकडून कॅश टाकल्या जात नसल्याने एटीएम सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले आणि बँकेकडेही मनुष्यबळ नसल्याने कर्मचाऱ्यामार्फत ते काम केले जावू शकत नाही. त्यामुळे या दोनही ठिकाणचे एटीएम सुरूच न करण्याचा निर्णय बँकेनी घेतला आहे. असे असले तरी बँकेनी भाड्याने घेतलेल्या दोनही दुकानाचे भाडे सुरू आहे. त्यामुळे बँकेचे नुकसान झाले आणि ग्राहकांना सुविधाही मिळाली नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता जवळपास दीड वर्षानंतर हे एटीएम सुरूच न करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे ग्राहक चांगल्या सुविधेला मुकणार आहे. या दोन्ही ठिकाणी एटीएम अत्यंत आवश्यक असून ते बंद न करता सुरू करण्यात यावे, अशी मागणी केल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)