शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

एसबीआयचे दोन एटीएम दीड वर्षांपासून बंदच

By admin | Updated: September 7, 2016 01:42 IST

शहरातील भारतीय स्टेट बँकेचे दोन एटीएम गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याचे सांगितले जात आहे.

ग्राहक त्रस्त : मशीन बसविल्या पण सुरूच झाल्या नाही दारव्हा : शहरातील भारतीय स्टेट बँकेचे दोन एटीएम गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याचे सांगितले जात आहे. मुख्य बाजारपेठ आणि अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेले एक एटीएम बंद असल्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.बँकेने ग्राहकांच्या सुविधेसाठी दोन ठिकाणी दुकाने भाड्याने घेवून त्यामध्ये मशीन बसविल्या. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्यानंतरही हे एटीएम सुरू होवू शकले नाही. परंतु दुकानाचे भाडे मात्र सुरू आहे. भारतीय स्टेट बँकेने तहसील कार्यालयासमोरील वाचनालयाच्या बाजूला आणि गोळीबार चौकातील खासगी दुकाने भाड्याने घेवून त्या ठिकाणी एटीएम मशीन बसविल्या. तहसील कार्यालयासमोर दिवसभर तालुक्यातील लोकांची मोठी गर्दी असते आणि गोळीबार चौकात तर शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे ही दोनही ठिकाणे अत्यंत वर्दळीची आहे.ही महत्त्वाची ठिकाणे पाहता इथे एटीएम असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगली सुविधा मिळू शकते आणि बँकेच्या व्यवहाराला चांगला प्रतिसादसुद्धा मिळू शकतो. परंतु एटीएम मशीन तर बसविण्यात आला पण सुरू मात्र झाल्या नाही. या संदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता मशीन बंद असल्याचे मान्य करीत मशीनमध्ये कॅश टाकणाऱ्या कंपनीकडून कॅश टाकल्या जात नसल्याने एटीएम सुरू झाले नसल्याचे सांगण्यात आले आणि बँकेकडेही मनुष्यबळ नसल्याने कर्मचाऱ्यामार्फत ते काम केले जावू शकत नाही. त्यामुळे या दोनही ठिकाणचे एटीएम सुरूच न करण्याचा निर्णय बँकेनी घेतला आहे. असे असले तरी बँकेनी भाड्याने घेतलेल्या दोनही दुकानाचे भाडे सुरू आहे. त्यामुळे बँकेचे नुकसान झाले आणि ग्राहकांना सुविधाही मिळाली नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता जवळपास दीड वर्षानंतर हे एटीएम सुरूच न करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे ग्राहक चांगल्या सुविधेला मुकणार आहे. या दोन्ही ठिकाणी एटीएम अत्यंत आवश्यक असून ते बंद न करता सुरू करण्यात यावे, अशी मागणी केल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)