शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दोन लाख कृषीपंपाच्या वीज जोडण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 11:34 IST

पंतप्रधानांनी कृषी उत्पादन दुप्पट करण्यावर भर दिला आहे. नवीन सरकारमध्येही या धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्याकरिता प्रकल्प आणि विहिरींच्या माध्यमातून ओलित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देट्रान्सफार्मर मिळेनाअतिउच्च दाब वाहिनीचा प्रयोग प्रभावीत

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधानांनी कृषी उत्पादन दुप्पट करण्यावर भर दिला आहे. नवीन सरकारमध्येही या धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्याकरिता प्रकल्प आणि विहिरींच्या माध्यमातून ओलित करण्यात येणार आहे. यामुळेच सिंचनासाठी लागणाऱ्या कृषीपंपांना तत्काळ वीज जोडण्या देण्याचे आदेश उर्जामंत्र्यांनी दिले आहे. तरी अद्यापही एक लाख ९३ हजार कृषीपंपांना वीज जोडण्या मिळाल्या नाही. ट्रान्सफार्मरच्या पुरवठ्याविना या जोडण्या खोळंबल्या आहेत.अतिउच्च दाब वाहिन्यांवरून शेतकऱ्यांना थेट विजेचे कनेक्शन देण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला आहे. राज्य शासनाच्या मदतीने महावितरण कंपनी एचव्हीडीएस योजना राबवित आहे. पाच हजार ४८ कोटी रूपयांची ही योजना आहे. यामुळे प्रत्येक शेतकºयासाठी स्वतंत्र डीपी कृषी फिडरच्या क्षेत्रात पाहायला मिळणार आहे. त्या दृष्टीने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.विदर्भात ५० हजार वीज जोडण्यांचे अर्ज वीज वितरण कंपनीकडे दाखल करण्यात आले आहे. राज्यात कृषीपंपांकरिता दोन लाख १८ हजार शेतकºयांचे अर्ज आले आहेत. या शेतकऱ्यांना वीज जोडणी करण्यासाठी ट्रान्सफार्मर पुरविले जात आहे. मात्र याची संख्या फार कमी आहे. ट्रान्सफार्मर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी पडले आहे. यामुळे कृषीपंपांचे वीज कनेक्शन थांबले आहेत. लवकरच ट्रान्सफार्मरचा पुरवठा होईल, असे कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.राज्यभरात कृषी ट्रान्सफार्मरचा पुरवठा करण्याचे काम प्रमुख कंपन्यांकडे देण्यात आले आहे. या कंपन्यांनी आतापर्यंत राज्यभरात २५ हजार ट्रान्सफार्मर पुरविले आहेत. येणाऱ्या काळात हे ट्रान्सफार्मर आणखी वाढणार आहेत. तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.यवतमाळकडे केवळ ६५० ट्रान्सफार्मरयवतमाळ जिल्ह्यात आठ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या जोडणीसाठी अर्ज केले आहे. प्रत्यक्षात ६५० ट्रान्सफार्मर या ठिकाणी पोहोचले आहेत. पुरवठ्यानुसार वीज जोडण्या करण्यात येत आहे. यानंतरही अनेक शेतकरी जोडणीपासून वंचित आहेत.सौरपंपात विविध अडचणीवीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना सौरपंपाचा प्रस्ताव ठेवला आहे. सोलरपंपामध्ये खोली आणि पाणी ओढताना विविध अडचणी निर्माण होतात. सोलरपंप सुरक्षा आणि त्याच्या दुरूस्तीसाठीही मोठे प्रश्न निर्माण होतील. शिवाय वर्षभरानंतर त्याची कार्यक्षमता कमी होईल. यामुळे विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोलरपंपाच्या मागणीकडे पाठ फिरविल्याचेच चित्र आहे.ऑनलाईन अर्ज थांबण्याचे कारण गुलदस्त्यातजुन्याच वीज जोडण्या प्रलंबित आहेत. यामध्ये नवीन वीज जोडण्यांची भर पडली, तर आकडा मोठा होण्याचा धोका आहे. यामुळे वीज कंपनीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज डाऊनलोडच होत नाही. याबाबत अधिकृतरीत्या कोणीही बोलायला तयार नाही.एचव्हीडीएस योजनेतून दोन लाख १८ हजार अर्ज आले आहेत. यापैकी २५ हजार ट्रान्सफार्मर राज्यात पुरविण्यात आले आहे. यावरून कृषीपंपांच्या २५ हजार जोडण्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.- विश्वास पाठकसंचालक, होल्डींग कंपनी, वीज वितरण

टॅग्स :agricultureशेती