शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

दोन लाख कृषीपंपाच्या वीज जोडण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 11:34 IST

पंतप्रधानांनी कृषी उत्पादन दुप्पट करण्यावर भर दिला आहे. नवीन सरकारमध्येही या धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्याकरिता प्रकल्प आणि विहिरींच्या माध्यमातून ओलित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देट्रान्सफार्मर मिळेनाअतिउच्च दाब वाहिनीचा प्रयोग प्रभावीत

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधानांनी कृषी उत्पादन दुप्पट करण्यावर भर दिला आहे. नवीन सरकारमध्येही या धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्याकरिता प्रकल्प आणि विहिरींच्या माध्यमातून ओलित करण्यात येणार आहे. यामुळेच सिंचनासाठी लागणाऱ्या कृषीपंपांना तत्काळ वीज जोडण्या देण्याचे आदेश उर्जामंत्र्यांनी दिले आहे. तरी अद्यापही एक लाख ९३ हजार कृषीपंपांना वीज जोडण्या मिळाल्या नाही. ट्रान्सफार्मरच्या पुरवठ्याविना या जोडण्या खोळंबल्या आहेत.अतिउच्च दाब वाहिन्यांवरून शेतकऱ्यांना थेट विजेचे कनेक्शन देण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला आहे. राज्य शासनाच्या मदतीने महावितरण कंपनी एचव्हीडीएस योजना राबवित आहे. पाच हजार ४८ कोटी रूपयांची ही योजना आहे. यामुळे प्रत्येक शेतकºयासाठी स्वतंत्र डीपी कृषी फिडरच्या क्षेत्रात पाहायला मिळणार आहे. त्या दृष्टीने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.विदर्भात ५० हजार वीज जोडण्यांचे अर्ज वीज वितरण कंपनीकडे दाखल करण्यात आले आहे. राज्यात कृषीपंपांकरिता दोन लाख १८ हजार शेतकºयांचे अर्ज आले आहेत. या शेतकऱ्यांना वीज जोडणी करण्यासाठी ट्रान्सफार्मर पुरविले जात आहे. मात्र याची संख्या फार कमी आहे. ट्रान्सफार्मर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी पडले आहे. यामुळे कृषीपंपांचे वीज कनेक्शन थांबले आहेत. लवकरच ट्रान्सफार्मरचा पुरवठा होईल, असे कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.राज्यभरात कृषी ट्रान्सफार्मरचा पुरवठा करण्याचे काम प्रमुख कंपन्यांकडे देण्यात आले आहे. या कंपन्यांनी आतापर्यंत राज्यभरात २५ हजार ट्रान्सफार्मर पुरविले आहेत. येणाऱ्या काळात हे ट्रान्सफार्मर आणखी वाढणार आहेत. तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.यवतमाळकडे केवळ ६५० ट्रान्सफार्मरयवतमाळ जिल्ह्यात आठ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या जोडणीसाठी अर्ज केले आहे. प्रत्यक्षात ६५० ट्रान्सफार्मर या ठिकाणी पोहोचले आहेत. पुरवठ्यानुसार वीज जोडण्या करण्यात येत आहे. यानंतरही अनेक शेतकरी जोडणीपासून वंचित आहेत.सौरपंपात विविध अडचणीवीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना सौरपंपाचा प्रस्ताव ठेवला आहे. सोलरपंपामध्ये खोली आणि पाणी ओढताना विविध अडचणी निर्माण होतात. सोलरपंप सुरक्षा आणि त्याच्या दुरूस्तीसाठीही मोठे प्रश्न निर्माण होतील. शिवाय वर्षभरानंतर त्याची कार्यक्षमता कमी होईल. यामुळे विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोलरपंपाच्या मागणीकडे पाठ फिरविल्याचेच चित्र आहे.ऑनलाईन अर्ज थांबण्याचे कारण गुलदस्त्यातजुन्याच वीज जोडण्या प्रलंबित आहेत. यामध्ये नवीन वीज जोडण्यांची भर पडली, तर आकडा मोठा होण्याचा धोका आहे. यामुळे वीज कंपनीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज डाऊनलोडच होत नाही. याबाबत अधिकृतरीत्या कोणीही बोलायला तयार नाही.एचव्हीडीएस योजनेतून दोन लाख १८ हजार अर्ज आले आहेत. यापैकी २५ हजार ट्रान्सफार्मर राज्यात पुरविण्यात आले आहे. यावरून कृषीपंपांच्या २५ हजार जोडण्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.- विश्वास पाठकसंचालक, होल्डींग कंपनी, वीज वितरण

टॅग्स :agricultureशेती