शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

दोन लाख शेतकरी : कर्जावर दरवेळी दोन टक्के रक्कम कपात

By admin | Updated: June 19, 2015 02:01 IST

एकीकडे जिल्ह्यातील शेतकरी कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवितो आहे, तर दुसरीकडे याच शेतकऱ्यांचे प्रत्येकी किमान २० हजार रुपये सेवा सहकारी संस्थांकडे पडून आहेत.

शेअर्सचे ५० कोटी पडून यवतमाळ : एकीकडे जिल्ह्यातील शेतकरी कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवितो आहे, तर दुसरीकडे याच शेतकऱ्यांचे प्रत्येकी किमान २० हजार रुपये सेवा सहकारी संस्थांकडे पडून आहेत. पीक कर्जावर शेअर्स म्हणून ही रक्कम कपात केली गेली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी जिल्हाभरातील ५९४ सेवा सहकारी सोसायट्या जुळलेल्या आहेत. बँक सोसायट्यांना तर सोसायट्या शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करते. मात्र प्रत्येकच कर्जाच्या वेळी दोन टक्के रक्कम ही शेअर्स म्हणून कपात केली जाते. या शेअर्स कपातीच्या रकमेची मर्यादा २० हजार रुपये एवढी आहे. २० हजारानंतर कपात बंद केली जाते. आजच्या घडीला सोसायट्यांकडे किमान ५० कोटी रुपये या शेअर्स कपातीतून गोळा झाले आहेत. शेतकरी कर्जासाठी भटकंती करतो आहे. एकीकडे या शेतकऱ्यांचीच हक्काची रक्कम सोसायट्यांकडे पडून आहे तर दुसरीकडे दहा ते वीस हजाराच्या पीक कर्जासाठी हाच शेतकरी बँकेत येरझारा मारताना दिसतो आहे. म्हणूनच सोसायट्यांनी कपात केलेली शेअर्सची दोन टक्के रक्कम या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना परत द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. रक्कम परत देण्याची कायद्यात तरतूद नाही, संस्था नफ्यात असेल तर लाभांष दिला जाऊ शकतो, असे सांगून सोसायट्या हातवर करीत आहेत. मात्र आमची रक्कम आम्हाला परत द्या, यासाठी शेतकरी आग्रही दिसतो आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी बँकांना धारेवर धरणारे, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि न्याय द्यावा, अशी मागणी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)५९४ सेवा सोसायट्यांचं चांगभलं सेवा सोसायट्या शेतकऱ्यांकडून शेअर्सची रक्कम दोन टक्क्यांनी कपात करते. तर पुढे या सोसायट्या जिल्हा बँकेतून घेणाऱ्या कर्जापोटी शेअर्स भरतात. एवढेच नव्हे तर जिल्हा बँकेलाही राज्य बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावर पाच टक्के शेअर्स भरावे लागत असल्याचे सांगितले जाते. सोसायट्या नव्या सभासदांकडून दहा टक्के तर जुन्या सभासदांकडून पाच टक्के शेअर्स वसुली करते. शेअर्सची ही रक्कम सोसायट्या आपले उत्पन्न म्हणून सांभाळते. या सोसायट्यांना जिल्हा बँकेने अलिकडच्या काळात दोन वेळा लाभांश दिला आहे. मग सोसायट्या लाभांष का देत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज निरंक असेल तर सोसायटी त्याच्या शेअर्सचे त्यावेळचे मूल्यांकन करून तेवढी रक्कम त्याला परत करू शकते. जिल्हा बँकेचेसुद्धा राज्य बँकेकडे ६० ते ७० कोटी रुपये शेअर्सपोटी पडून आहेत.