शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

दोन लाख शेतकरी : कर्जावर दरवेळी दोन टक्के रक्कम कपात

By admin | Updated: June 19, 2015 02:01 IST

एकीकडे जिल्ह्यातील शेतकरी कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवितो आहे, तर दुसरीकडे याच शेतकऱ्यांचे प्रत्येकी किमान २० हजार रुपये सेवा सहकारी संस्थांकडे पडून आहेत.

शेअर्सचे ५० कोटी पडून यवतमाळ : एकीकडे जिल्ह्यातील शेतकरी कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवितो आहे, तर दुसरीकडे याच शेतकऱ्यांचे प्रत्येकी किमान २० हजार रुपये सेवा सहकारी संस्थांकडे पडून आहेत. पीक कर्जावर शेअर्स म्हणून ही रक्कम कपात केली गेली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी जिल्हाभरातील ५९४ सेवा सहकारी सोसायट्या जुळलेल्या आहेत. बँक सोसायट्यांना तर सोसायट्या शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करते. मात्र प्रत्येकच कर्जाच्या वेळी दोन टक्के रक्कम ही शेअर्स म्हणून कपात केली जाते. या शेअर्स कपातीच्या रकमेची मर्यादा २० हजार रुपये एवढी आहे. २० हजारानंतर कपात बंद केली जाते. आजच्या घडीला सोसायट्यांकडे किमान ५० कोटी रुपये या शेअर्स कपातीतून गोळा झाले आहेत. शेतकरी कर्जासाठी भटकंती करतो आहे. एकीकडे या शेतकऱ्यांचीच हक्काची रक्कम सोसायट्यांकडे पडून आहे तर दुसरीकडे दहा ते वीस हजाराच्या पीक कर्जासाठी हाच शेतकरी बँकेत येरझारा मारताना दिसतो आहे. म्हणूनच सोसायट्यांनी कपात केलेली शेअर्सची दोन टक्के रक्कम या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना परत द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. रक्कम परत देण्याची कायद्यात तरतूद नाही, संस्था नफ्यात असेल तर लाभांष दिला जाऊ शकतो, असे सांगून सोसायट्या हातवर करीत आहेत. मात्र आमची रक्कम आम्हाला परत द्या, यासाठी शेतकरी आग्रही दिसतो आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी बँकांना धारेवर धरणारे, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि न्याय द्यावा, अशी मागणी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)५९४ सेवा सोसायट्यांचं चांगभलं सेवा सोसायट्या शेतकऱ्यांकडून शेअर्सची रक्कम दोन टक्क्यांनी कपात करते. तर पुढे या सोसायट्या जिल्हा बँकेतून घेणाऱ्या कर्जापोटी शेअर्स भरतात. एवढेच नव्हे तर जिल्हा बँकेलाही राज्य बँकेकडून मिळणाऱ्या कर्जावर पाच टक्के शेअर्स भरावे लागत असल्याचे सांगितले जाते. सोसायट्या नव्या सभासदांकडून दहा टक्के तर जुन्या सभासदांकडून पाच टक्के शेअर्स वसुली करते. शेअर्सची ही रक्कम सोसायट्या आपले उत्पन्न म्हणून सांभाळते. या सोसायट्यांना जिल्हा बँकेने अलिकडच्या काळात दोन वेळा लाभांश दिला आहे. मग सोसायट्या लाभांष का देत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज निरंक असेल तर सोसायटी त्याच्या शेअर्सचे त्यावेळचे मूल्यांकन करून तेवढी रक्कम त्याला परत करू शकते. जिल्हा बँकेचेसुद्धा राज्य बँकेकडे ६० ते ७० कोटी रुपये शेअर्सपोटी पडून आहेत.