शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

यवतमाळात तुटलेल्या पुलामुळे दोन किलोमीटरचा फेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:44 IST

Yawatmal News उमरसरा भागात सुरभीनगर येथे दीड महिन्यांपूर्वी एक पूल तुटला. मात्र अद्याप तो त्याच अवस्थेत असल्याने तेथील नागरिकांना शहरात येण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा फेरा सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देउमरसरा येथील नागरिक त्रस्तपूल दुरुस्तीकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील उमरसरा भागात सुरभीनगर येथे दीड महिन्यांपूर्वी एक पूल तुटला. मात्र अद्याप तो त्याच अवस्थेत असल्याने तेथील नागरिकांना शहरात येण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा फेरा सहन करावा लागत आहे. त्या भागातील नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. नगरपरिषदेकडे निधीच नाही तर आम्ही विकास कामे व दुरुस्ती करावी कशी, असा उलट सवाल भाजपचे नगरसेवक दिनेश चिंडाले नागरिकांना विचारत आहेत. विशेष असे, या तुटलेल्या पुलामुळे विकास कामातील निकृष्टताही अधोरेखित झाली आहे.

उमरसरा भागातील सुरभीनगरात जाण्यासाठी नाल्यावर दोन बाजूने दोन पूल बांधण्यात आले आहे. बारा ते पंधरा वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्यापैकी एक पूल दीड महिन्यांपूर्वी ट्रकच्या वाहतुकीत खचला, तर दुसरा पूल दोन वर्षांपासून वाहतुकीसाठी बंद होता. या पूलाचा एक भाग खचला होता. पुलाला मध्यभागी मोठे छिद्र पडले होते. आता दोनही पूल बंद आहे. यामुळे एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा रस्ताच नाही. पायदळ जाण्यासाठी तुटलेल्या पुलावरून कसरत करावी लागते. यातून या भागात दररोज अपघात होत आहे.

दुचाकी, चारचाकी व इतर वाहने याठिकाणावरून काढता येत नाही. त्याकरिता दीड ते दोन किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. यामुळे आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांना बाहेर जाताना हा वळसा केल्यानंतर बाहेर पडता येते. याठिकाणी घंटागाडी, भाजीपाला अथवा कुठलाही आॅटोरिक्षा प्रवेश करत नाही. या संदर्भात या भागातील नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रार केली. मात्र नगरपालिकेकडे हा विषय सभागृहात मांडला गेला नाही. त्यांच्याकडे या कामासाठी निधी नाही. यामुळे हा प्रश्न अजूनही तसाच आहे. या भागातील दुसऱ्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हे काम अपूर्ण आहे.नगरसेवक फिरकलेच नाहीआमच्या भागात रस्ता खचल्यानंतर नगरसेवक फिरकलेच नाही. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात नाही, अशी खंत या भागातील नंदा पाटील, उषा क्षीरसागर, पुष्पा राऊत, हनुमंत अंभोरे यांनी व्यक्त केली.नगरपालिकेकडे रस्त्यासाठी निधी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत विविध ठिकाणावरून तरतूद करीत पुुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. दुसऱ्या पुलासाठी प्रयत्न केला जात आहे.- दिनेश चिंडाले, नगरसेवक

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक