शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख शेतकऱ्यांवर वसुलीची टांगती तलवार

By admin | Updated: March 17, 2016 02:59 IST

राज्य शासनाच्या दुष्काळी यादीतून यवतमाळ जिल्हा बाद झाल्याने दोन लाख थकबाकीदार शेतकऱ्यांवर ९२२ कोटींच्या कर्जफेडीचे संकट उभे ठाकले आहे.

९२२ कोटी कर्ज : हवामानावर आधारित विम्याचे ४३ कोटी कापलेरुपेश उत्तरवार यवतमाळ राज्य शासनाच्या दुष्काळी यादीतून यवतमाळ जिल्हा बाद झाल्याने दोन लाख थकबाकीदार शेतकऱ्यांवर ९२२ कोटींच्या कर्जफेडीचे संकट उभे ठाकले आहे. तर बँकांचा कर्जवसुलीतील मोठा अडसर दूर झाला आहे. कृषीपंपाचे थकीत वीजबिल आणि आपल्या पाल्यांचे परीक्षा शुल्कही भरावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासन करीत असल्याचा आरोप होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी सतत तीन वर्षांपासून दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टीचा सामना करीत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणेने ठोस उपाययोेजना केल्या नाही. यामुळे शेतकरी कुटुंबांची आर्थिक स्थिती हाताबाहेर गेली आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र सरकारी यंत्रणेची अनास्था आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढविल्या आहेत.२००९-१० पासून एक लाख ९८ हजार शेतक ऱ्यांकडे ९२२ कोटींचे कर्ज थकले आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेती कसली. मात्र २०१३ पासूनच्या सलग दुष्काळाने त्यामध्ये भर घातली. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्या आहेत.सध्याच्या स्थितीत थकबाकीदार शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्ज मिळणे अवघड झाले आहे. २०१५ ची जिल्ह्याची अंतिम आणेवारी ४५ टक्के आहे. असे असले तरी राज्य शासनाने जिल्ह्याची आणेवारी ग्राह्य धरलीच नाही. परिणामी जिल्ह्यातील २०५३ पैकी केवळ दोनच गावे दुष्काळग्रस्तांच्या यादीत आले. इतर गावासाठी जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा केला. मात्र जिल्ह्यातील इतर गावांचा दुष्काळी यादीत समावेश झालाच नाही. यामुळे बँकांना कर्जवसुली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर वीज वितरण कंपनीला थकीत बिलाची वसुली करता येणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे माफ होणारे परीक्षा शुल्कही ७० हजार शेतकऱ्यांच्या पाल्यांना भरावे लागणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हादरले आहेत.