शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

दोन लाख शेतकऱ्यांवर वसुलीची टांगती तलवार

By admin | Updated: March 17, 2016 02:59 IST

राज्य शासनाच्या दुष्काळी यादीतून यवतमाळ जिल्हा बाद झाल्याने दोन लाख थकबाकीदार शेतकऱ्यांवर ९२२ कोटींच्या कर्जफेडीचे संकट उभे ठाकले आहे.

९२२ कोटी कर्ज : हवामानावर आधारित विम्याचे ४३ कोटी कापलेरुपेश उत्तरवार यवतमाळ राज्य शासनाच्या दुष्काळी यादीतून यवतमाळ जिल्हा बाद झाल्याने दोन लाख थकबाकीदार शेतकऱ्यांवर ९२२ कोटींच्या कर्जफेडीचे संकट उभे ठाकले आहे. तर बँकांचा कर्जवसुलीतील मोठा अडसर दूर झाला आहे. कृषीपंपाचे थकीत वीजबिल आणि आपल्या पाल्यांचे परीक्षा शुल्कही भरावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासन करीत असल्याचा आरोप होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी सतत तीन वर्षांपासून दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टीचा सामना करीत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणेने ठोस उपाययोेजना केल्या नाही. यामुळे शेतकरी कुटुंबांची आर्थिक स्थिती हाताबाहेर गेली आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र सरकारी यंत्रणेची अनास्था आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढविल्या आहेत.२००९-१० पासून एक लाख ९८ हजार शेतक ऱ्यांकडे ९२२ कोटींचे कर्ज थकले आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेती कसली. मात्र २०१३ पासूनच्या सलग दुष्काळाने त्यामध्ये भर घातली. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्या आहेत.सध्याच्या स्थितीत थकबाकीदार शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्ज मिळणे अवघड झाले आहे. २०१५ ची जिल्ह्याची अंतिम आणेवारी ४५ टक्के आहे. असे असले तरी राज्य शासनाने जिल्ह्याची आणेवारी ग्राह्य धरलीच नाही. परिणामी जिल्ह्यातील २०५३ पैकी केवळ दोनच गावे दुष्काळग्रस्तांच्या यादीत आले. इतर गावासाठी जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा केला. मात्र जिल्ह्यातील इतर गावांचा दुष्काळी यादीत समावेश झालाच नाही. यामुळे बँकांना कर्जवसुली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर वीज वितरण कंपनीला थकीत बिलाची वसुली करता येणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे माफ होणारे परीक्षा शुल्कही ७० हजार शेतकऱ्यांच्या पाल्यांना भरावे लागणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हादरले आहेत.