शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

दोन लाख शेतकऱ्यांवर वसुलीची टांगती तलवार

By admin | Updated: March 17, 2016 02:59 IST

राज्य शासनाच्या दुष्काळी यादीतून यवतमाळ जिल्हा बाद झाल्याने दोन लाख थकबाकीदार शेतकऱ्यांवर ९२२ कोटींच्या कर्जफेडीचे संकट उभे ठाकले आहे.

९२२ कोटी कर्ज : हवामानावर आधारित विम्याचे ४३ कोटी कापलेरुपेश उत्तरवार यवतमाळ राज्य शासनाच्या दुष्काळी यादीतून यवतमाळ जिल्हा बाद झाल्याने दोन लाख थकबाकीदार शेतकऱ्यांवर ९२२ कोटींच्या कर्जफेडीचे संकट उभे ठाकले आहे. तर बँकांचा कर्जवसुलीतील मोठा अडसर दूर झाला आहे. कृषीपंपाचे थकीत वीजबिल आणि आपल्या पाल्यांचे परीक्षा शुल्कही भरावे लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासन करीत असल्याचा आरोप होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी सतत तीन वर्षांपासून दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टीचा सामना करीत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणेने ठोस उपाययोेजना केल्या नाही. यामुळे शेतकरी कुटुंबांची आर्थिक स्थिती हाताबाहेर गेली आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र सरकारी यंत्रणेची अनास्था आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढविल्या आहेत.२००९-१० पासून एक लाख ९८ हजार शेतक ऱ्यांकडे ९२२ कोटींचे कर्ज थकले आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेती कसली. मात्र २०१३ पासूनच्या सलग दुष्काळाने त्यामध्ये भर घातली. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्या आहेत.सध्याच्या स्थितीत थकबाकीदार शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्ज मिळणे अवघड झाले आहे. २०१५ ची जिल्ह्याची अंतिम आणेवारी ४५ टक्के आहे. असे असले तरी राज्य शासनाने जिल्ह्याची आणेवारी ग्राह्य धरलीच नाही. परिणामी जिल्ह्यातील २०५३ पैकी केवळ दोनच गावे दुष्काळग्रस्तांच्या यादीत आले. इतर गावासाठी जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा केला. मात्र जिल्ह्यातील इतर गावांचा दुष्काळी यादीत समावेश झालाच नाही. यामुळे बँकांना कर्जवसुली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर वीज वितरण कंपनीला थकीत बिलाची वसुली करता येणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे माफ होणारे परीक्षा शुल्कही ७० हजार शेतकऱ्यांच्या पाल्यांना भरावे लागणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हादरले आहेत.