शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
4
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
5
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
6
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
7
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
8
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
9
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
10
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
11
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
12
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
13
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
14
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
15
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
16
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
17
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
18
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
19
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
20
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

दोनशे वर कुटुंबांचा संसार सुखाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:08 IST

पती-पत्नी संसाररुपी रथाची दोन चाके. यातील एक चाक निखळले तरी संसाराचा गाडा रुळावरून घसरतो. काही दिवसच नव्हे तर संसारवेलीवर फुल उमलल्यानंतरही पती-पत्नीमध्ये वितुष्ट निर्माण होते.

ठळक मुद्देमहिला सेलची मध्यस्थी : कलहाची सर्वाधिक प्रकरणे सुशिक्षितांची

ज्ञानेश्वर मुंदे ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : पती-पत्नी संसाररुपी रथाची दोन चाके. यातील एक चाक निखळले तरी संसाराचा गाडा रुळावरून घसरतो. काही दिवसच नव्हे तर संसारवेलीवर फुल उमलल्यानंतरही पती-पत्नीमध्ये वितुष्ट निर्माण होते. दोन जीवांची ताटातुट होण्यासोबतच अपत्यांचाही आधार तुटतो. अर्थात याला विविध कारणे आहे. अशा तुटणाऱ्या संसाराची विण अधिक घट्ट करण्याची महत्वपूर्ण भूमिका यवतमाळचा महिला सेल बजावत आहे. वर्षभरात दोनशे संसार रुळावर आणण्याची किमया या सेलने साधली आहे.कौटुंबिक कलहाच्या घटनांत अलिकडे वाढ झाली आहे. पती-पत्नीचा हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतो. टोकाचा निर्णय घेत मुलाबाळांचाही विचार केला जात नाही. पोलीस ठाण्यापर्यंत आलेल्या प्रकरणांमध्ये समेट घडवून आणण्याची महत्वाची भूमिका पोलीस अधीक्षकांच्या अधिनस्त महिला सेल बजावत आहे. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली की, थेट महिला सेलकडे पाठविले जाते. महिला सेल दोनही कुटुंबांना एकत्र बसवून त्यांचे समूपदेशन करते. त्यातून विस्कटलेली संसाराची घडी बसविण्याचा प्रयत्न होतो. यवतमाळ येथील महिला सेलकडे २०१७ मध्ये ११७ आणि जानेवारी-फेब्रुवारी या दोन महिन्यात ६७ प्रकरणे दाखल झाली आहे. यातील बहुतांश कुटुंबांचे समूपदेशन करण्यात आले. वाद-विवाद मिटविण्यात यश आले. त्यामुळेच वर्षभरात दोनशेवर कुटुंबांचा संसार सुखाचा झाला.समूपदेशन करताना महिला सेलमधील अधिकाऱ्यांना प्रत्येकवेळी नवीन अनुभव येतो. समूपदेशन करताना सुशिक्षितच ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. प्रत्येकजण आपला ईगो पुढे करतात. त्यांना समजावून सांगणे कठीण होते. ही मंडळी मुला-बाळांचा विचार न करताही टोकाचा निर्णय घेतात. त्यापेक्षा अशिक्षित कुटुंब सहज समूपदेशनाला प्रतिसाद देत असल्याचा अनुभव यवतमाळ येथील महिला सेलला अनेक प्रकरणातून आला आहे.संयमामुळेच संसार सुखाचा- विजया पंधरेमहिला सेलकडे येणारी प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यावर भर दिला जातो. दोन्हीकडील कुटुंबांना एकत्र बसवून त्यांचे समूपदेशन केले जाते. प्रत्येक प्रकरणात वेगवेगळा अनुभव असतो. त्यावर मात करीत दोन जीव एकत्र कसे नांदतील, यावर भर दिला जातो. विदेशात स्थायिक झालेली सहा प्रकरणे आमच्याकडे दाखल झाली होती. त्यातून तीन प्रकरणात मने जुळविण्यात आम्हाला यश आले. कोणताही प्रसंग असो, संयम ठेवण्याची गरज आहे. संयामामुळेच संसार सुखाचा होऊ शकता असे महिला सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे यांनी सांगितले.मोबाईल ठरतोय वादाचे कारणदिवसभर मोबाईलमध्ये मान खुपसून बसणे कौटुंबिक कलहाचे महत्वाचे कारण ठरत आहे. पती किंवा पत्नी मोबाईलचा अतिवापर करीत असेल तर त्यातून वाद-विवाद होतात. संशयीवृत्ती बळावते. एकमेकांचे फोन तपासले जातात. त्यातून वाद विकोपाला गेल्याची अनेक प्रकरणे महिला सेलकडे आली आहे. यासोबतच पतीची व्यसनाधिनता, संशयीवृत्ती, प्रेमविवाहाला कुटुंबातून झालेला विरोध, सासू-सुनेचा वाद, आई-वडिलांच्या अतिलाडात वाढलेली मुलगी यातून कौटुंबिक कलह वाढतात, असा अनुभव महिला सेलला अनेक प्रकरणातून आला आहे.