शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींची डाळ रेशन दुकानदारांच्या माथी

By admin | Updated: September 9, 2016 02:42 IST

स्वस्त धान्य दुकानातील कुठलीही वस्तू स्वस्तात मिळते, हा आजपर्यंतचा अनुभव. पण डाळीच्या बाबतीत या उलट स्थिती आहे.

कमी दराचा प्रस्ताव धूळखात : अडीच लाख ग्राहकांचा दुकानदारांना शोध रूपेश उत्तरवार  यवतमाळस्वस्त धान्य दुकानातील कुठलीही वस्तू स्वस्तात मिळते, हा आजपर्यंतचा अनुभव. पण डाळीच्या बाबतीत या उलट स्थिती आहे. खुल्या बाजारात स्वस्त आणि रेशन दुकानात डाळ महाग आहे. या डाळीची उचल कुठलाही कार्डधारक करत नसल्याने परवानाधारकांना सुमारे दोन कोटी रुपयांची डाळ विकायची कुठे याची चिंता लागली आहे. यातूनच अडीच लाख ग्राहकांचा शोध घेतला जात आहे.खुल्या बाजारात ९० रुपये किलो असलेली डाळ स्वस्तधान्य दुकानात १०३ रुपये किलो आहे. यामध्ये किलोमागे १३ रुपये गरीब ग्राहकांना जास्त द्यावे लागणार आहे. निर्माण झालेले नवीन संकट टाळण्यासाठी पुरवठा विभागाने दर कमी करण्याचा प्रस्ताव उपायुक्तांकडे ठेवला. डाळीचा पुरवठा झालेल्या जिल्ह्यांकडून याबाबत शासनाकडे प्रस्ताव येत आहे. आलेल्या प्रस्तावानंतरही मंत्रिमंडळाने महाग डाळ स्वस्त करण्याचा निर्णय घेतला नाही. यातुन सनाच्या तोंडावर डाळीचा गुंता अधिकच वाढला आहे.स्वस्तधान्य दुकानदारांना १०२ रुपये ३० पैसे किलो दराने डाळ वितरित करण्यात आली. ग्राहकांना ही डाळ १०३ रूपये किलो दराने विकायची आहे. यामध्ये विक्रेत्याला किलो मागे ७० पैसे मिळणार आहे. यानुसार दोन लाख ४७ हजार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासह अंत्योदय योजनेतील ग्राहकांना ही डाळ वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये एक लाख ४७ हजार दारिद्र्यरेषेखालचे कार्डधारक तर, एक लाख अंत्योदय कार्डधारक आहे. या कार्डधारकांसाठी दोन हजार ६६९ क्विंटल डाळ वितरित करण्यात आली. डाळ घेण्यास ग्राहक तयार नसतील तर दुकानातील डाळ शासनाला परत पाठविता येत नाही. तशी व्यवस्थेत तरतूद नाही. यामुळे दोन कोटींचे नुकसान विक्रेत्यांना सहन करावे लागणार आहे.स्वस्त दराच्या नावाखाली लूटण्याचे धोरणबाजारात महागाई कमी करण्याच्या नावाखाली स्वस्त दरात डाळ पुरविली जात असल्याचा कांगावा सरकारने केला. प्रत्यक्षात स्वस्त डाळ उपलब्ध असताना महागडी डाळ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी थोपविण्यात आली. यामुळे सरकार गोरगरिबांना लुटायला निघाले आहे. सरकारचे धोरणच गरिबांसाठी असल्याचा आरोप डाळ खरेदी करणारे ग्राहक करीत आहेत.दोन कोटी वसुल करायचे कसेयवतमाळ २७० क्विंटल, कळंब १५०, बाभूळगाव १११, आर्णी १६०, केळापूर २१२, घाटंजी १४५, राळेगाव १३५, वणी १३५, मारेगाव १००, झरी जामणी १२५, पुसद ३००, उमरखेड १७५, महागाव १९०, दारव्हा १९०, नेर १११ तर दिग्रस तालुक्याला १५० क्विंटल डाळीचे वितरण करण्यात आले. महागडया दराने ही डाळ घेण्यास ग्राहकांनी नकार दिला आहे. साधारणत: एका विक्रेत्याला ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान या माध्यमातून सहन करावे लागत आहे.