शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बारावीचे ऑफलाईन युद्ध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला ऑफलाईन पद्धतीने प्रारंभ झाला. जिल्ह्यातील साडेतीनशे परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० वाजतापासून इंग्रजीच्या पेपरला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील तुरळक घटनांचा अपवाद वगळता पहिला पेपर शांततेत, शिस्तीत आणि लाखखिंडचा अपवाद वगळता काॅपीमुक्त वातावरणात पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल दोन वर्षांपासून कोरोनामुळे अभ्यासाचे वांदे झालेले असताना बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे उभी ठाकलेली वार्षिक परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली. शाळा बंद असणे, ऑनलाईन अभ्यासात नेटवर्क नसणे, शिक्षकांशी अनेक दिवस भेट न होणे, हवे ते पुस्तक वेळेत न मिळणे, परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बस नसणे अशा अनेक अडचणी असतानाही विद्यार्थी लढवैय्या सैनिकांप्रमाणे इंग्रजीच्या पहिल्या पेपरसाठी परीक्षेच्या मैदानात उतरले होते. तब्बल ९९ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला ऑफलाईन पद्धतीने प्रारंभ झाला. जिल्ह्यातील साडेतीनशे परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० वाजतापासून इंग्रजीच्या पेपरला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील तुरळक घटनांचा अपवाद वगळता पहिला पेपर शांततेत, शिस्तीत आणि लाखखिंडचा अपवाद वगळता काॅपीमुक्त वातावरणात पार पडला.  गावातच परीक्षा असल्याने केंद्राबाहेर पालकांची गर्दी दिसली.

विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने उघडले प्रश्नसंच - बारावी परीक्षेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच परीक्षेचा प्रश्नसंच विद्यार्थ्याच्या स्वाक्षरीने उघडण्यात आला. बोर्डातर्फे प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्वनियोजनानुसार पेपरचे गठ्ठे पोहोचविण्यात आले होते. पूर्वी हे गठ्ठे शिक्षक उघडून विद्यार्थ्यांना पेपर वाटत होते. मात्र यंदा पेपरचा गठ्ठा परीक्षा वर्गात आणून विद्यार्थ्यांच्या समक्ष, त्यांच्या स्वाक्षरीनिशी उघडले. 

आधी परीक्षा तब्येतीची  - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षा होत असल्याने परीक्षा केंद्रावर विशेष काळजी घेण्यात आली. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अर्धातास आधी बोलावून सुरुवातीला थर्मल गणद्वारे त्यांच्या शरीराचे तापमान मोजण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातावर सॅनिटायझर फवारण्यात आले. बैठक व्यवस्थाही झिकझॅक पद्धतीने करण्यात आली. वर्गांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. 

प्रत्येक केंद्रावर थेट बोर्डाचा ऑनलाईन वाॅच- शिक्षण विभागाने नेमलेल्या भरारी पथकांनी तसेच बैठ्या पथकांनी परीक्षेवर चोख नजर ठेवली. प्रत्येक केंद्रात दोन पोलीसही तैनात करण्यात आले. मात्र त्यापेक्षाही कठोर नजर बोर्डाने ऑनलाईन पद्धतीने ठेवली. पेपर संपल्याबरोबर प्रत्येक केंद्र संचालकांकडून बोर्डाने संपूर्ण विद्यार्थ्यांच्या यादीसह पेपर दरम्यानची माहिती मागविली. 

 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाcollegeमहाविद्यालय