शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

बारावीचे ऑफलाईन युद्ध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला ऑफलाईन पद्धतीने प्रारंभ झाला. जिल्ह्यातील साडेतीनशे परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० वाजतापासून इंग्रजीच्या पेपरला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील तुरळक घटनांचा अपवाद वगळता पहिला पेपर शांततेत, शिस्तीत आणि लाखखिंडचा अपवाद वगळता काॅपीमुक्त वातावरणात पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल दोन वर्षांपासून कोरोनामुळे अभ्यासाचे वांदे झालेले असताना बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे उभी ठाकलेली वार्षिक परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली. शाळा बंद असणे, ऑनलाईन अभ्यासात नेटवर्क नसणे, शिक्षकांशी अनेक दिवस भेट न होणे, हवे ते पुस्तक वेळेत न मिळणे, परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बस नसणे अशा अनेक अडचणी असतानाही विद्यार्थी लढवैय्या सैनिकांप्रमाणे इंग्रजीच्या पहिल्या पेपरसाठी परीक्षेच्या मैदानात उतरले होते. तब्बल ९९ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला ऑफलाईन पद्धतीने प्रारंभ झाला. जिल्ह्यातील साडेतीनशे परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० वाजतापासून इंग्रजीच्या पेपरला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील तुरळक घटनांचा अपवाद वगळता पहिला पेपर शांततेत, शिस्तीत आणि लाखखिंडचा अपवाद वगळता काॅपीमुक्त वातावरणात पार पडला.  गावातच परीक्षा असल्याने केंद्राबाहेर पालकांची गर्दी दिसली.

विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने उघडले प्रश्नसंच - बारावी परीक्षेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच परीक्षेचा प्रश्नसंच विद्यार्थ्याच्या स्वाक्षरीने उघडण्यात आला. बोर्डातर्फे प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्वनियोजनानुसार पेपरचे गठ्ठे पोहोचविण्यात आले होते. पूर्वी हे गठ्ठे शिक्षक उघडून विद्यार्थ्यांना पेपर वाटत होते. मात्र यंदा पेपरचा गठ्ठा परीक्षा वर्गात आणून विद्यार्थ्यांच्या समक्ष, त्यांच्या स्वाक्षरीनिशी उघडले. 

आधी परीक्षा तब्येतीची  - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षा होत असल्याने परीक्षा केंद्रावर विशेष काळजी घेण्यात आली. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अर्धातास आधी बोलावून सुरुवातीला थर्मल गणद्वारे त्यांच्या शरीराचे तापमान मोजण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातावर सॅनिटायझर फवारण्यात आले. बैठक व्यवस्थाही झिकझॅक पद्धतीने करण्यात आली. वर्गांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. 

प्रत्येक केंद्रावर थेट बोर्डाचा ऑनलाईन वाॅच- शिक्षण विभागाने नेमलेल्या भरारी पथकांनी तसेच बैठ्या पथकांनी परीक्षेवर चोख नजर ठेवली. प्रत्येक केंद्रात दोन पोलीसही तैनात करण्यात आले. मात्र त्यापेक्षाही कठोर नजर बोर्डाने ऑनलाईन पद्धतीने ठेवली. पेपर संपल्याबरोबर प्रत्येक केंद्र संचालकांकडून बोर्डाने संपूर्ण विद्यार्थ्यांच्या यादीसह पेपर दरम्यानची माहिती मागविली. 

 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाcollegeमहाविद्यालय