शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पूल खचल्याने बंदी भागातील एसटी बंद

By admin | Updated: July 16, 2016 02:46 IST

कायम उपेक्षिताचे जीणे नशिबी असलेल्या बंदी भागातील नागरिकांच्या समस्यांत संततधार पावसाने वाढ केली. ..

सोनदाभीचा संपर्क तुटला : १५ किलोमीटरची करावी लागते पायपीट अविनाश खंदारे उमरखेड कायम उपेक्षिताचे जीणे नशिबी असलेल्या बंदी भागातील नागरिकांच्या समस्यांत संततधार पावसाने वाढ केली. तालुक्यातील सोनदाभी गावाजवळील पूल खचला. परिणामी या परिसरातील नागरिकांचा तालुक्याशी संपर्क तुटला. एसटी महामंडळाने आपली सेवाही बंद केली. परिणामी नागरिकांना १५ किलोमीटरची पायपीट करावी लागते. उमरखेड तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणजे बंदी भाग होय. मुलभूत सुविधाही येथे उपलब्ध नाही. त्यातच पावसाळ म्हटले की, या परिसरातील नागरिकांच्या अंगावर काटा उभा राहतो. वनविभागाच्या जाचक अटींमुळे रस्त्यांची दुरूस्ती होत नाही. पावसाळ््यात रस्त्यावरून चालणे कठीण होते. अनेक ठिकाणचे पूल खिळखिळे झाले आहेत. गत आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने बंदी भागात कहर केला. सोनदाभी येथील नाल्याच्या पुराने पूल खचला. परिणामी परोटी, गाडी, बोरी, जवराळा, मोरचंडी, सोनदाभी, थेरडी या गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला. राज्य परिवहन महामंडळाची बसही बंद झाली. ७ जुलैपासून या परिसरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. उमरखेड येथे येण्यासाठी या भागातील नागरिकांना १५ किलोमीटरपर्यंत जेवलीपर्यंत चालत यावे लागते. त्यानंतर तेथून बस पकडून उमरखेड गाठावे लागते. परतीचा प्रवास तर त्याहीपेक्षा धोकादायक आहे. अभयारण्यातील वन्यप्राणी हल्ला करण्याची भीती कायमची असते. अनेक जण जीव मुठीत घेऊन रस्ता पार करता. या पुलाची डागडुजी तात्काळ करावी अशी मागणी बंदी भागातील नागरिकांची आहे.