शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पूल खचल्याने बंदी भागातील एसटी बंद

By admin | Updated: July 16, 2016 02:46 IST

कायम उपेक्षिताचे जीणे नशिबी असलेल्या बंदी भागातील नागरिकांच्या समस्यांत संततधार पावसाने वाढ केली. ..

सोनदाभीचा संपर्क तुटला : १५ किलोमीटरची करावी लागते पायपीट अविनाश खंदारे उमरखेड कायम उपेक्षिताचे जीणे नशिबी असलेल्या बंदी भागातील नागरिकांच्या समस्यांत संततधार पावसाने वाढ केली. तालुक्यातील सोनदाभी गावाजवळील पूल खचला. परिणामी या परिसरातील नागरिकांचा तालुक्याशी संपर्क तुटला. एसटी महामंडळाने आपली सेवाही बंद केली. परिणामी नागरिकांना १५ किलोमीटरची पायपीट करावी लागते. उमरखेड तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणजे बंदी भाग होय. मुलभूत सुविधाही येथे उपलब्ध नाही. त्यातच पावसाळ म्हटले की, या परिसरातील नागरिकांच्या अंगावर काटा उभा राहतो. वनविभागाच्या जाचक अटींमुळे रस्त्यांची दुरूस्ती होत नाही. पावसाळ््यात रस्त्यावरून चालणे कठीण होते. अनेक ठिकाणचे पूल खिळखिळे झाले आहेत. गत आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने बंदी भागात कहर केला. सोनदाभी येथील नाल्याच्या पुराने पूल खचला. परिणामी परोटी, गाडी, बोरी, जवराळा, मोरचंडी, सोनदाभी, थेरडी या गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला. राज्य परिवहन महामंडळाची बसही बंद झाली. ७ जुलैपासून या परिसरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. उमरखेड येथे येण्यासाठी या भागातील नागरिकांना १५ किलोमीटरपर्यंत जेवलीपर्यंत चालत यावे लागते. त्यानंतर तेथून बस पकडून उमरखेड गाठावे लागते. परतीचा प्रवास तर त्याहीपेक्षा धोकादायक आहे. अभयारण्यातील वन्यप्राणी हल्ला करण्याची भीती कायमची असते. अनेक जण जीव मुठीत घेऊन रस्ता पार करता. या पुलाची डागडुजी तात्काळ करावी अशी मागणी बंदी भागातील नागरिकांची आहे.