शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बहुरूपी समाजावर उपासमारीची पाळी, स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही समाज उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:48 IST

पांढरकवडा तालुक्यात बहुरूपी समाज हा मागील ६० ते ७० वर्षांपासून राहत आहे. इतर तालुक्यातही तो विखुरला आहे. देवी-देवतांपासून तर ...

पांढरकवडा तालुक्यात बहुरूपी समाज हा मागील ६० ते ७० वर्षांपासून राहत आहे. इतर तालुक्यातही तो विखुरला आहे. देवी-देवतांपासून तर पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत विविध प्रकारची वेशभूषा करून ते गावोगावी फिरून लोकांचे मनोरंजन करतात. लोकांकडून मिळालेल्या बक्षिसावर आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हा त्यांचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे. गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा इत्यादी सणांमध्ये बहुरूपी लोक विविध देवाधर्माची आणि वाघाची, सिंहाची इत्यादी प्राण्यांचे सोंग घेऊन गावोगावी जाऊन लोकांचे व समाजाचे मनोरंजन करीत असतात. टाळ-मृदुंग ढोल ताशा इत्यादी वाद्यसुद्धा वाजवून स्वतः गाणीसुद्धा गातात. त्याद्वारे गावोगावी समाजाचे मनोरंजन करतात. सणासुदीच्या दिवसांमध्ये रात्री-बेरात्री जागरण करीत देवी-देवतांची भजने म्हणून त्यांची आराधना करतात. लोकांच्या घरी पूजेची, इतर सणासुदीची कामे असली तरी तिथे विविध प्रकारे आपल्या कलाकुसरीची निपुणता दाखवून त्यामध्ये मिळालेल्या रकमेतून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा हा व्यवसाय परंपरागत आहे. गावोगावी भटकंती करून आजपावेतो तालुक्यातील लोकांचे मनोरंजन करून आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत होते; परंतु त्यांच्या या व्यवसायाला आता उतरती कळा आली आहे.

बॉक्स - शासनाच्या कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत

बहुरूपी ही या समाजाची पोटजात असून, हा समाज एन.टी.मध्ये येतात. बहुरूपी हे जास्तीत जास्त निरक्षर असून, त्यांना कायद्याचे काहीही ज्ञान नाही. विविध प्रकारची रूपे धारण करून ते आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्याकडे त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र आणि त्यांचे वैयक्तिक इतर कागदपत्रेसुद्धा नाहीत. या समाजाला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ आजपावेतो मिळाला नाही. शासनाकडून घरकुल किंवा बिनव्याजी कर्जाचाही लाभ मिळाला नाही. मुलांच्या शिक्षणामध्ये सवलतीही समाजाला आजपावेतो मिळालेल्या नाहीत. त्यांना या सोयी-सुविधा मिळणे आवश्यक आहे. बहुरूपी समाजाने त्यांच्या उभ्या आयुष्यात समाजाचे कल्याण आणि मनोरंजन करूनदेखील त्यांना अख्ख्या महाराष्ट्रात कोठेही गौरविलेले नाही आणि शासनाने याबाबत कधीही या वर्गांचा विचार केला नाही, ही शोकांतिका आहे. त्यांच्यात एवढी कला खच्चून भरलेली आहे की, कधी त्यांना त्याबाबत त्यांची कलाकुसर दाखविण्यासाठी शासनस्तरावर पाचारण करण्यात आले नाही. शासनाने त्यांना योग्य ते मानधन देण्यात यावे व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.