शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

आधुनिक शोषण व्यवस्था उलथवून टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:30 IST

समकाळात निर्माण होणारी आव्हाने व या देशातील शोषक वर्गाने निर्माण केलेली आधुनिक शोषण व्यवस्था, इथला आंबेडकरी माणूसच उद्ध्वस्त करु शकतो. ही व्यवस्था उलथवून टाका, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ.अशोक पळवेकर यांनी केले.

ठळक मुद्देअशोक पळवेकर : पुसद येथे तिसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : समकाळात निर्माण होणारी आव्हाने व या देशातील शोषक वर्गाने निर्माण केलेली आधुनिक शोषण व्यवस्था, इथला आंबेडकरी माणूसच उद्ध्वस्त करु शकतो. ही व्यवस्था उलथवून टाका, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ.अशोक पळवेकर यांनी केले. ते येथील पंचायत समितीच्या शिवाजी सभागृहात तिसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.विचारमंचावर उद्घाटक आंबेडकरवादी विचारसरणीचे नेते रणधीर खोब्रागडे, धम्म चळवळीतील कार्यकर्ते अरुणदादा अळणे, अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे अध्यक्ष प्रशांत वंजारे, स्वागताध्यक्ष प्रा.सुधीर गोटे विराजमान होते. ‘एकच साहेब-बाबासाहेब’ मंडळातर्फे आयोजित अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेच्या तिसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाल्यार्पण करुन आणि निळी फीत कापून झाले.संमेलनाध्यक्ष डॉ.अशोक पळवेकर पुढे म्हणाले, या देशात दोन तत्वज्ञान व दोन संस्कृतीतील संघर्ष सतत चालत आलेला आहे. देशातल्या आजच्या राजकारणाने शिक्षण व्यवस्थेसह धर्मकारण, समाजकारणाला आपल्या व्यवस्थेचे बटीक बनवलेले आहे. शोषणाची ही विषमतावादी व्यवस्था मुळासकट उद्ध्वस्त करायची असेल, तर आंबेडकरी माणसाला एक सशक्त अशी राजकीय भूमिका घेणे आवश्यक आहे. आपण राजकीय भूमिका घेतलीच नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रातील भूमिकाही मृतप्राय ठरतात. यासाठी डॉ.आंबेडकर यांच्या वैश्विक तत्वज्ञानाशी कायम प्रामाणिक राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. नांदेड येथील पहिल्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रात्री प्रवीण राजहंस आणि संचाचा आंबेडकरी जलसा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक मुख्य संयोजक गणेश कांबळे यांनी केले. उद्घाटकीय सत्राचे संचालन शीतल वानखेडे, तर आभार निमंत्रक हेमंत इंगोले यांनी मानले.संमेलनाच्या यशस्वीतेसाठी साहित्य संसदेचे सचिव गंगाधर ढवळे, सहसंयोजक विशाल डाके, प्रशांत धुळे, किशोर भवरे, दिनेश चोपडे, सागर डाके, सोनू वरठी, अंकुश अघम, विक्रांत डाके, शेख महबूब, जाँबाज इराणी, आशिष अघम, अतुल हजारे, अमोल डाके, शेख दिलावर, विपुल भवरे, गाडगे आदी परिश्रम घेत आहे.बाबासाहेबांच्या विचारांची अपरिहार्यतासाहित्य संसदेचे अध्यक्ष प्रशांत वंजारे यांनी ‘समकाळात बाबासाहेबांच्या विचारांची अपरिहार्यता आणि संमेलनाची आवश्यकता’ याबाबत साहित्य संसदेची भूमिका विषद केली. इतर पाहुण्यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर, त्यांची साहित्य संपदा, त्यांचे विचार आदींवर प्रकाश टाकला.