शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

आधुनिक शोषण व्यवस्था उलथवून टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:30 IST

समकाळात निर्माण होणारी आव्हाने व या देशातील शोषक वर्गाने निर्माण केलेली आधुनिक शोषण व्यवस्था, इथला आंबेडकरी माणूसच उद्ध्वस्त करु शकतो. ही व्यवस्था उलथवून टाका, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ.अशोक पळवेकर यांनी केले.

ठळक मुद्देअशोक पळवेकर : पुसद येथे तिसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : समकाळात निर्माण होणारी आव्हाने व या देशातील शोषक वर्गाने निर्माण केलेली आधुनिक शोषण व्यवस्था, इथला आंबेडकरी माणूसच उद्ध्वस्त करु शकतो. ही व्यवस्था उलथवून टाका, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ.अशोक पळवेकर यांनी केले. ते येथील पंचायत समितीच्या शिवाजी सभागृहात तिसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.विचारमंचावर उद्घाटक आंबेडकरवादी विचारसरणीचे नेते रणधीर खोब्रागडे, धम्म चळवळीतील कार्यकर्ते अरुणदादा अळणे, अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे अध्यक्ष प्रशांत वंजारे, स्वागताध्यक्ष प्रा.सुधीर गोटे विराजमान होते. ‘एकच साहेब-बाबासाहेब’ मंडळातर्फे आयोजित अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेच्या तिसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाल्यार्पण करुन आणि निळी फीत कापून झाले.संमेलनाध्यक्ष डॉ.अशोक पळवेकर पुढे म्हणाले, या देशात दोन तत्वज्ञान व दोन संस्कृतीतील संघर्ष सतत चालत आलेला आहे. देशातल्या आजच्या राजकारणाने शिक्षण व्यवस्थेसह धर्मकारण, समाजकारणाला आपल्या व्यवस्थेचे बटीक बनवलेले आहे. शोषणाची ही विषमतावादी व्यवस्था मुळासकट उद्ध्वस्त करायची असेल, तर आंबेडकरी माणसाला एक सशक्त अशी राजकीय भूमिका घेणे आवश्यक आहे. आपण राजकीय भूमिका घेतलीच नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रातील भूमिकाही मृतप्राय ठरतात. यासाठी डॉ.आंबेडकर यांच्या वैश्विक तत्वज्ञानाशी कायम प्रामाणिक राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. नांदेड येथील पहिल्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रात्री प्रवीण राजहंस आणि संचाचा आंबेडकरी जलसा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक मुख्य संयोजक गणेश कांबळे यांनी केले. उद्घाटकीय सत्राचे संचालन शीतल वानखेडे, तर आभार निमंत्रक हेमंत इंगोले यांनी मानले.संमेलनाच्या यशस्वीतेसाठी साहित्य संसदेचे सचिव गंगाधर ढवळे, सहसंयोजक विशाल डाके, प्रशांत धुळे, किशोर भवरे, दिनेश चोपडे, सागर डाके, सोनू वरठी, अंकुश अघम, विक्रांत डाके, शेख महबूब, जाँबाज इराणी, आशिष अघम, अतुल हजारे, अमोल डाके, शेख दिलावर, विपुल भवरे, गाडगे आदी परिश्रम घेत आहे.बाबासाहेबांच्या विचारांची अपरिहार्यतासाहित्य संसदेचे अध्यक्ष प्रशांत वंजारे यांनी ‘समकाळात बाबासाहेबांच्या विचारांची अपरिहार्यता आणि संमेलनाची आवश्यकता’ याबाबत साहित्य संसदेची भूमिका विषद केली. इतर पाहुण्यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर, त्यांची साहित्य संपदा, त्यांचे विचार आदींवर प्रकाश टाकला.