शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

यवतमाळ-चंद्रपूर सीमावर्ती भागातील अवैध धंदे बंद करा

By admin | Updated: July 18, 2016 00:55 IST

यवतमाळ व चंद्रपूर जिल्हा सीमेलगतच्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे तथा वाहतूक फोफावली आहे.

हंसराज अहीर : वेकोलि, पोलीस, परिवहन, उत्पादन शुल्क विभागाला निर्देश यवतमाळ : यवतमाळ व चंद्रपूर जिल्हा सीमेलगतच्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे तथा वाहतूक फोफावली आहे. यामुळे अनेक अनुचित प्रकार वारंवार घडतात. या सर्व अवैध धंद्यांवर तातडीने निर्बंध घालण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. यासाठी वेकोलि, पोलीस, परिवहन व उत्पादन शुल्क विभागास ठराविक काळाचा अल्टिमेटमही त्यांनी दिला. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेलगत भागामध्ये फोफावलेल्या अवैध धंद्यांना आवर घालण्यासाठी कायदा व सुवस्थेबाबतची संयुक्त बैठक घुग्गुस येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे, राजूरचे आमदार संजय धोटे, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे, यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक राजीवरंजन मिश्र यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उत्पादन शुल्कचे अधीक्षक, संबंधित भागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते. वेकोलिच्या कोळसा वाहतुकीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. सदर कोळसा सरसकट अवैधपणे वाहतूक केला जातो. अनेक ठिकाणी अवैधपणे कोलडेपो चालविले जातात. यावर नियंत्रण नाही, याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत या सर्व बाबींवर महिनाभरात प्रतिबंध घालण्याचे निर्देश दिले. कोळशाची अवैध वाहतूक किंवा साठा आढळून आल्यास तत्काळ कार्यवाही केली जावी. वकोलि परिसरातील अवैध वाहतूक व धंद्यांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यासोबतच परिसरात फिरणाऱ्या सर्व वाहनांचे जीपीएस, जीपीआरएसद्वारे नियंत्रण करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य महाप्रबंधकांना दिले. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेलगत मोठ्या प्रमाणावर राज्याबाहेरील वाहनांची वर्दळ आहे. या वाहनांचे परवाने आहेत का? वाहनांवर काम करणाऱ्या मजुरांची वर्तवणूक कशी आहे, या बाबींवर बारकाईने लक्ष केंद्रित केले जावे. सातत्याने नियमांचा भंग करून वाहतूक केली जात असल्यास वाहनांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या सर्व बाबींच्या सुधारणेसाठी ठरावीक काळाचा अल्टिमेटमही अहीर यांनी सर्व संबंधित विभागांना बैठकीत दिला. (स्थानिक प्रतिनिधी) दारूच्या बाटल्यांवर बारकोड करा दोन जिल्ह्यांच्या सीमेलगत अवैध मद्यविक्री केली जात आहे. तसेच जनावरांची अवैध वाहतूक व तस्करीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही वाहतूक थांबविण्यासाठी पोलीस व परिवहन विभागाने संयुक्त कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वणी येथील मद्य बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला पुरविले जाते. हा पुरवठा होऊ नये म्हणून मद्यांच्या बाटल्यांवर बारकोड करण्यात यावे. यामुळे कोणत्या दुकानातील माल चंद्रपूरला पुरविण्यात आला, याचा शोध घेणे शक्य होणार आहे. अवैध वाहतुकीवर पायबंद घालण्यासाठी ठिकठिकाणी तपासणी नाके निर्माण करण्यासोबतच सतत धाडसत्र सुरू ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.