शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

लेव्हीद्वारे हर्रास पद्धती बंद करावी

By admin | Updated: June 22, 2015 02:07 IST

लेव्हीद्वारे शेतजमिनीची हर्रास पद्धती बंद करण्यात यावी, तसेच अधर पूस प्रकल्पाद्वारे ...

निवेदन : अधिग्रहीत शेती परत करण्याची शेतकऱ्यांची मागणीआर्णी : लेव्हीद्वारे शेतजमिनीची हर्रास पद्धती बंद करण्यात यावी, तसेच अधर पूस प्रकल्पाद्वारे अधिग्रहण करण्यात आलेल्या शेतींना परत देण्यात यावे, अशा प्रकारचे निवेदन पीडित शेतकऱ्यांनी तहसीलदारांना शुक्रवारी दिले.१९८२-८३ मध्ये शेतकऱ्यांना शेतजमिनीपर्यंत कालवा व पाटसऱ्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी अधर पूस प्रकल्पाद्वारे अधिग्रहीत करण्यात आल्या. परंतु या संपूर्ण क्षेत्रास पाणी देण्यास पूस प्रकल्प असमर्थ असून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. सदर शेतजमिनीवर प्रकल्पाचे कुठलेही उद्दिष्ट गेल्या २७ वर्षांत यशस्वी न झाल्यामुळे या जमिनी आता आम्हाला परत करण्यात याव्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतजमिनी परत करण्याची मागणी वारंवार करण्यात येऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. शासनाने या संदर्भात कोणतीच कारवाई न केल्यामुळे दरवर्षीप्रमाणे शेतकरी या जमिनींच्या हर्रास प्रक्रियेचा विरोध दर्शवून बहिष्कार टाकत आहे. गेल्या वर्षीची जमीन परत देण्यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा व लेव्हीद्वारे शेतजमिनीचा हर्रास होवू नये, अशी मागणी कवठाबाजार, साकूर, मुकिंदपूर शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी विवेक दहीफळे, प्रकाश हजारे, विजय ठाकरे, भगाजी हजारे, शिवाजी दहीफळे, पुंजाबाई ढोरे, रामराव हजारे, अरविंद दहीफळे, उद्धव गादेवार, सुनील गादेवार, विनायक शिंदे, प्रशांत जाधव, नारायण व्यवहारे, गजानन जेठेवाड, दिनकर कागने, रामदास जेठेवाड, गजानन रामनबोईनवाड, हरीबाजी पांडे, आशा जाधव, धनंजय जाधव, सुभाष हजारे, भगवंत जाधव, मोरेश्वर पाटील, मालती जागिरदार, शिवराज जाधव, योगेश दहीफळे, सुरज तिळे, अनिता जाधव, लक्ष्मीकांत पांडे, लक्ष्मण पांडे, गोविंद पांडे आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)