शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

लेव्हीद्वारे हर्रास पद्धती बंद करावी

By admin | Updated: June 22, 2015 02:07 IST

लेव्हीद्वारे शेतजमिनीची हर्रास पद्धती बंद करण्यात यावी, तसेच अधर पूस प्रकल्पाद्वारे ...

निवेदन : अधिग्रहीत शेती परत करण्याची शेतकऱ्यांची मागणीआर्णी : लेव्हीद्वारे शेतजमिनीची हर्रास पद्धती बंद करण्यात यावी, तसेच अधर पूस प्रकल्पाद्वारे अधिग्रहण करण्यात आलेल्या शेतींना परत देण्यात यावे, अशा प्रकारचे निवेदन पीडित शेतकऱ्यांनी तहसीलदारांना शुक्रवारी दिले.१९८२-८३ मध्ये शेतकऱ्यांना शेतजमिनीपर्यंत कालवा व पाटसऱ्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी अधर पूस प्रकल्पाद्वारे अधिग्रहीत करण्यात आल्या. परंतु या संपूर्ण क्षेत्रास पाणी देण्यास पूस प्रकल्प असमर्थ असून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. सदर शेतजमिनीवर प्रकल्पाचे कुठलेही उद्दिष्ट गेल्या २७ वर्षांत यशस्वी न झाल्यामुळे या जमिनी आता आम्हाला परत करण्यात याव्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतजमिनी परत करण्याची मागणी वारंवार करण्यात येऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. शासनाने या संदर्भात कोणतीच कारवाई न केल्यामुळे दरवर्षीप्रमाणे शेतकरी या जमिनींच्या हर्रास प्रक्रियेचा विरोध दर्शवून बहिष्कार टाकत आहे. गेल्या वर्षीची जमीन परत देण्यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा व लेव्हीद्वारे शेतजमिनीचा हर्रास होवू नये, अशी मागणी कवठाबाजार, साकूर, मुकिंदपूर शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी विवेक दहीफळे, प्रकाश हजारे, विजय ठाकरे, भगाजी हजारे, शिवाजी दहीफळे, पुंजाबाई ढोरे, रामराव हजारे, अरविंद दहीफळे, उद्धव गादेवार, सुनील गादेवार, विनायक शिंदे, प्रशांत जाधव, नारायण व्यवहारे, गजानन जेठेवाड, दिनकर कागने, रामदास जेठेवाड, गजानन रामनबोईनवाड, हरीबाजी पांडे, आशा जाधव, धनंजय जाधव, सुभाष हजारे, भगवंत जाधव, मोरेश्वर पाटील, मालती जागिरदार, शिवराज जाधव, योगेश दहीफळे, सुरज तिळे, अनिता जाधव, लक्ष्मीकांत पांडे, लक्ष्मण पांडे, गोविंद पांडे आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)