शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

तुरीवर रोग, शेतकरी चिंतातुर

By admin | Updated: November 22, 2015 02:33 IST

सोयाबीन आणि कापसाने दगा दिला. सर्व आशा तूर पिकावर होत्या. मात्र त्यावर रोगाने आक्रमण केले.

ढगाळ वातावरण : कृषी मार्गदर्शनाची प्रतीक्षा, कृषी सहायकांची पावले कधी वळणार?प्रवेश कवडे हरदडासोयाबीन आणि कापसाने दगा दिला. सर्व आशा तूर पिकावर होत्या. मात्र त्यावर रोगाने आक्रमण केले. आधीच चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले जाण्याची भीती आहे. तूर हातातून गेल्यास वर्षभर कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा, प्रासंगिक खर्च करायचे कसे याची काळजी त्यांना लागली आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही कृषी विभागाकडून कुठलेही मार्गदर्शन होत नाही. या विभागातील अधिकारी वा कर्मचारी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचण्याची तसदी घेत नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उशिराचा पाऊस, बराच काळपर्यंत दडी आणि आवश्यक त्यावेळी पावसाची माघार या कारणामुळे सोयाबीन आणि कापूस हे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. सोयाबीनला पाण्याची गरज असताना वरुण राजा बरसला नाही. त्यामुळे बळीराजाची सर्व भिस्त तूर पिकावर आहे. आता या पिकावर ढगाळ वातावरणामुळे अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. या स्थितीत काय उपाययोजना करायला पाहिजे, याविषयीचे मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. प्रत्यक्षात यावर्षी तुरीचा पेरा कमी आहे. त्यातही वातावरणातील बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढला. तूर काढणीवर येण्यासाठी बराच कालावधी आहे. फुलोऱ्यावर असलेल्या तुरीवर मावा आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने फुलांची गळती वाढली आहे. यावर नियंत्रण न आणल्यास संपूर्ण तूर पीक हातची जाण्याची चिन्हे दिसत आहे. गेली दोन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. हा काळ तूर पिकासाठी लाभदायक आहे. पण, कीडींचा प्रादुर्भाव धोक्याचा ठरत आहे. कृषी विभागाचे कृषी सहायक, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची पावले शेतापर्यंत वळावी, अशी अपेक्षा मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना आहे.