शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

विज्ञानामुळेच मानवाची खरी उत्क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:31 IST

विज्ञान आणि मानव यांचे अतुट नाते आहे. दैनंदिन जीवनात विज्ञानाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आज आपण सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत आहो. विज्ञानामुळेच मानवाची खरी उत्क्रांती झाली, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले.

ठळक मुद्देमाधुरी आडे : आर्णी येथे विज्ञान प्रदर्शन व बालनाट्य स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : विज्ञान आणि मानव यांचे अतुट नाते आहे. दैनंदिन जीवनात विज्ञानाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आज आपण सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत आहो. विज्ञानामुळेच मानवाची खरी उत्क्रांती झाली, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले.पंचायत समिती शिक्षण विभाग आणि स्वामी विवेकानंद डिजिटल शाळेच्यावतीने आयोजित ‘आविष्कार-२०१९’ या उपक्रमांतर्गत तालुका विज्ञान प्रदर्शन, बालनाट्य स्पर्धा आणि क्रीडा सामन्याचे उद्घाटन माधुरी आडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. त्यांनी आपल्या अध्यापन कौशल्याचा प्रभावीपणे उपयोग करून सुसंस्कृत व गुणवान विद्यार्थी घडवावे, असे त्या म्हणाल्या.पंचायत समिती सभापती सूर्यकांत जयस्वाल अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, संस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव यांनीही विचार मांडले. विचारपीठावर आर्णीचे माजी नगराध्यक्ष अनिल आडे, विलास अगलधरे, संदीप उपाध्ये, किशोर रावते, हिरामण जाधव आदी उपस्थित होते. संचालन आसाराम चव्हाण यांनी, तर आभार मुख्याध्यापक आकाश जाधव यांनी मानले.

टॅग्स :scienceविज्ञान