शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विज्ञानामुळेच मानवाची खरी उत्क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:31 IST

विज्ञान आणि मानव यांचे अतुट नाते आहे. दैनंदिन जीवनात विज्ञानाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आज आपण सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत आहो. विज्ञानामुळेच मानवाची खरी उत्क्रांती झाली, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले.

ठळक मुद्देमाधुरी आडे : आर्णी येथे विज्ञान प्रदर्शन व बालनाट्य स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : विज्ञान आणि मानव यांचे अतुट नाते आहे. दैनंदिन जीवनात विज्ञानाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. आज आपण सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती करीत आहो. विज्ञानामुळेच मानवाची खरी उत्क्रांती झाली, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले.पंचायत समिती शिक्षण विभाग आणि स्वामी विवेकानंद डिजिटल शाळेच्यावतीने आयोजित ‘आविष्कार-२०१९’ या उपक्रमांतर्गत तालुका विज्ञान प्रदर्शन, बालनाट्य स्पर्धा आणि क्रीडा सामन्याचे उद्घाटन माधुरी आडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. त्यांनी आपल्या अध्यापन कौशल्याचा प्रभावीपणे उपयोग करून सुसंस्कृत व गुणवान विद्यार्थी घडवावे, असे त्या म्हणाल्या.पंचायत समिती सभापती सूर्यकांत जयस्वाल अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, संस्थेचे अध्यक्ष राजुदास जाधव यांनीही विचार मांडले. विचारपीठावर आर्णीचे माजी नगराध्यक्ष अनिल आडे, विलास अगलधरे, संदीप उपाध्ये, किशोर रावते, हिरामण जाधव आदी उपस्थित होते. संचालन आसाराम चव्हाण यांनी, तर आभार मुख्याध्यापक आकाश जाधव यांनी मानले.

टॅग्स :scienceविज्ञान