शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते - वैशाली येडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 21:44 IST

अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे पुनर्जन्म मानत नाही, तसे असते तर मीही आत्महत्या केली असती.

स्नेहा मोरेलोकमत न्यूज नेटवर्कराष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीयवतमाळ : अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले.मराठीच्या एवढ्या मोठ्या मंगल सोहळ्यात कुंकुवाचा टिळा लावण्यासाठी माज्यासारखी विधवा कामी आली हे माझं भाग्य समजते असे म्हणत येडे यांनी आवर्जून नमूद केले. ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांचे उदघाटक म्हणून आमंत्रण रद्द केल्यानंतर संमेलनाच्या उद्घाटकाचा मान कोणाकडे जाणार याबाबत सर्व स्तरांवर चर्चा रंगत होती. काही मान्यवर साहित्यिकांनी पुन्हा सहगल यांना सन्मानाने आमंत्रित करण्याची मागणी केली होती. अखेर संयोजकांनी गुरुवारी दुपारी या वादावर पडदा टाकत वैशाली येडे यांचे नाव उद्घाटक म्हणून घोषित केले. त्यांनतर येडे यांच्या मनोगताविषयी साहित्य वतुर्ळात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र याला पूर्णविराम देत येडे यांनी अत्यंत परखड आणि बेधडकपणे आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थितांची दाद मिळवली.याप्रसंगी येडे यांनी म्हटले की , पुनर्जन्म मानत नाही, तसे असते तर मीही आत्महत्या केली असती. शेतकरी मरणानंतर अंबानी, अदानी होत नाही हे माज्या नवऱ्याला समजले नाही याची खंत आहे. माझा मात्र या जन्मावर विश्वास आहे म्हणून याच जन्मात ही वायद्याची शेती फायद्यात करण्यासाठी लढत आहे. मी बहिणाबाईंची लेक आहे, म्हणून कोणी अंगावर हात टाकला तर त्याला हात दाखविण्याची ताकद आहे, असे सांगत मी विधवा नाही, एकल महिला आहे असे येडे यांनी अधोरेखित केले. लेखन, साहित्याचा बाजार वाचत नाही , मी माणसांमध्ये राहून माणस वाचली, पण साहित्यातून जगण्याच बळ मिळत हे खरे आहे. त्यामुळेच 'तेरव' या नाट्यकृतीचा जन्म झाला. यातून एकल महिलांच्या जगण्याचा मदार्नी संघर्ष दाखविला आहे असे येडे म्हणाल्याजग रहाटीनं लादलेल विधवापणबाई नवऱ्याच्या घरी जाताना कुळ, दैवत, माय-बाप नवअडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले. मात्र असेच एखाद्या पुरुषाच्या बाबतीत झाले तर त्याला जमेल का असा परखड सवाल येडे यांनी उपस्थित केला. माज्या वाट्याला आलेल पांढर कपाळ हे निर्सगाच्या नियमाने आलेल नाही तर जगरहाटीनं आले आहे असे सांगत व्यवस्थेन अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले.लेखक अन कास्तकार सारखेचतुम्ही आमच्या दु:खावर कादंबऱ्या लिहिता, कथा लिहिता..त्याला पुरस्कार मिळतात. त्यावर सिनेमेही निघतात मात्र त्याला भाव मिळत नाही असे म्हणत लेखक आणि कष्टकरी सारखेच असल्याचे येडे म्हणाल्या. मात्र आता संमेलनाच्या निमित्ताने अभावात जगणाऱ्याला भाव मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन