शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

४० हजार दूरध्वनींची ‘ट्रिंग ट्रिंग’ थांबली

By admin | Updated: May 17, 2015 00:02 IST

संपर्काचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून दूरसंचार सेवेला प्राधान्य दिले जाते. असे असले तरी, या महत्त्वपूर्ण सेवेकडे केंद्र...

रुपेश उत्तरवार यवतमाळयवतमाळ : संपर्काचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून दूरसंचार सेवेला प्राधान्य दिले जाते. असे असले तरी, या महत्त्वपूर्ण सेवेकडे केंद्र शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळेच आयुर्मान संपल्यानंतरही दूरसंचार सेवेतील जुनी यंत्रसामुग्री बदलविली गेली नाही. परिणामी सेवा खंडित होवून ग्राहकच संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले. ‘ईस रूट की सभी लाईने अभी खराब है’ ही नेहमीची अडचण ग्राहक दूर जाण्याचे मोठे कारण ठरली. वैतागलेल्या ग्राहकांनी लँडलाईन फोन बंद केले. जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजार टेलिफोन ग्राहकांनी बंद केले आहेत.यवतमाळ जिल्ह्यात दूरध्वनी सेवा सुरू होऊन अर्धे शतक पूर्ण झाले. प्रारंभीच्या काळात दूरध्वनी सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांना रांगा लावाव्या लागत होत्या. एक ते दोन वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर दूरध्वनी क्रमांक ग्राहकांना मिळत होता. यामुळे दूरध्वनी घरात असणे एकेकाळी प्रतिष्ठेचे मानले जात होते. आज दूरसंचार विभागाचा हाच दूरध्वनी ग्राहकांची डोकेदुखी ठरत आहे. याला अनेक बाबी कारणीभूत आहे. भारत संचार निगमची सेवा केंद्र शासनामार्फत चालविली जाते. या सेवेने मागणी वाढताच वितरण व्यवस्थेकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. बीएसएनएलचे जाळे वाढत असतानाच या विभागाकडून जिल्ह्यांना लागणारी यंत्रसामुग्री पुरविण्यासाठी मोठा विलंब होत आहे. यातून बीएसएनएलचे ग्राहक तुटले आहेत. एकेकाळी ६० हजारांचा घरात टेलिफोन जिल्ह्यात होते. सद्यस्थितीत १९ हजार ६२० ग्राहक शिल्लक राहिले आहेत. जवळपास ४० हजार ग्राहकांनी दूरध्वनी सेवा बंद केली आहे. त्याऐवजी ग्राहकांनी खासगी कंपनीची सेवा घेणे पसंत केले आहे. बीएसएनएलच्या मोबाईल सेवेची हीच अवस्था आहे. टेलिफोनप्रमाणे या कंपनीचे ग्राहक खासगी कंपन्यांकडे वळत आहेत. मोबाईल सेवेमध्येही ७० हजार ग्राहकांनी आपली सेवा बदलविली आहे. सद्यस्थितीत एक लाख दहा हजार ग्राहकांजवळ बीएसएनएलचे सीमकार्ड आहेत. या कंपनीची सेवा सदोष मिळत असल्याने पर्यायी व्यव्यस्थाही अनेक ग्राहकांनी केली आहे. इतर एखाद्या कंपनीचे सीमकार्ड मोबाईलमध्ये टाकले आहेत. इंटरनेटचा वापर करता यावा म्हणून ब्रॉडबॅन्ड सेवेसाठी बीएसएनएलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सेवेला गती नसल्याने ग्राहक नाराज आहेत. सद्यस्थितीत सहा हजार १७६ ब्रॉडबॅन्ड कनेक्शन आहेत. यावरून इंटरनेट जोडण्यात येते. याला हवी तशी गती मिळत नाही. यामुळे ग्राहकांनी कार्यालयाशी वारंवार संपर्क साधला. परंतु वरिष्ठ कार्यालयाने कुठलीही दुरुस्ती केली नाही. संपूर्ण जिल्ह्यातील संपर्कक्षेत्र वाढावे म्हणून मोबाईल टॉवर बसविण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. असे असले तरी, सद्यस्थितीत १७६ मोबाईल टॉवर कार्यान्वित आहेत. ५० मोबाईल टॉवर्स संपर्कक्षेत्र काबीज करण्यासाठी लागण्याची शक्यता आहे. असे असले तरी, सध्या १२ नवीन मोबाईल टॉवरला मंजुरी देण्यात आली आहे. यावरून सेवा अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. भारत संचारच्या टॉवरवर खासगीचे कव्हरेजदूरसंचार विभागाने संपर्क मिळविण्यासाठी ग्रामीण भागात टॉवर उभारले आहेत. मात्र खासगी कंपन्यांचे अद्यापही काम अर्धवटच आहे. अशा काही कंपन्या भारत संचारच्या टॉवरवरून कव्हरेज मिळवत आहे. भारत संचारच्या टॉवरवर क्षमतेपेक्षा अधिक भार वाढला. परिणामी याच कंपनीच्या ग्राहकांना सेवा देण्यात प्रचंड अडथळ्यातून मार्ग काढावा लागत आहेत. खोदकामाने इंटरनेट कनेक्शन कोलमडलेशासकीय कार्यालयांमध्ये होणारे कामकाज सगणकाच्या माध्यमातून होत आहे. यासाठी इंटरनेटचा वापर होतो. रस्त्याच्या कामामुळे दूरसंचार विभागाच्या तारा जागोजागी तुटल्या आहेत. यामुळे विविध कार्यालयातील गोपनीय माहिती उघड होण्याचा धोका वाढला आहे. इतकेच नव्हे तर, टेलिफोनही बंद पडले आहेत. यातून भारत संचार निगमचा आर्थिक महसूल बुडाला आहे. यावर कारवाई करण्याची मागणी दूरसंचार निगमने केली आहे. मात्र कुठली कारवाई झाली नाही. ...तर महसुलात भक्कम भरदूरसंचार निगमला ग्राहकांची पहिली पसंती आहे. नानाविध अडचणींमुळे ग्राहकांनी आपली सेवा बंद केली आहे. यानंतरही दूरसंचार निगमला महिन्याकाठी सव्वादोन कोटींचा महसूल मिळतो. भारत संचार निगमने आपल्या उणिवा दूर केल्यास महसुलात भक्कम वाढ होईल. त्यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.