शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार दूरध्वनींची ‘ट्रिंग ट्रिंग’ थांबली

By admin | Updated: May 17, 2015 00:02 IST

संपर्काचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून दूरसंचार सेवेला प्राधान्य दिले जाते. असे असले तरी, या महत्त्वपूर्ण सेवेकडे केंद्र...

रुपेश उत्तरवार यवतमाळयवतमाळ : संपर्काचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणून दूरसंचार सेवेला प्राधान्य दिले जाते. असे असले तरी, या महत्त्वपूर्ण सेवेकडे केंद्र शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळेच आयुर्मान संपल्यानंतरही दूरसंचार सेवेतील जुनी यंत्रसामुग्री बदलविली गेली नाही. परिणामी सेवा खंडित होवून ग्राहकच संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले. ‘ईस रूट की सभी लाईने अभी खराब है’ ही नेहमीची अडचण ग्राहक दूर जाण्याचे मोठे कारण ठरली. वैतागलेल्या ग्राहकांनी लँडलाईन फोन बंद केले. जिल्ह्यात आतापर्यंत ४० हजार टेलिफोन ग्राहकांनी बंद केले आहेत.यवतमाळ जिल्ह्यात दूरध्वनी सेवा सुरू होऊन अर्धे शतक पूर्ण झाले. प्रारंभीच्या काळात दूरध्वनी सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांना रांगा लावाव्या लागत होत्या. एक ते दोन वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर दूरध्वनी क्रमांक ग्राहकांना मिळत होता. यामुळे दूरध्वनी घरात असणे एकेकाळी प्रतिष्ठेचे मानले जात होते. आज दूरसंचार विभागाचा हाच दूरध्वनी ग्राहकांची डोकेदुखी ठरत आहे. याला अनेक बाबी कारणीभूत आहे. भारत संचार निगमची सेवा केंद्र शासनामार्फत चालविली जाते. या सेवेने मागणी वाढताच वितरण व्यवस्थेकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. बीएसएनएलचे जाळे वाढत असतानाच या विभागाकडून जिल्ह्यांना लागणारी यंत्रसामुग्री पुरविण्यासाठी मोठा विलंब होत आहे. यातून बीएसएनएलचे ग्राहक तुटले आहेत. एकेकाळी ६० हजारांचा घरात टेलिफोन जिल्ह्यात होते. सद्यस्थितीत १९ हजार ६२० ग्राहक शिल्लक राहिले आहेत. जवळपास ४० हजार ग्राहकांनी दूरध्वनी सेवा बंद केली आहे. त्याऐवजी ग्राहकांनी खासगी कंपनीची सेवा घेणे पसंत केले आहे. बीएसएनएलच्या मोबाईल सेवेची हीच अवस्था आहे. टेलिफोनप्रमाणे या कंपनीचे ग्राहक खासगी कंपन्यांकडे वळत आहेत. मोबाईल सेवेमध्येही ७० हजार ग्राहकांनी आपली सेवा बदलविली आहे. सद्यस्थितीत एक लाख दहा हजार ग्राहकांजवळ बीएसएनएलचे सीमकार्ड आहेत. या कंपनीची सेवा सदोष मिळत असल्याने पर्यायी व्यव्यस्थाही अनेक ग्राहकांनी केली आहे. इतर एखाद्या कंपनीचे सीमकार्ड मोबाईलमध्ये टाकले आहेत. इंटरनेटचा वापर करता यावा म्हणून ब्रॉडबॅन्ड सेवेसाठी बीएसएनएलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सेवेला गती नसल्याने ग्राहक नाराज आहेत. सद्यस्थितीत सहा हजार १७६ ब्रॉडबॅन्ड कनेक्शन आहेत. यावरून इंटरनेट जोडण्यात येते. याला हवी तशी गती मिळत नाही. यामुळे ग्राहकांनी कार्यालयाशी वारंवार संपर्क साधला. परंतु वरिष्ठ कार्यालयाने कुठलीही दुरुस्ती केली नाही. संपूर्ण जिल्ह्यातील संपर्कक्षेत्र वाढावे म्हणून मोबाईल टॉवर बसविण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. असे असले तरी, सद्यस्थितीत १७६ मोबाईल टॉवर कार्यान्वित आहेत. ५० मोबाईल टॉवर्स संपर्कक्षेत्र काबीज करण्यासाठी लागण्याची शक्यता आहे. असे असले तरी, सध्या १२ नवीन मोबाईल टॉवरला मंजुरी देण्यात आली आहे. यावरून सेवा अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. भारत संचारच्या टॉवरवर खासगीचे कव्हरेजदूरसंचार विभागाने संपर्क मिळविण्यासाठी ग्रामीण भागात टॉवर उभारले आहेत. मात्र खासगी कंपन्यांचे अद्यापही काम अर्धवटच आहे. अशा काही कंपन्या भारत संचारच्या टॉवरवरून कव्हरेज मिळवत आहे. भारत संचारच्या टॉवरवर क्षमतेपेक्षा अधिक भार वाढला. परिणामी याच कंपनीच्या ग्राहकांना सेवा देण्यात प्रचंड अडथळ्यातून मार्ग काढावा लागत आहेत. खोदकामाने इंटरनेट कनेक्शन कोलमडलेशासकीय कार्यालयांमध्ये होणारे कामकाज सगणकाच्या माध्यमातून होत आहे. यासाठी इंटरनेटचा वापर होतो. रस्त्याच्या कामामुळे दूरसंचार विभागाच्या तारा जागोजागी तुटल्या आहेत. यामुळे विविध कार्यालयातील गोपनीय माहिती उघड होण्याचा धोका वाढला आहे. इतकेच नव्हे तर, टेलिफोनही बंद पडले आहेत. यातून भारत संचार निगमचा आर्थिक महसूल बुडाला आहे. यावर कारवाई करण्याची मागणी दूरसंचार निगमने केली आहे. मात्र कुठली कारवाई झाली नाही. ...तर महसुलात भक्कम भरदूरसंचार निगमला ग्राहकांची पहिली पसंती आहे. नानाविध अडचणींमुळे ग्राहकांनी आपली सेवा बंद केली आहे. यानंतरही दूरसंचार निगमला महिन्याकाठी सव्वादोन कोटींचा महसूल मिळतो. भारत संचार निगमने आपल्या उणिवा दूर केल्यास महसुलात भक्कम वाढ होईल. त्यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.