शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 14, 2015 02:53 IST

जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले.

जिल्हाधिकारी : उणिवा दाखविण्याचे आवाहनयवतमाळ : जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले. जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर पत्रपरिषदेत सिंह यांनी पहिल्यांदा वार्तालाप केला. जिल्ह्यात काम करताना प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या शिवाय अन्न सुरक्षा योजना, संजय गांधी योजना, विधवा व अपंगांच्या योजना यांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात येईल. या शिवाय राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचाही लाभ देण्यात येईल. शासनाकडून सर्वसामान्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या सर्व योजना व सोयी-सुविधांचा लाभ त्यांना कुठल्याही अडचणीशिवाय मिळावा या पद्धतीने काम करणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. प्रशासनातील उणिवा काढण्यासाठी अनेक बाबी आहे. मात्र या उणिवा दूर करून त्याचा सर्वसामान्यांना कसा फायदा होईल, यासाठी सर्वांकडून सूचना अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. २१ जून रोजी जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. प्रत्येक शाळेत हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ४ जुलै रोजी जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचा सर्वे करण्यात येईल. १०० कुटुंबामागे एक सर्वेअर त्यामध्ये ग्रामसेवक, अंगणवाडीताई, तलाठी यासारखे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. शाळाबाह्य मुलांना तत्काळ शाळेत दाखल करण्यात येणार आहे. या शिवाय कर्मचाऱ्यांचे मुख्यालयी न राहणे, अन्न सुरक्षा योजनेतील अपहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या दक्षता समित्यांचाही अहवाल घेण्यात येईल. या समित्या सक्रिय आहे त्यांनाच कायम ठेवले जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे, यासाठी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांचा आढावा घेण्यात येत आहे. १५ जूनपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत कर्ज वाटपाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हा बँकेकडे असलेले उद्दिष्ट सर्वाधिक होते. त्यांचा कर्जवाटपाचा भार कमी करून राष्ट्रीयकृत बँकांमध्ये विभागून दिला आहे. सर्व बँक शाखेच्या कार्यक्षेत्रातील गावांची संख्या निश्चित केली आहे. त्याची माहिती जिल्ह्याच्या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)