शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 14, 2015 02:53 IST

जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले.

जिल्हाधिकारी : उणिवा दाखविण्याचे आवाहनयवतमाळ : जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले. जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर पत्रपरिषदेत सिंह यांनी पहिल्यांदा वार्तालाप केला. जिल्ह्यात काम करताना प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या शिवाय अन्न सुरक्षा योजना, संजय गांधी योजना, विधवा व अपंगांच्या योजना यांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात येईल. या शिवाय राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचाही लाभ देण्यात येईल. शासनाकडून सर्वसामान्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या सर्व योजना व सोयी-सुविधांचा लाभ त्यांना कुठल्याही अडचणीशिवाय मिळावा या पद्धतीने काम करणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. प्रशासनातील उणिवा काढण्यासाठी अनेक बाबी आहे. मात्र या उणिवा दूर करून त्याचा सर्वसामान्यांना कसा फायदा होईल, यासाठी सर्वांकडून सूचना अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. २१ जून रोजी जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. प्रत्येक शाळेत हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ४ जुलै रोजी जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचा सर्वे करण्यात येईल. १०० कुटुंबामागे एक सर्वेअर त्यामध्ये ग्रामसेवक, अंगणवाडीताई, तलाठी यासारखे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. शाळाबाह्य मुलांना तत्काळ शाळेत दाखल करण्यात येणार आहे. या शिवाय कर्मचाऱ्यांचे मुख्यालयी न राहणे, अन्न सुरक्षा योजनेतील अपहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अस्तित्वात असलेल्या दक्षता समित्यांचाही अहवाल घेण्यात येईल. या समित्या सक्रिय आहे त्यांनाच कायम ठेवले जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळावे, यासाठी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांचा आढावा घेण्यात येत आहे. १५ जूनपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत कर्ज वाटपाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हा बँकेकडे असलेले उद्दिष्ट सर्वाधिक होते. त्यांचा कर्जवाटपाचा भार कमी करून राष्ट्रीयकृत बँकांमध्ये विभागून दिला आहे. सर्व बँक शाखेच्या कार्यक्षेत्रातील गावांची संख्या निश्चित केली आहे. त्याची माहिती जिल्ह्याच्या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)