शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

अभयारण्यातील आदिवासी अद्यापही दारिद्र्यातच

By admin | Updated: June 30, 2014 00:08 IST

अभयारण्यातील पशू पक्षी आणि वृक्षांवर जिवापाड प्रेम करणारा आदिवासी आजही विकासापासून कोसोदूर आहे. वनविभागाच्या जाचक अटींमुळे त्यांचा विकास खुंटला असून गावागावात शेकडो

बिटरगाव : अभयारण्यातील पशू पक्षी आणि वृक्षांवर जिवापाड प्रेम करणारा आदिवासी आजही विकासापासून कोसोदूर आहे. वनविभागाच्या जाचक अटींमुळे त्यांचा विकास खुंटला असून गावागावात शेकडो आदिवासी दारिद्र्याचे जीणे जगत आहे.पैनगंगा अभयारण्यात आंध, गोंड, कोलाम, भिल्ल, नायकडी, बंजारा, मथुरा लमाण, कोळी, धनगर, हटकर आदी आदिवासी जाती-जमातीचे लोक राहतात. अभयारण्यातील वनउपज तेंदूपत्ता, डिंक, मोहफुल, चारोळी, मध आदींवर आपली उपजीविका करतात. २७ मे १९७१ रोजी अभयारण्याची निर्मिती झाली आणि आदिवासींच्या परंपरागत हक्कावर गदा आली. वनउपज हा अभयारण्यातील आदिवासींचा अर्थाजनाचा मुख्य स्रोत आहे. परंतु यावरच नियमाने बंदी आणली. त्यामुळे आदिवासी समाजाला पर्यायी व्यवसायच उरला नाही. पोटाची आग विझविण्यासाठी काहींनी मग वृक्षतोडी व्यवसाय सुरू केला. परंतु परंपरागत आदिवासी हा वृक्षावर मनापासून प्रेम करणारा आहे. विशेष म्हणजे इंग्रजाच्या काळात जंगल भागात राहणाऱ्या लोकांसाठी वनग्राम निर्माण करण्यात आले होते. जंगलामध्ये वस्ती करणाऱ्या लोकांसाठी १९२८ साली इंग्रज सरकारने तसा करार केला होता. या लोकांंना वनविभागाचे आदेश पाळण्याचे बंधन होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यात काही फरक पडला नाही. स्वातंत्र्यानंतर १९६२ साली फॉरेस्ट व्हीलेजमध्ये वस्ती करण्याचा परवाना लागू करण्यात आला. परंतु १९२८ साली लागू केलेल्या सर्व अटी व नियम कायम आहे. त्यामुळे स्वातंत्र्य मिळूनही येथील आदिवासींचा विकास झाला नाही. आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहे. परंतु या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आदिवासींनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी अनेकदा आंदोलने केली. परंतु मुलभूत सुविधाही मिळाल्या नाही. वीज, पाणी रस्ते यासह आरोग्य आणि शैक्षणिक सुविधाही या भागात दिसत नाही. परिणामी आदिवासींचा शहराशी अत्यल्प संपर्क येतो. अशा स्थितीत आदिवासी उपेक्षिताचे जीणे जगत आहे. (वार्ताहर)