शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

अभयारण्यातील आदिवासी अद्यापही दारिद्र्यातच

By admin | Updated: June 30, 2014 00:08 IST

अभयारण्यातील पशू पक्षी आणि वृक्षांवर जिवापाड प्रेम करणारा आदिवासी आजही विकासापासून कोसोदूर आहे. वनविभागाच्या जाचक अटींमुळे त्यांचा विकास खुंटला असून गावागावात शेकडो

बिटरगाव : अभयारण्यातील पशू पक्षी आणि वृक्षांवर जिवापाड प्रेम करणारा आदिवासी आजही विकासापासून कोसोदूर आहे. वनविभागाच्या जाचक अटींमुळे त्यांचा विकास खुंटला असून गावागावात शेकडो आदिवासी दारिद्र्याचे जीणे जगत आहे.पैनगंगा अभयारण्यात आंध, गोंड, कोलाम, भिल्ल, नायकडी, बंजारा, मथुरा लमाण, कोळी, धनगर, हटकर आदी आदिवासी जाती-जमातीचे लोक राहतात. अभयारण्यातील वनउपज तेंदूपत्ता, डिंक, मोहफुल, चारोळी, मध आदींवर आपली उपजीविका करतात. २७ मे १९७१ रोजी अभयारण्याची निर्मिती झाली आणि आदिवासींच्या परंपरागत हक्कावर गदा आली. वनउपज हा अभयारण्यातील आदिवासींचा अर्थाजनाचा मुख्य स्रोत आहे. परंतु यावरच नियमाने बंदी आणली. त्यामुळे आदिवासी समाजाला पर्यायी व्यवसायच उरला नाही. पोटाची आग विझविण्यासाठी काहींनी मग वृक्षतोडी व्यवसाय सुरू केला. परंतु परंपरागत आदिवासी हा वृक्षावर मनापासून प्रेम करणारा आहे. विशेष म्हणजे इंग्रजाच्या काळात जंगल भागात राहणाऱ्या लोकांसाठी वनग्राम निर्माण करण्यात आले होते. जंगलामध्ये वस्ती करणाऱ्या लोकांसाठी १९२८ साली इंग्रज सरकारने तसा करार केला होता. या लोकांंना वनविभागाचे आदेश पाळण्याचे बंधन होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यात काही फरक पडला नाही. स्वातंत्र्यानंतर १९६२ साली फॉरेस्ट व्हीलेजमध्ये वस्ती करण्याचा परवाना लागू करण्यात आला. परंतु १९२८ साली लागू केलेल्या सर्व अटी व नियम कायम आहे. त्यामुळे स्वातंत्र्य मिळूनही येथील आदिवासींचा विकास झाला नाही. आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहे. परंतु या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आदिवासींनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी अनेकदा आंदोलने केली. परंतु मुलभूत सुविधाही मिळाल्या नाही. वीज, पाणी रस्ते यासह आरोग्य आणि शैक्षणिक सुविधाही या भागात दिसत नाही. परिणामी आदिवासींचा शहराशी अत्यल्प संपर्क येतो. अशा स्थितीत आदिवासी उपेक्षिताचे जीणे जगत आहे. (वार्ताहर)