शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

आदिवासी गोवारी समाजाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:04 IST

गोवारी समाजाने अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी ८० च्या दशकापासून लढा सुरू केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकार जुमानत नसल्याने शुक्रवारी गोवारी समाजबांधवांनी धडक मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तिरंगा चौकात धरणे आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देतिरंगा चौकात धरणे : आरक्षणाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गोवारी समाजाने अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी ८० च्या दशकापासून लढा सुरू केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकार जुमानत नसल्याने शुक्रवारी गोवारी समाजबांधवांनी धडक मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तिरंगा चौकात धरणे आंदोलन सुरू केले.अनुसूचित जमाती आरक्षणासाठी १९९४ मध्ये झालेल्या आंदोलनात गोवारी समाजातील ११४ जण शहीद झाले. त्यानंतरही शासनाने दखल घेतली नाही. अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. या याचिकेवर १४ आॅगस्ट रोजी न्यायालयाने गोवारी हा आदिवासीच असून सरकारने तत्काळ अंमलबजावणी करावी, असा आदेश दिला. मात्र त्यानंतरही राज्य शासनाने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केलीच नाही. यापूर्वी काकासाहेब कालेलकर आयोगाने गोवारी अशी शिफारस करून १९५६ च्या अनुसूचित जमातीच्या सूचीत गोंड गोवारी अशी चुकीची नोंद केली. तेव्हाच्या सरकारने ही चूक मान्यही केली. मात्र त्यानंतर १९८५ मध्ये एका शासन निर्णयात गोवारी ही बोगस आदिवासी जमात असल्याचे सांगितले. तेथूनच गोवारींचा हक्कासाठी संघर्ष सुरू आहे. आता न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही शासन गोवारींना आदिवासीचे हक्क देण्यास तयार नाही.या मोर्चाचे नेतृत्त्व सचिन चचाने, राजू राऊत, राजेंद्र कोहरे, निखिल सायरे, नारायण चामलाटे, संदीप नेवारे, सूर्यकांत कोहरे, विवेक चौधरी, गजानन राऊत, मंगेश सहारे, प्रफुल्ल गजबे, दीपक वाघाडे, गणेश शेंदरे, अशोक ठाकरे, विनोद दुधकोहळे, नागेश दुधकोहळे, राजेश चचाने यांच्यासह गोवारी समाजबांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चा