शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

आरक्षणासाठी आदिवासींचा एल्गार

By admin | Updated: August 9, 2014 01:25 IST

आदिवासींचे आरक्षण बचावण्यासाठी आता विविध आदिवासी समाज संघटनांनी एल्गार पुकारून आरक्षण बचाम मोहीम हाती घेतली आहे.

वणी : आदिवासींचे आरक्षण बचावण्यासाठी आता विविध आदिवासी समाज संघटनांनी एल्गार पुकारून आरक्षण बचाम मोहीम हाती घेतली आहे. धनगर व इतर तत्सम जातींना आदिवासींच्या आरक्षणात सामविष्ट करू नये, या मागणीसाठी निषेध, मोर्चा, धरणे आंदोलन, निवेदने देण्याची मोहीम सुरू झाली आहे.आदिवासी युवा मंचचे मुख्यमंत्र्यांना निवेदनअनुसूचित जमातीच्या सूचिमध्ये धनगर व इतर जाती समाविष्ट होऊ पाहात असल्याच्या निषेधार्थ आदिवासी युवा मंचतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षे लोटूनही आदिवासी समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक स्थिती पाहिजे तशी सुधारलेली नाही़ आजही आदिवासी समाज जंगल, दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करीत आहे़ सरकारी योजनांपासून तो कोसो दूर आहे़ समाज मागासलेल्या परिस्थितीत खितपत पडला आहे़ शासन आदिवासींच्या विकासात्मक योजनांसाठी निधीची तरतूद करते़ परंतु खऱ्या आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचतच नाही़ गैरआदिवासी त्याचा लाभ घेतात़ आधीच खऱ्या आदिवासी जमातीच्या नोकऱ्या बोगस आदिवासींनी बळकावल्या आहेत. शासनाला हे माहीत असूनही बोगस आदिवासींना नोकऱ्यांमध्ये कायम ठेवले आहे़ त्यामुळे आदिवासींवर अन्याय होत आहे़ एवढे होऊनही धनगर व इतर तत्सम समाज अशिक्षित व असंघटित आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करू पाहत आहे़ घटनेतील तरतुदीनुसार कलम १५ (४) (५) आणि कलम १६ (४) नुसार आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण, यावर आधारित आहे़ आरक्षण आदिवासींचा संवैधानिक मूलभूत अधिकार आहे. घटनेने अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांना सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास करून घेण्याचे हक्क प्रदान केले आहे़ संविधानाने हक्क प्रदान केलेले असतानाही व आदिवासी जमातीचे निष्कर्ष ठरवून दिलेले असतानाही कुठलीही आदिवासी पार्श्वभूमी नसूनसुद्धा धनगर व इतर समाज बळजबरीने व गैरमार्गाने आरक्षणाची मागणी करीत आहे़ त्यामुळे आरक्षण हक्कावर गदा आल्यास आदिवासी समाज आरक्षण बचावासाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा वसंत आडे, प्रेम किनाके, अजय राजगडकर, हेमंत कोरवते, संजय मडावी आदींनी निवेदनातून दिला आहे.आरक्षणासाठी आंदोलनआदिवासींच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी गोंडवाणा संग्राम परिषदेने एल्गार पुकारला असून उपविभागीय अधिकारी तथा तहसीलसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.भारतीय संविधानाने आदिवासींचा सर्वांगिण विकास होण्यासाठी आरक्षण दिले़ आत्तापर्यंत जे आदिवासींना विकासापासून दूर ठेवून आम्ही श्रेष्ठ, या तोऱ्यात वागत होते, तेच आता आरक्षण द्या म्हणून संघर्ष करीत आहे़ आरक्षणावर होत असलेल्या या आघातामुळे आदिवासींच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ याचा तीव्र निषेध करून आरक्षण संरक्षण धरणे आंदोलन करण्यात येणार आहे़ त्यानुसार ११ आॅगस्टला वणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, १३ आॅगस्टला मारेगाव तहसील कार्यालय, १९ आॅगस्टला झरीजामणी तहसील कार्यालय, २१ आॅगस्टला पांढरकवडा उपविभागीय अधिकारी कार्यालय, २६ आॅगस्टला घाटंजी येथील तहसीलसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)