शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

आरक्षणासाठी आदिवासींचा एल्गार

By admin | Updated: August 9, 2014 01:25 IST

आदिवासींचे आरक्षण बचावण्यासाठी आता विविध आदिवासी समाज संघटनांनी एल्गार पुकारून आरक्षण बचाम मोहीम हाती घेतली आहे.

वणी : आदिवासींचे आरक्षण बचावण्यासाठी आता विविध आदिवासी समाज संघटनांनी एल्गार पुकारून आरक्षण बचाम मोहीम हाती घेतली आहे. धनगर व इतर तत्सम जातींना आदिवासींच्या आरक्षणात सामविष्ट करू नये, या मागणीसाठी निषेध, मोर्चा, धरणे आंदोलन, निवेदने देण्याची मोहीम सुरू झाली आहे.आदिवासी युवा मंचचे मुख्यमंत्र्यांना निवेदनअनुसूचित जमातीच्या सूचिमध्ये धनगर व इतर जाती समाविष्ट होऊ पाहात असल्याच्या निषेधार्थ आदिवासी युवा मंचतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षे लोटूनही आदिवासी समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक स्थिती पाहिजे तशी सुधारलेली नाही़ आजही आदिवासी समाज जंगल, दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करीत आहे़ सरकारी योजनांपासून तो कोसो दूर आहे़ समाज मागासलेल्या परिस्थितीत खितपत पडला आहे़ शासन आदिवासींच्या विकासात्मक योजनांसाठी निधीची तरतूद करते़ परंतु खऱ्या आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचतच नाही़ गैरआदिवासी त्याचा लाभ घेतात़ आधीच खऱ्या आदिवासी जमातीच्या नोकऱ्या बोगस आदिवासींनी बळकावल्या आहेत. शासनाला हे माहीत असूनही बोगस आदिवासींना नोकऱ्यांमध्ये कायम ठेवले आहे़ त्यामुळे आदिवासींवर अन्याय होत आहे़ एवढे होऊनही धनगर व इतर तत्सम समाज अशिक्षित व असंघटित आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करू पाहत आहे़ घटनेतील तरतुदीनुसार कलम १५ (४) (५) आणि कलम १६ (४) नुसार आरक्षण हे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण, यावर आधारित आहे़ आरक्षण आदिवासींचा संवैधानिक मूलभूत अधिकार आहे. घटनेने अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांना सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास करून घेण्याचे हक्क प्रदान केले आहे़ संविधानाने हक्क प्रदान केलेले असतानाही व आदिवासी जमातीचे निष्कर्ष ठरवून दिलेले असतानाही कुठलीही आदिवासी पार्श्वभूमी नसूनसुद्धा धनगर व इतर समाज बळजबरीने व गैरमार्गाने आरक्षणाची मागणी करीत आहे़ त्यामुळे आरक्षण हक्कावर गदा आल्यास आदिवासी समाज आरक्षण बचावासाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा वसंत आडे, प्रेम किनाके, अजय राजगडकर, हेमंत कोरवते, संजय मडावी आदींनी निवेदनातून दिला आहे.आरक्षणासाठी आंदोलनआदिवासींच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी गोंडवाणा संग्राम परिषदेने एल्गार पुकारला असून उपविभागीय अधिकारी तथा तहसीलसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.भारतीय संविधानाने आदिवासींचा सर्वांगिण विकास होण्यासाठी आरक्षण दिले़ आत्तापर्यंत जे आदिवासींना विकासापासून दूर ठेवून आम्ही श्रेष्ठ, या तोऱ्यात वागत होते, तेच आता आरक्षण द्या म्हणून संघर्ष करीत आहे़ आरक्षणावर होत असलेल्या या आघातामुळे आदिवासींच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ याचा तीव्र निषेध करून आरक्षण संरक्षण धरणे आंदोलन करण्यात येणार आहे़ त्यानुसार ११ आॅगस्टला वणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, १३ आॅगस्टला मारेगाव तहसील कार्यालय, १९ आॅगस्टला झरीजामणी तहसील कार्यालय, २१ आॅगस्टला पांढरकवडा उपविभागीय अधिकारी कार्यालय, २६ आॅगस्टला घाटंजी येथील तहसीलसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)