शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

क्षेत्रबंधन उठल्याने आदिवासींचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:35 IST

क्षेत्रबंधन कायदा रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या माध्यमातून शिवाजीराव मोघे यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली.

ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाण : इंदिरा गांधी आणि वसंतराव नाईकांचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : क्षेत्रबंधन कायदा रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या माध्यमातून शिवाजीराव मोघे यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. सतत दहा वर्ष आदिवासी युवक संघाद्वारे सनदशीर मार्गाने संघर्ष केला. तब्बल ४१ वर्षानंतर वसंतराव नाईकांच्या प्रयत्नाने क्षेत्रबंध उठले आणि आदिवासींचा खरा विकास झाला, असे प्रतिपादन काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.आदिवासी नेते माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे लिखित ‘आदिवासींचे क्षेत्रबंधन आणि इंदिरा गांधी’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुसद येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोहरराव नाईक होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे उपसभापती आमदार माणिकराव ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, आमदार अशोक टारफे, माजी मंत्री प्रा.वसंतराव पुरके, माजी आमदार विजय खडसे, लक्ष्मणराव तायडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, अ‍ॅड. सचिन नाईक उपस्थित होते. उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, लोकशाही आबाधित ठेवण्याचे कार्य काँग्रेस पक्षाने केले. इंदिरा गांधींची कामगिरी देश कधीही विसरु शकत नाही. प्रास्ताविकात अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी इंदिरा गांधी व वसंतराव नाईक यांच्या सहकार्यातून क्षेत्रबंध कायदा हटविण्यात आला. ही माहिती तरुणांना व्हावी यासाठी पुस्तक लिहिल्याचे सांगितले. कार्यक्रमाला तातू देशमुख, जीवन पाटील, रेखाताई मोघे, पी.बी. आडे, जय नाईक, अ‍ॅड. दिलीप एडतकर, अजय पुरोहित, मारोतराव वंजारे, रामकृष्ण चौधरी, जितेंद्र मोघे, शामराव व्यवहारे उपस्थित होते. संचालन सुरेश धनवे यांनी तर आभार अजाबराव उईके यांनी मानले.