शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विभागाने झटकली १२ लाख विद्यार्थ्यांची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 11:54 IST

राज्यातील अनुसूचित जमातीच्या १२ लाख विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आदिवासी शिष्यवृत्ती योजनेची जबाबदारी अखेर आदिवासी विकास विभागाने झटकली आहे.

ठळक मुद्दे शिष्यवृत्तीतून काढले हात यापुढे संपूर्ण मदार शिक्षण विभागावरच

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यातील अनुसूचित जमातीच्या १२ लाख विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आदिवासी शिष्यवृत्ती योजनेची जबाबदारी अखेर आदिवासी विकास विभागाने झटकली आहे. विद्यार्थ्यांपर्यंत निधी पोहोचविण्यात यंत्रणा सपशेल नापास झाल्याने आता निधी वाटपाची जबाबदारी संपूर्णपणे शिक्षण विभागावर लोटून देण्यात आली आहे. बुधवारी यासंदर्भात विभागाने शासननिर्णय काढून राज्यातील प्रकल्प अधिकाऱ्यांना मोकळे केले आहे.राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागातर्फे सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. यात विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविले जातात, त्यानुसार त्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते. ही संपूर्ण कार्यवाही आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांमार्फत पार पाडली जाते. मात्र दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज चुकणे, बँक खाते क्रमांक चुकणे अशा कारणांनी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहात आहेत.विद्यार्थ्यांचे अर्ज हे शाळास्तरावर भरण्यात येतात. या शाळा एकतर ग्रामविकास विभाग किंवा नगरविकास विभागाच्या अखत्यारीत काम करतात. संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतरच हे अर्ज प्रकल्प अधिकाऱ्यांकडे येतात. त्यामुळे आता प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मान्यतेची पायरी रद्द करून थेट गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज जाणार आहेत. शिक्षणाधिकारीच विद्यार्थ्यांचा तपशील एकत्र करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तेवढ्या निधीची मागणी करतील. हा निधी शिक्षणाधिकारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाच्या खात्यात वर्ग करतील आणि मुख्याध्यापक तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यात जमा करतील, असे बुधवारच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित योजनाच ग्रामविकास विभाग व नगरविकास विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

शिक्षण विभागाचे असहकार्यवेळ वाचविण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शिक्षण खात्याकडे देण्यात आल्याचे आदिवासी विभागाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात मात्र शिक्षण विभागाकडून प्रकल्प कार्यालयाला सहकार्यच केले जात नसल्याने आदिवासी विकास खात्याने हात झटकले आहेत. शिक्षण विभागाच्या अखत्यारितील शाळा दरवर्षी प्रकल्प कार्यालयांना विद्यार्थ्यांची माहिती व अर्ज वेळेत देत नाही. वारंवार सूचना देऊनही मुख्याध्यापक प्रकल्प अधिकाऱ्यांना जुमानत नाहीत. त्यामुळेच आता ही योजनाच गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तावडीत देऊन आदिवासी विकास खात्याने डाव साधला आहे.

टॅग्स :Governmentसरकार