शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

आदिवासी बांधवांना गावातच रोजगार

By admin | Updated: January 2, 2017 00:29 IST

जिल्ह्यातील सव्वा लाख आदिवासी बांधवांना त्यांच्याच गावात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत.

५३१ गावांना सामूहिक वनहक्क प्रदान : जिल्ह्यात वनउपजातून वार्षिक ६० कोटींच्या उलाढालीची शक्यता रूपेश उत्तरवार  यवतमाळ जिल्ह्यातील सव्वा लाख आदिवासी बांधवांना त्यांच्याच गावात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्यासाठी ५३१ गावांना सामूहिक वनहक्क प्रदान करण्यात आले आहे. पूर्वी वनउपजावर वनविभागाची मालकी होती. आता ही मालकी गावांना मिळाली. त्यानुसार जिल्ह्यात वनउपजाची वार्षिक उलाढाल ६० कोटींच्या राहण्याचा अंदाज आहे. यातून नववर्षापासून ५३१ गावांमध्ये समृद्धिची पहाट उगवण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्हा आदिवासीबहुल आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या वनांचे संरक्षण करण्याचे काम पूर्वीपासून आदिवसी बांधव करीत आहे. आता सामूहिक वनदाव्यांच्या माध्यमातून त्यांना मालकी देण्याचे काम जिल्हा प्रशासन करीत आहे. जिल्ह्यातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘रानमेवा’ आहे. मात्र त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लागत नाही. आता हा रानमेवा आणि इतर वनउपजातून आदिवासी बांधवांना समृद्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहे. विदर्भात सर्वाधिक सामूहिक वनदावे प्रदान करण्याचे काम जिल्ह्याने पूर्ण केले आहे. जिल्ह्यातील ८९६ गावे वनांलगत वसली आहेत. या परिसरात आदिवासी बांधवांचे सर्वाधिक वास्तव्य अहे. या ८९६ गावांपैकी आता ५३१ गावांना सामूहिक वनहक्क दावे प्रदान करण्याचे काम जिल्हा वनहक्क व्यवस्थापन समितीने पूळे केले आहे. या गावांना मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. आता या वनपट्ट्यांमधून मिळणाऱ्या वनउपजावर सामूहिक वनहक्क समितीचा अधिकार राहणार आहे. यातून मजुरांना गावातच मजुरी मिळणार आहे. उर्वरित पैसे ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा करावे लागतील. हा पैसा गावातील विकास कामांवर खर्च करावा लागणार आहे. या वनपजातून मिळणाऱ्या पैशाने ही गावेसुद्धा समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे. त्यातून या आदिवासीबहुल गवांमध्ये नवीन पहाट उगवण्याची उमेद निर्माण झाली आहे. वनमेवा आणि दुर्मिळ वनऔषधी जिल्ह्यात एक लाख २४ हजार हेक्टरची मालकी या गावांना मिळाली. या जंगल क्षेत्रात मोह, तेंदूपत्ता, डिंक, चारोळी, शहद, बिबा, लाख, आवळा, हिरडा आदी वनऔषधींचा समावेश आहे. जंगलातून निघणाऱ्या या वनउपजातून तबुबल ६० कोटींपेक्षाही अधिक रूपयांची उलाढल होण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. यातूनच सवालाख आदिवासी बांधवांना गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे.