शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बांधवांनी संघटितपणे पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:13 IST

सर्वाधिक प्रामाणिक आणि शांतताप्रिय समाज म्हणून आदिवासी समाजाकडे पाहिले जाते. या समाजाचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी एक अजेंडा तयार करून त्याचा सतत पाठपुरावा करावा लागणार आहे.

ठळक मुद्देशिवाजीराव मोघे : राज्यस्तरीय बिरसा पर्वाचे थाटात उद्घाटन; भारतरत्न, बिरसा भवनासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वाधिक प्रामाणिक आणि शांतताप्रिय समाज म्हणून आदिवासी समाजाकडे पाहिले जाते. या समाजाचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी एक अजेंडा तयार करून त्याचा सतत पाठपुरावा करावा लागणार आहे. त्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन संघटितपणे पुढे येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले.स्थानिक समता मैदानावर शनिवारी दोन दिवसीय राज्यस्तरीय बिरसा पर्वाचे उद्घाटन झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात मोघे बोलत होते. उद्घाटक म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, बिरसा मुंडा यांचे नातू सुकराम आणि सानिक मुंडा होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार प्रा.डॉ.अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, माजी आमदार डॉ.संदीप धुर्वे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, बिरसा पर्व उत्सव समितीचे अध्यक्ष राजू चांदेकर, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वासूदेवशाह टेकाम, आॅल इंडिया फेडरेशनचे केंद्रीय कार्याध्यक्ष सुरेश कन्नाके, पणन महासंघ संचालक सुरेश चिंचोळकर, पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजूदास जाधव, शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे, ज्येष्ठ साहित्यिक उद्धवराव येरमे, आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक मिनाक्षी वेट्टी, राजू केराम, पवन आत्राम उपस्थित होते.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, देशभरात ३० नोव्हेंबरपर्यंत बिरसा पर्व साजरे केले जाणार आहे. लोकसभेत बाबूराव शेडमाके यांचे तैलचित्र लावण्याचा ठराव घेण्यात आला आहे.डॉ. संदीप धुर्वे यांनी बिरसा मुंडा यांना मरणोपरांत भारतरत्न देण्याची मागणी केली. नगराध्यक्ष कांचन चौधरी म्हणाल्या, बिरसा मुंडा यांचा पुतळ्यासाठी जागा सुचविण्यात यावी. सुकरामजी मुंडा यांनी अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे आवाहन केले.सत्ताधारी आमदारांवर आयोजकांची सरबत्तीआदिवासींचे २५ आमदार विधानसभेत आहे. तरीही आदिवासींचे प्रश्न सुटले नाही, अशी खंत बिरसा पर्व उत्सव समितीचे अध्यक्ष राजू चांदेकर यांनी मांडली. गैरआदिवासींना संरक्षण दिल्या जात असल्याच्या मुद्यावर रोष व्यक्त केला. कुमारी माता प्रकरणात दोषींना फाशी द्यावी. मात्र कुमारी मातांना केवळ मदतीवर समजावले जात असल्याची खंत व्यक्त केली.