शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

आदिवासी आश्रमशाळांमध्ये ४० टक्केच विद्यार्थी परतले

By admin | Updated: July 19, 2014 01:48 IST

विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शिक्षक व संस्थानिकांची

‘एटीसीं’चा दावा ८० टक्क्यांचा : तीन शाळांना भेट देऊन पाहणीयवतमाळ : विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शिक्षक व संस्थानिकांची धावाधाव सुरू असली तरी आतापर्यंत केवळ ३० ते ४० टक्केच विद्यार्थी आदिवासी आश्रमशाळांमध्ये परतले आहे. मात्र संस्थांकडून हा आकडा फुगवून दुपटीने सांगितला जात आहे. दरम्यान अमरावतीचे आदिवासी विकास अपर आयुक्त भास्कर वाळींबे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील तीन शाळांना भेट देऊन स्थितीची पाहणी केली. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांचे वास्तव स्टिंग आॅपरेशनद्वारे ‘लोकमत’ने उघड केले होते. २६ जूनला सर्व शाळा उघडल्या. त्यावरून तीन आठवडे लोटूनही आदिवासी आश्रमशाळा बंद अवस्थेत व विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पुढे आले होते. त्याची दखल घेत पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी डॉ. प्रशांत रुमाले यांनी या शाळांच्या तपासणीसाठी स्वतंत्र पथक गठित केले. या पथकाला चार दिवसात अहवाल मागण्यात आला. ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमुळे आश्रमशाळांची यंत्रणा विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यासाठी कामाला लागली आहे. संस्थानिक व शाळेचे शिक्षक, कर्मचारी गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना शाळेत आणत आहेत. पालकांना विनवण्या करीत आहेत. त्यानंतरही आजच्या घडीला अवघे ३० ते ४० टक्के विद्यार्थी शाळांमध्ये पोहोचल्याची माहिती आहे. परंतु आश्रमशाळांचे संचालक हा आकडा फुगवून सांगत आहे. खरोखरच आश्रमशाळेत किती विद्यार्थी हजर आहेत, हे तपासायचे असेल तर सकाळच्या जेवणाच्या वेळी बसणाऱ्या पंगतीत ते सहज तपासणे शक्य होते. ‘लोकमत’ प्रतिनिधीने अशा पंगतींचेही वास्तव टिपले असता ३० ते ४० टक्क्याचा आकडा पुढे आला. दरम्यान, अमरावतीचे आदिवासी विकास अपर आयुक्त भास्कर बाळींबे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील तीन शाळांना अकस्मात भेट देऊन पाहणी केली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांची लासीना येथील अनुदानित आश्रमशाळा तसेच बाभूळगावची शाळा व कापरा येथील शासकीय आश्रमशाळेत भेट देण्यात आली. या शाळांमध्ये ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचा दावा वाळींबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. या शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती, दहावी-बारावीचे निकाल, इमारत बांधकाम, प्रसाधनगृह व अन्य व्यवस्था पाहता आपण समाधानी असल्याचे बाळींबे यांनी स्पष्ट केले. शाळा सुरू झाल्यानंतर किमान एक महिना तरी आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये पूर्ण संख्येने परतत नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. यावेळी त्या तुलनेत विद्यार्थी लवकर शाळेत पोहोचल्याचे वाळींबे म्हणाले. विद्यार्थी उपस्थित नसतील त्या महिन्यातील अनुदानाची रक्कम आश्रमशाळांना दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)