शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
6
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
7
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
8
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
9
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
10
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
11
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
12
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
13
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
14
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
15
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
16
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
17
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
18
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
19
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
20
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

वृक्ष लागवड कागदावरच

By admin | Updated: November 3, 2014 23:33 IST

पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र लावलेली रोपं जगली की नाही याचे मूल्यमापन होत नाही.

नेर : पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र लावलेली रोपं जगली की नाही याचे मूल्यमापन होत नाही. कोट्यवधी रुपयांच्या रोपट्यांचा चुराडा होत आहे. वृक्ष लागवड आता केवळ कागदावरच दिसत आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे.शासनातर्फे गावपातळीवर अनेक योजना राबविल्या जातात. काही योजना गावापर्यंत पोहोचतात तर काही कागदोपत्रीच दिसतात. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पाण्याची पातळी कमालीची घटत चालली आहे. यावर उपाय म्हणून शासनाने वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला आहे. शाळा, महाविद्यालय, निमशासकीय संस्था यासह विविध शासकीय कार्यालयांना दरवर्षी वृक्षारोपणाचे निर्देश दिले जाते. यानुसार पावसाळ्यात वृक्ष लागवड होते. मात्र ही केवळ औपचारिकता ठरत आहे. वृक्षारोपणासाठी शासनाने गावपातळीवर नर्सरी दिली. त्यात अनेक वृक्षांची रोपटी लावली जातात. तेथून आणलेली रोपटी गावागावात लावल्यानंतर त्याच्या संगोपनाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. लावलेले रोपटे जिवंत आहे की वाळले याची पाहणी कधीही केली जात नाही. दरवर्षी एकाच खड्ड्यात वृक्षारोपण होत असल्याचा प्रकारही घडतो. ‘झाडे लावा - झाडे जगवा’ हा संदेश गावागावात पोहोचविला जातो. शाळकरी विद्यार्थी, युवा वर्ग आदींच्या पुढाकारात वृक्षारोपण केले जाते. मान्यवर मंडळी आणि अधिकारी वृक्षारोपण करतात पण, या वृक्षांचे पुढे काय झाले याकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. यातूनच वृक्ष लागवड कागदावर दिसण्याचे प्रकार वाढले आहे. ही योजना नेमकी कुणाच्या फायद्याची हा प्रश्न उपस्थित झाला आहे. लावलेल्या झाडांचा अहवाल सचित्र वरिष्ठांकडे पाठविला जातो. प्रत्यक्षात २५ टक्केही रोपं अस्तित्वात राहात नाही, हे वास्तव आहे. (तालुका प्रतिनिधी)