शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड कागदावरच

By admin | Updated: November 3, 2014 23:33 IST

पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र लावलेली रोपं जगली की नाही याचे मूल्यमापन होत नाही.

नेर : पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र लावलेली रोपं जगली की नाही याचे मूल्यमापन होत नाही. कोट्यवधी रुपयांच्या रोपट्यांचा चुराडा होत आहे. वृक्ष लागवड आता केवळ कागदावरच दिसत आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे.शासनातर्फे गावपातळीवर अनेक योजना राबविल्या जातात. काही योजना गावापर्यंत पोहोचतात तर काही कागदोपत्रीच दिसतात. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पाण्याची पातळी कमालीची घटत चालली आहे. यावर उपाय म्हणून शासनाने वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला आहे. शाळा, महाविद्यालय, निमशासकीय संस्था यासह विविध शासकीय कार्यालयांना दरवर्षी वृक्षारोपणाचे निर्देश दिले जाते. यानुसार पावसाळ्यात वृक्ष लागवड होते. मात्र ही केवळ औपचारिकता ठरत आहे. वृक्षारोपणासाठी शासनाने गावपातळीवर नर्सरी दिली. त्यात अनेक वृक्षांची रोपटी लावली जातात. तेथून आणलेली रोपटी गावागावात लावल्यानंतर त्याच्या संगोपनाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. लावलेले रोपटे जिवंत आहे की वाळले याची पाहणी कधीही केली जात नाही. दरवर्षी एकाच खड्ड्यात वृक्षारोपण होत असल्याचा प्रकारही घडतो. ‘झाडे लावा - झाडे जगवा’ हा संदेश गावागावात पोहोचविला जातो. शाळकरी विद्यार्थी, युवा वर्ग आदींच्या पुढाकारात वृक्षारोपण केले जाते. मान्यवर मंडळी आणि अधिकारी वृक्षारोपण करतात पण, या वृक्षांचे पुढे काय झाले याकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. यातूनच वृक्ष लागवड कागदावर दिसण्याचे प्रकार वाढले आहे. ही योजना नेमकी कुणाच्या फायद्याची हा प्रश्न उपस्थित झाला आहे. लावलेल्या झाडांचा अहवाल सचित्र वरिष्ठांकडे पाठविला जातो. प्रत्यक्षात २५ टक्केही रोपं अस्तित्वात राहात नाही, हे वास्तव आहे. (तालुका प्रतिनिधी)