शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

वृक्ष लागवड कागदावरच

By admin | Updated: November 3, 2014 23:33 IST

पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र लावलेली रोपं जगली की नाही याचे मूल्यमापन होत नाही.

नेर : पर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र लावलेली रोपं जगली की नाही याचे मूल्यमापन होत नाही. कोट्यवधी रुपयांच्या रोपट्यांचा चुराडा होत आहे. वृक्ष लागवड आता केवळ कागदावरच दिसत आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे.शासनातर्फे गावपातळीवर अनेक योजना राबविल्या जातात. काही योजना गावापर्यंत पोहोचतात तर काही कागदोपत्रीच दिसतात. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पाण्याची पातळी कमालीची घटत चालली आहे. यावर उपाय म्हणून शासनाने वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला आहे. शाळा, महाविद्यालय, निमशासकीय संस्था यासह विविध शासकीय कार्यालयांना दरवर्षी वृक्षारोपणाचे निर्देश दिले जाते. यानुसार पावसाळ्यात वृक्ष लागवड होते. मात्र ही केवळ औपचारिकता ठरत आहे. वृक्षारोपणासाठी शासनाने गावपातळीवर नर्सरी दिली. त्यात अनेक वृक्षांची रोपटी लावली जातात. तेथून आणलेली रोपटी गावागावात लावल्यानंतर त्याच्या संगोपनाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. लावलेले रोपटे जिवंत आहे की वाळले याची पाहणी कधीही केली जात नाही. दरवर्षी एकाच खड्ड्यात वृक्षारोपण होत असल्याचा प्रकारही घडतो. ‘झाडे लावा - झाडे जगवा’ हा संदेश गावागावात पोहोचविला जातो. शाळकरी विद्यार्थी, युवा वर्ग आदींच्या पुढाकारात वृक्षारोपण केले जाते. मान्यवर मंडळी आणि अधिकारी वृक्षारोपण करतात पण, या वृक्षांचे पुढे काय झाले याकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. यातूनच वृक्ष लागवड कागदावर दिसण्याचे प्रकार वाढले आहे. ही योजना नेमकी कुणाच्या फायद्याची हा प्रश्न उपस्थित झाला आहे. लावलेल्या झाडांचा अहवाल सचित्र वरिष्ठांकडे पाठविला जातो. प्रत्यक्षात २५ टक्केही रोपं अस्तित्वात राहात नाही, हे वास्तव आहे. (तालुका प्रतिनिधी)