शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

धोकादायक पुलावरून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:55 IST

तालुक्यातील विविध रस्त्यांवर असलेल्या नदी-नाल्यांना ओलांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधले आहे. मात्र त्यामधील काही पूल धोकादायक असूनही त्यावरून वाहतुकीची वर्दळ सुरू आहे. त्यामध्ये पाटाळा, शिरपूर, पेटूर गावाजवळील पूल जीवघेणे ठरत आहेत.

ठळक मुद्देअनेकांचे गेले प्राण : डागडुजीवरच निभावले जात आहे काम

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील विविध रस्त्यांवर असलेल्या नदी-नाल्यांना ओलांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधले आहे. मात्र त्यामधील काही पूल धोकादायक असूनही त्यावरून वाहतुकीची वर्दळ सुरू आहे. त्यामध्ये पाटाळा, शिरपूर, पेटूर गावाजवळील पूल जीवघेणे ठरत आहेत.वणी-नागपूर या राज्य मार्गावर पाटाळा गावाजवळ वर्धा नदीवर असलेला पुल सर्वात धोकादायक ठरत आहे. वणीला चंद्रपूर, वर्धा, नागपूर जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग असल्याने सर्वाधिक रहदारीचा मार्ग आहे. या मार्गावर पाटाळा गावाजवळ वर्धा नदीवर पुल तयार केला. या पुलाला ५० वर्षापेक्षा अधिक काळ झाला. बांधतानाच हा पुल अरूंद व अतिशय ठेंगणा बांधण्यात आला. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात किमान चार-पाचवेळा तरी पुराचे पाणी या पुलावरून वाहते. पाण्याच्या वेगवान प्रवाहाने दरवर्षीच या पुलावर खड्डे पडतात. पुल अरूंद असल्याने दोन वाहनांना एकमेकांना ओलांडताना सावधगरीनेच ओलांडावे लागते. पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन पुलावरून काढणे तारेवरची कसरत ठरते. वारंवार पुर गेल्याने हा पुल कमकुवतसुद्धा झाला आहे. विशेष म्हणजे पुलावरून नेहमी पुराचे पाणी जात असल्याने पुलाच्या कडेला कठडे लावले जात नाही. त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष जराशेही विचलीत झाल्यास आडकाठी नसल्याने वाहन सरळ नदीत पडू शकते. आतापर्यंत अनेक दोनचाकी व चारचाकी वाहने पुलावरून नदीत पडून अनेकांचे जीव गेले आहेत. मात्र बांधकाम विभागाला याचे गांभीर्य दिसून येत नाही. पुलावरील खड्डे बुजविण्याचे व त्याला कठडे लावण्याचे काम तात्काळ केले जात नाही. आता करंजी-ब्रम्हपुरी हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आहे. लवकरच त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी शेतीचे भूसंपादन करण्यात आले आहे. तयार होणाऱ्या चौपदरी रस्त्याला साजेसा असा रूंद व पुरेशा उंचीचा पुल याठिकाणी तयार होणार काय, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. वणी-कोरपना मार्गावरील शिरपूर गावाजवळ निर्गुडा नदीवर असलेला पुलही कमकुवत व धोकादायक झाल्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या पुलाच्या दोन्ही बाजुस लावली आहे. नुकतीच या पुलाची डागडुजी करण्यात आली आहे. या पुलावरून सिमेंट व कोळसा वाहतूक करणाºया अवजड ट्रकची सतत वाहतूक सुरू असते. त्यामुळे एखादेवेळी मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वर्षापूर्वी हा पुलसुद्धा नदीच्या पुरात वाहून गेला होता. त्याची पुनरावृत्ती होण्याचीही शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वणी-मुकूटबन मार्गावर पेटूर गावाजवळ नाल्यावर असलेला पुल तर पावसाळ्यात नेहमीच वाहतुकीला अडथळा ठरत आहे. या पुलाची उंची अतिशय कमी असल्याने साधारण पावसानेही नाल्याचे पाणी या पुलावरून वाहते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबून राहते. मागीलवर्षी याच पुलावरून एक युवक पुरात वाहून गेला. या पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे.