शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

धोकादायक पुलावरून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:55 IST

तालुक्यातील विविध रस्त्यांवर असलेल्या नदी-नाल्यांना ओलांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधले आहे. मात्र त्यामधील काही पूल धोकादायक असूनही त्यावरून वाहतुकीची वर्दळ सुरू आहे. त्यामध्ये पाटाळा, शिरपूर, पेटूर गावाजवळील पूल जीवघेणे ठरत आहेत.

ठळक मुद्देअनेकांचे गेले प्राण : डागडुजीवरच निभावले जात आहे काम

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील विविध रस्त्यांवर असलेल्या नदी-नाल्यांना ओलांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधले आहे. मात्र त्यामधील काही पूल धोकादायक असूनही त्यावरून वाहतुकीची वर्दळ सुरू आहे. त्यामध्ये पाटाळा, शिरपूर, पेटूर गावाजवळील पूल जीवघेणे ठरत आहेत.वणी-नागपूर या राज्य मार्गावर पाटाळा गावाजवळ वर्धा नदीवर असलेला पुल सर्वात धोकादायक ठरत आहे. वणीला चंद्रपूर, वर्धा, नागपूर जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग असल्याने सर्वाधिक रहदारीचा मार्ग आहे. या मार्गावर पाटाळा गावाजवळ वर्धा नदीवर पुल तयार केला. या पुलाला ५० वर्षापेक्षा अधिक काळ झाला. बांधतानाच हा पुल अरूंद व अतिशय ठेंगणा बांधण्यात आला. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात किमान चार-पाचवेळा तरी पुराचे पाणी या पुलावरून वाहते. पाण्याच्या वेगवान प्रवाहाने दरवर्षीच या पुलावर खड्डे पडतात. पुल अरूंद असल्याने दोन वाहनांना एकमेकांना ओलांडताना सावधगरीनेच ओलांडावे लागते. पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन पुलावरून काढणे तारेवरची कसरत ठरते. वारंवार पुर गेल्याने हा पुल कमकुवतसुद्धा झाला आहे. विशेष म्हणजे पुलावरून नेहमी पुराचे पाणी जात असल्याने पुलाच्या कडेला कठडे लावले जात नाही. त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष जराशेही विचलीत झाल्यास आडकाठी नसल्याने वाहन सरळ नदीत पडू शकते. आतापर्यंत अनेक दोनचाकी व चारचाकी वाहने पुलावरून नदीत पडून अनेकांचे जीव गेले आहेत. मात्र बांधकाम विभागाला याचे गांभीर्य दिसून येत नाही. पुलावरील खड्डे बुजविण्याचे व त्याला कठडे लावण्याचे काम तात्काळ केले जात नाही. आता करंजी-ब्रम्हपुरी हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आहे. लवकरच त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी शेतीचे भूसंपादन करण्यात आले आहे. तयार होणाऱ्या चौपदरी रस्त्याला साजेसा असा रूंद व पुरेशा उंचीचा पुल याठिकाणी तयार होणार काय, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. वणी-कोरपना मार्गावरील शिरपूर गावाजवळ निर्गुडा नदीवर असलेला पुलही कमकुवत व धोकादायक झाल्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या पुलाच्या दोन्ही बाजुस लावली आहे. नुकतीच या पुलाची डागडुजी करण्यात आली आहे. या पुलावरून सिमेंट व कोळसा वाहतूक करणाºया अवजड ट्रकची सतत वाहतूक सुरू असते. त्यामुळे एखादेवेळी मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वर्षापूर्वी हा पुलसुद्धा नदीच्या पुरात वाहून गेला होता. त्याची पुनरावृत्ती होण्याचीही शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वणी-मुकूटबन मार्गावर पेटूर गावाजवळ नाल्यावर असलेला पुल तर पावसाळ्यात नेहमीच वाहतुकीला अडथळा ठरत आहे. या पुलाची उंची अतिशय कमी असल्याने साधारण पावसानेही नाल्याचे पाणी या पुलावरून वाहते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबून राहते. मागीलवर्षी याच पुलावरून एक युवक पुरात वाहून गेला. या पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे.