शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये टरबुजाच्या पिकावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

तालुक्यात अनेक प्रयोगशील युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टरबुजाचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. आता टरबूज निघणे सुरू झाले आहे. मात्र बाजारात विकण्यासाठी नेण्याचा प्रश्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने पोलिसांकडून अडविले जात आहे. तालुक्याच्या ठिकाणी माल न्यायचा झाल्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियम तोडला म्हणून पोलिसांकडून कुठे आणि केव्हा मार बसेल याचा नेम राहिलेला नाही.

ठळक मुद्देउत्पादक चिंतेत : आधीच उठाव नाही, त्यात सडण्याचीही भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : टरबुजाचे उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्याच्या प्रयत्नात असलेले तालुक्यातील उत्पादक चिंतेत सापडले आहे. लॉकडाऊनमुळे बाजारात टरबूज विकण्यासाठी जाऊ देत नाही, तर दुसरीकडे पावसामुळे सडण्याची भीती आहे. या उत्पादनावर आलेली संक्रांत दूर व्हावी यासाठी प्रशासनाकडूनच सहकार्याची साथ अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.तालुक्यात अनेक प्रयोगशील युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टरबुजाचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. आता टरबूज निघणे सुरू झाले आहे. मात्र बाजारात विकण्यासाठी नेण्याचा प्रश्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने पोलिसांकडून अडविले जात आहे. तालुक्याच्या ठिकाणी माल न्यायचा झाल्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियम तोडला म्हणून पोलिसांकडून कुठे आणि केव्हा मार बसेल याचा नेम राहिलेला नाही.शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी अटकाव केला जाऊ नये, असे सरकारकडून सांगितले जाते. मात्र याठिकाणी या विपरित परिस्थिती आहे. बाजारात उभे राहिल्यानंतर खरेदीदार येतात. परंतु शहरात जायचे कसे, हा प्रश्न आहे. शेतात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठीचे टरबूज तयार झाले आहे. अशातच पावसाची हजेरी लागत आहे. या अस्मानी संकटामुळेही टरबूज उत्पादक हवालदिल झाला आहे.तालुक्यात जवळपास ४० हून अधिक शेतकºयांनी टरबुजाची शेती केली आहे. उत्पादन अधिक, बाजारात माल न्यायची सोय नाही या व इतर कारणांमुळे किंमतही अतिशय कमी मिळत आहे. यामुळे हजारो टन टरबूज सडण्याची स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्जाऊ रकमा काढून टरबुजाचे उत्पादन घेतले आहे. या पिकाचा पैसा होत नसल्याने कर्जाची परतफेड करायची कशी, याची चिंता सतावत आहे.भरून न निघणारे नुकसानयावर्षी टरबूज पिकाचे कधीही न भरून निघणारे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील तेजेस सिंगवी, संग्राम देशमुख, ओम दिनेश ढवक आदी युवा शेतकऱ्यांनी टरबुजाचे उत्पादन घेतले आहे. संचारबंदीमुळे त्यांना आपला माल परत आणावा लागला. याशिवाय इतरही शेतकऱ्यांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागले.