शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

नेरमध्ये टरबुजाच्या पिकावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

तालुक्यात अनेक प्रयोगशील युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टरबुजाचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. आता टरबूज निघणे सुरू झाले आहे. मात्र बाजारात विकण्यासाठी नेण्याचा प्रश्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने पोलिसांकडून अडविले जात आहे. तालुक्याच्या ठिकाणी माल न्यायचा झाल्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियम तोडला म्हणून पोलिसांकडून कुठे आणि केव्हा मार बसेल याचा नेम राहिलेला नाही.

ठळक मुद्देउत्पादक चिंतेत : आधीच उठाव नाही, त्यात सडण्याचीही भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : टरबुजाचे उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्याच्या प्रयत्नात असलेले तालुक्यातील उत्पादक चिंतेत सापडले आहे. लॉकडाऊनमुळे बाजारात टरबूज विकण्यासाठी जाऊ देत नाही, तर दुसरीकडे पावसामुळे सडण्याची भीती आहे. या उत्पादनावर आलेली संक्रांत दूर व्हावी यासाठी प्रशासनाकडूनच सहकार्याची साथ अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.तालुक्यात अनेक प्रयोगशील युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टरबुजाचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. आता टरबूज निघणे सुरू झाले आहे. मात्र बाजारात विकण्यासाठी नेण्याचा प्रश्न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने पोलिसांकडून अडविले जात आहे. तालुक्याच्या ठिकाणी माल न्यायचा झाल्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियम तोडला म्हणून पोलिसांकडून कुठे आणि केव्हा मार बसेल याचा नेम राहिलेला नाही.शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी अटकाव केला जाऊ नये, असे सरकारकडून सांगितले जाते. मात्र याठिकाणी या विपरित परिस्थिती आहे. बाजारात उभे राहिल्यानंतर खरेदीदार येतात. परंतु शहरात जायचे कसे, हा प्रश्न आहे. शेतात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठीचे टरबूज तयार झाले आहे. अशातच पावसाची हजेरी लागत आहे. या अस्मानी संकटामुळेही टरबूज उत्पादक हवालदिल झाला आहे.तालुक्यात जवळपास ४० हून अधिक शेतकºयांनी टरबुजाची शेती केली आहे. उत्पादन अधिक, बाजारात माल न्यायची सोय नाही या व इतर कारणांमुळे किंमतही अतिशय कमी मिळत आहे. यामुळे हजारो टन टरबूज सडण्याची स्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्जाऊ रकमा काढून टरबुजाचे उत्पादन घेतले आहे. या पिकाचा पैसा होत नसल्याने कर्जाची परतफेड करायची कशी, याची चिंता सतावत आहे.भरून न निघणारे नुकसानयावर्षी टरबूज पिकाचे कधीही न भरून निघणारे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील तेजेस सिंगवी, संग्राम देशमुख, ओम दिनेश ढवक आदी युवा शेतकऱ्यांनी टरबुजाचे उत्पादन घेतले आहे. संचारबंदीमुळे त्यांना आपला माल परत आणावा लागला. याशिवाय इतरही शेतकऱ्यांना अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागले.